🚩⚜️🚩🔆🕉🔆🚩⚜️🚩
🌻 *आनंदी पहाट* 🌻
*त्रिपुरारी पौर्णिमेची*
🚩🔱🚩🔆🪔🔆🚩🔱🚩
*भारतीय संस्कृतीतील पौराणिक कथांमुळे सण निर्माण झालेत पण अजूनही त्याचे संदर्भ भविष्यात अधिकाधिक स्पष्ट होत आहेत.*
*त्रिपुर.. अर्थात तीन अशी नगरे जी आकाशातही फिरू शकत होती. येथील असूर शक्तीशाली झाला. मानव.. देवदेवतानाही अर्थातच सज्जन शक्तीला त्रास देवू लागला. मग सारे शरण गेले ते शंकरांना.*
*मानवाची चिंता परमेश्वरच करतो. चातुर्मासात भगवान विष्णूंच्या अनुपस्थितीत विश्वाचा गाडा भगवान शंकर हे चालवून मानवाला आश्वस्त करतात.*
*मदमत्त त्रिपुरासूराने मानवाला.. देवादिकांना वेठीस धरले होते शिवाय त्याला मरणाचे भय नव्हते. त्याने तपस्येने ब्रह्मदेवाकडून अभयाचे वरदानही प्राप्त केले होते. पण तरीही सज्जन शक्तीला त्रास देणाऱ्या असूराचा अंत हा होतोच.*
*या त्रिपुरासूर दैत्याला शंकराने आजच्याच पौर्णिमेला नष्ट केले म्हणून आज भयमुक्तीची.. आनंदाने दिवे, काकडा लावून संपन्न त्रिपुरारी पौर्णिमा.*
*जीवनातील आनंदाचे मूळ दडलेय ते मानवी स्वभावात. लोभ.. मोह आणि अहंकार हे स्वभावातील त्रिपूर. त्यांच्यामुळे जीवनात दुःख निर्माण होत जीवन अंधकारमय होते. चांगल्या मनुष्याचाही असूर होतो. या जाणिवेसाठीच कथा आहेत.*
*लोभ.. मोह.. अहंकार हे दैत्याचे गुण. ते वाढले की सामान्य मनुष्यही दैत्य होतो. पण हे दैत्य गुण नष्ट झाले की जीवन उजळणारच. आज दैत्य गुणांचा अर्थात अवगुण नष्ट व्हावेत म्हणून शेकडो दिवे उजळणार. मंदिरांच्या दगडी दीपमाळातीलही दिवे हा अंधार नष्ट करणार. गावगंगेत दान केलेले.. वाहात जाणारे दिवे गावोगावाचा अंधार नष्ट करणार. अंधार कितीही असू दे.. पणतीच्या या लहानश्या वातीने लाखो दिवे लागणार. लाखोंचे जीवन उजळणार.*
*भगवान शंकराचे पुत्र कार्तिक यांचे दर्शन आज सर्वांना मिळणार. तर कोकणात आज देवदिवाळी साजरी होणार.*
*मानवाची काळजी परमेश्वर सदैव करतो. भगवान विष्णूंच्या अनुपस्थितीत मानवाचे रक्षण केले ते भगवान शंकरांनी. आज ते पुन्हा स्वगृही कैलासी परतणार. आज या दोघांची भेट होते म्हणून आज शिवाला तुळस तर विष्णूंना बेल वाहतात.*
*या त्रिपुरासूराला नष्ट केल्याने शंकराचे नाव पडले त्रिपूरारी. आज त्यांच्याकडे हीच प्रार्थना की या जगातील हे भयावह अंधारपर्व संपवून चराचर चैतन्याने उजळवून टाका. हे भोलेनाथा संकटाना दूर सारणारा अशी तुझी कीर्ती आहे.*
🌷🔱🌸🔆🙏🔆🌸🔱🌷
*_शंभो, शंकरा, करुणाकरा,_*
*_जग जागवा !_*
*_अंधार हा लोपवा_*
*_द्यावा प्रकाश नवा_*
*_चराचर उजळाया चैतन्याची_*
*_ज्योत चेतवा, हे शिवा !_*
*_सांब सदाशिव हे त्रिपुरारी, शंभो !_*
*_हे भवतारक दु:ख निवारी, शंभो !_*
*_संमार्जिली अंगणे_*
*_पान्हावली गोधने_*
*_आसावला आसमंत अमृताने_*
*_चिंब नाहवा, हे शिवा !_*
*_सांब सदाशिव हे त्रिपुरारी, शंभो !_*
*_हे भवतारक दु:ख निवारी, शंभो !_*
*_तू आपदा वारणारा_*
*_तू दु:खिता तारणारा_*
*_होई कृपावंत, विश्वातले आर्त,_*
*_अभयंकरा शांतवा, हे शिवा !_*
*_सांब सदाशिव हे त्रिपुरारी, शंभो !_*
*_हे भवतारक दु:ख निवारी, शंभो !_*
🌹🔱🌷🪔🌻🪔🌷🔱🌹
*गीत : सुधीर मोघे* ✍
*संगीत : सुधीर फडके*
*स्वर : अनुराधा पौडवाल*
*चित्रपट : थोरली जाऊ (१९८३)*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
‼ *ॐ नमः शिवाय* ‼
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*०७.११.२०२२*
🌻🪔🌸⚜🔱⚜🌸🪔🌻