Friday, 21 October 2022

ग्रामीण उद्योजकांच्या वस्तुंना मोठी मागणी

 ग्रामीण उद्योजकांच्या वस्तुंना मोठी मागणी

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली प्रदर्शनाला भेट

 

            मुंबईदि. 20 : ग्रामीण भागातील उद्योजकांना प्रोत्साहन देणारे मंत्रालयाच्या प्रांगणात आयोजित प्रदर्शनाला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग विभागाच्यावतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामीण भागातील उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला मंत्रालयातील अधिकारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे.

               स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्तानेमहाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग विभागाच्यावतीने दि. 18 ते 21 ऑक्टोबरपर्यंत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

            प्रदर्शनाला भेट देतांना ग्रामीण कारागिरांनी लाकडाच्या माध्यमातून तयार केलेल्या महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याचे सुताने तयार केलेला हार अर्पण करुन मंत्री श्री. सामंत यांनी अभिवादन केले. या प्रदर्शनात राज्यभरातून  सहभागी झालेल्या उद्योजकांशी त्यांनी संवाद साधला. मतिमंदअपंग मुलांनी तयार केलेल्या सुबक पणत्याशोभेच्या वस्तूकागदी फुले आणि महिला उद्योजकांनी तयार केलेले खाद्य पदार्थमसाल्याचे पदार्थमधसाबण आणि सुगंधीत उटण्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.

            राज्यातील अमरावतीजळगावसांगलीसातारावर्धारायगडपालघर आदी जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील उद्योजक या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. महाबळेश्वर येथील मध व वर्धा येथील सेवाग्रामची खादी तसेच लाकडी वस्तूमसालेदेशी गाईचे तूपतांब्यावरील नक्षीकाम केलेली भांडीदिवाळीसाठी लागणाऱ्या शोभेच्या वस्तूसाबण व इतर  गृहपयोगी वस्तु या प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

***

अर्चना शंभरकर/ विसंअ/ उद्योग


 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi