Friday, 21 October 2022

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत

 

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

‘बळीराजा खचू नको..धैर्याने संकटाला समोरे जा..शासन आहे पाठीशी’

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबईदि. 20 : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. एकाच वेळी राज्यातील ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे २५०० कोटी रुपये जमा करण्यात आले. अशा प्रकारे एकाचवेळी थेट खात्यात रक्कम जमा करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे बळीराजाने खचून जाऊ नये, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

            दरम्यानशेतीच्या नुकसानीचे पंचनामे उपग्रह आधारित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करतानाच त्याची भरपाई ऑटोपायलट मोडच्या माध्यमातून देण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            राज्यातील शेतकरी बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणालेनियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा विषय असून त्याची तातडीने अमंलबजावणीही केली. शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून दिवाळी पूर्वी लाभाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश विभागाला दिले होते. त्यानुसार विभागाने तातडीने कार्यवाही केल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांचे अभिनंदन केले. शेतकरी केंद्रबिंदू मानून निर्णय घेतले आहेत. एनडीआरएफच्या दुप्पट निधी देणेनुकसान भरपाईसाठी दोनऐवजी तीन हेक्टरची मर्यादा करणेसततच्या पावसात निकषता न बसणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करणेरखडलेल्या सिंचन प्रकल्पांना मान्यता देऊन जास्तीत जास्त जमीन ओलीताखाली आणून शेतकरी बांधवांना दिलासा देणारे निर्णय या शासनाने घेतले आहेत.

            सध्या राज्यात परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने संकटाला सामोरे जा शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले कीया शासनाने पहिल्याच बैठकीत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणीही केली. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होण्यासाठी यावेळेस पहिल्यांदाच एका क्लिकवर निधी जमा करण्यात आला आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम जमा झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे कालपर्यंत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

            राज्य शासनाने शेती आणि शेतकऱ्यांसाठी विविध निर्णय घेतले असून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी उपग्रह आधारित यंत्रणा करण्यात येत आहे. त्यानंतर ऑटोपायलट मोड मध्ये विमा रक्कम मिळावी यासाठी तंत्रज्ञान तयार केले जात असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

८ लाख शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण - सहकार मंत्री अतुल सावे

            योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या आधारक्रमांकाचे प्रमाणीकरण करण्यात आले असून सध्या सुमारे ८ लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. त्यापैकी ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आज थेट रक्कम जमा करण्यात आल्याचे सहकार मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

            महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतून अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देणाऱ्या योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमास सहकार मंत्री अतुल सावेमहसूलमंत्री राधाकृष्ण विखे - पाटीलग्रामविकास मंत्री गिरीष महाजनकृषीमंत्री अब्दुल सत्तारबंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसेउद्योगमंत्री उदय सामंतउत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईआरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंतशिक्षण मंत्री दीपक केसरकरमुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व जिल्हाधिकारीलाभार्थी शेतकरी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. <span lang="EN-US" style="font-size: 12.0pt; font-family


 सांगितले. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

८ लाख शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण - सहकार मंत्री अतुल सावे

            योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या आधारक्रमांकाचे प्रमाणीकरण करण्यात आले असून सध्या सुमारे ८ लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. त्यापैकी ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आज थेट रक्कम जमा करण्यात आल्याचे सहकार मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

            महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतून अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देणाऱ्या योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमास सहकार मंत्री अतुल सावेमहसूलमंत्री राधाकृष्ण विखे - पाटीलग्रामविकास मंत्री गिरीष महाजनकृषीमंत्री अब्दुल सत्तारबंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसेउद्योगमंत्री उदय सामंतउत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईआरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंतशिक्षण मंत्री दीपक केसरकरमुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व जिल्हाधिकारीलाभार्थी शेतकरी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते

राज्यात 14 ते 20 नोव्हेंबर दरम्यान ‘बाल सप्ताह’ साजरा करणार

 राज्यात 14 ते 20 नोव्हेंबर दरम्यान बाल सप्ताह’ साजरा करणार

                                             सुशीबेन शहा

राईट टू प्ले’ सप्ताहाची संकल्पना

 

            मुंबईदि. 20 : बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी 14 ते 20 नोव्हेंबर 2022 दरम्यान राज्यात बाल सप्ताह’ साजरा करणार असल्याची माहिती राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा यांनी दिली.

            आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती शहा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या वरळीतील कार्यालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. प्राथमिक स्तरावर मुंबईत हा सप्ताह राबविण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला आयोगाचे सचिव उदय जाधवमुंबई शहरच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलारमुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी. एच. नागरगोजेजिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाणयुनिसेफच्या कार्यक्रम अधिकारी सायली मोहिते आदी उपस्थित होते.

            बाल सप्ताहाविषयी माहिती देतांना श्रीमती शहा म्हणाल्या कीबाल दिनानिमित्त १४ नोव्हेंबर रोजी बाल सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. बालकांसाठी राईट टु प्ले’ (खेळण्याचा अधिकार) हा या सप्ताहाची संकल्पना (थीम) असणार आहे. हा सप्ताह युनिसेफच्या सहकार्याने आयोजित केला जाणार आहे. राज्यातील बालकांच्या विशेषत: बालगृह आणि सीसीएफच्या मुलांमधील क्रीडागुणांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. या बालकांमध्ये खेळाबाबत प्रचंड इच्छाशक्ती असून त्यांना संधी देण्यासाठी संपूर्ण राज्यात बाल सप्ताह’ कार्यक्रम राबवून मुलांसाठी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे श्रीमती शहा यांनी सांगितले.

            बाल सप्ताहाच्या माध्यमातून मुलांना चांगली संधी मिळेल. राज्यातील मुलांसाठी एकत्र मिळून बालस्नेही महाराष्ट्र घडवू याअसे आवाहनही आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती शहा यांनी यावेळी केले.

००००

पवन राठोड/ससं/20.10.22

शिक्षकांनी दर्जेदार शिक्षणाद्वारे आदर्श पिढी

 शिक्षकांनी दर्जेदार शिक्षणाद्वारे आदर्श पिढी घडविण्याचे काम करावे

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबईदि. 20 :- शिक्षण हा शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून राज्याच्या शिक्षण विभागाचे काम पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने सुरू आहे. शिक्षण संस्थाचालक आणि शिक्षकांनी देखील दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांची आदर्श पिढी घडविण्याचे काम करावेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर निकषांची पूर्तता करणाऱ्या सर्व माध्यमांच्या शाळांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते इरादा पत्रे तथा मान्यता पत्रे देण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी संस्थाचालकांकडून दर्जेदार शिक्षणाची अपेक्षा व्यक्त केली. मंत्रालयातील परिषद सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओलसमग्र शिक्षा अभियान संचालक कैलास पगारेस्वयंअर्थसहाय्यित शाळाचालक आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीराज्याने देशाला अनेक नामवंत विद्वानविचारवंतशास्त्रज्ञशिक्षक दिले आहेत. भविष्यातील पिढी घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात. त्यामुळे त्यांचे स्थान आदराचे असून या कामी शिक्षण संस्थांचेही महत्वपूर्ण योगदान असते. शिक्षण हा वसा मानून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने सर्वांनी काम करावेशासन म्हणून आम्ही ठामपणे पाठिशी आहोतअसेही त्यांनी सांगितले.

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीराज्यात शिक्षणाचा विस्तार झाला आहे. तथापि, गुणवत्तावाढ होणे गरजेचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत गुणवत्ता पोहोचली पाहिजे. यासाठी शिक्षण क्षेत्र हा व्यवसाय नाही तर मिशन आहे असे समजून संस्थाचालकांनी आणि शिक्षकांनी काम करावे. याद्वारे नवीन पिढी घडविण्याचे राष्ट्रीय कार्य करायचे असून त्यातून चांगली समाजनिर्मिती होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न करालही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुढील वर्षी इरादापत्रे डिजिटली दिली जाणार आहेत. शिक्षण क्षेत्रातील पद्धती पारदर्शी करण्याचा प्रयत्न होत आहेयाबद्दल त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि विभागाचे अभिनंदन केले.

            शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रास्ताविकात शिक्षण हे पवित्र क्षेत्र असल्याचा उल्लेख करून विभागाचे कार्य पारदर्शक आणि गतिमान करणार असल्याचे सांगितले. ज्या संस्था पात्र आहेत त्यांना मान्यता मिळणार आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यावर शासनाचा भर आहे. त्याचबरोबर उद्याची पिढी गुणवान घडवायची असल्याने संस्थांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावेअसे सांगून महाराष्ट्र विविध क्षेत्रात अग्रस्थानी आहे. शिक्षण क्षेत्रातही अग्रस्थानी राहण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूयाअसे आवाहन त्यांनी केले.

00000

राज्यात 14 ते 20 नोव्हेंबर दरम्यान ‘बाल सप्ताह’

 राज्यात 14 ते 20 नोव्हेंबर दरम्यान बाल सप्ताह’ साजरा करणार

                                             सुशीबेन शहा

राईट टू प्ले’ सप्ताहाची संकल्पना

 

            मुंबईदि. 20 : बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी 14 ते 20 नोव्हेंबर 2022 दरम्यान राज्यात बाल सप्ताह’ साजरा करणार असल्याची माहिती राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा यांनी दिली.

            आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती शहा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या वरळीतील कार्यालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. प्राथमिक स्तरावर मुंबईत हा सप्ताह राबविण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला आयोगाचे सचिव उदय जाधवमुंबई शहरच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार<


पोलीस स्मृतिदिनानिमित्त






 पोलीस स्मृतिदिनानिमित्त शहिदांना अभिवादन

 

            मुंबई, दि. 21 :कर्तव्य बजावतांना शहीद झालेल्या पोलिसांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

            नायगावच्या पोलीस मुख्यालयातील मैदानात झालेल्या हुतात्मा दिन मानवंदना व संचलन कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरमुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवगृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमयेपोलीस महासंचालक रजनीश सेठमुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

            कर्तव्यावर असताना हौतात्म्य आलेले पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्मरण दरवर्षी 21 ऑक्‍टोबर रोजी करण्यात येते. मागीलवर्षी देशभरात विविध पोलीस दलांतील 62 अधिकारी व 202 कर्मचारी शहीद झाले आहेत. या पोलीस स्मृतिदिनाच्या निमित्ताने वीरमरण आलेल्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मृतिंना अभिवादन करून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्मरण केले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी कार्यक्रमाला उपस्थित विविध देशांचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस शहिदांच्या कुटुंबियांची  भेट घेतली.

००००

ग्रामीण उद्योजकांच्या वस्तुंना मोठी मागणी

 ग्रामीण उद्योजकांच्या वस्तुंना मोठी मागणी

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली प्रदर्शनाला भेट

 

            मुंबईदि. 20 : ग्रामीण भागातील उद्योजकांना प्रोत्साहन देणारे मंत्रालयाच्या प्रांगणात आयोजित प्रदर्शनाला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग विभागाच्यावतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामीण भागातील उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला मंत्रालयातील अधिकारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे.

               स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्तानेमहाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग विभागाच्यावतीने दि. 18 ते 21 ऑक्टोबरपर्यंत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

            प्रदर्शनाला भेट देतांना ग्रामीण कारागिरांनी लाकडाच्या माध्यमातून तयार केलेल्या महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याचे सुताने तयार केलेला हार अर्पण करुन मंत्री श्री. सामंत यांनी अभिवादन केले. या प्रदर्शनात राज्यभरातून  सहभागी झालेल्या उद्योजकांशी त्यांनी संवाद साधला. मतिमंदअपंग मुलांनी तयार केलेल्या सुबक पणत्याशोभेच्या वस्तूकागदी फुले आणि महिला उद्योजकांनी तयार केलेले खाद्य पदार्थमसाल्याचे पदार्थमधसाबण आणि सुगंधीत उटण्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.

            राज्यातील अमरावतीजळगावसांगलीसातारावर्धारायगडपालघर आदी जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील उद्योजक या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. महाबळेश्वर येथील मध व वर्धा येथील सेवाग्रामची खादी तसेच लाकडी वस्तूमसालेदेशी गाईचे तूपतांब्यावरील नक्षीकाम केलेली भांडीदिवाळीसाठी लागणाऱ्या शोभेच्या वस्तूसाबण व इतर  गृहपयोगी वस्तु या प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

***

अर्चना शंभरकर/ विसंअ/ उद्योग


 

Featured post

Lakshvedhi