सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 5 October 2022
शुभेच्छा
विजया दशमीनिमित्त
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा
मुंबई, दि. 4: विजयादशमीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
विजयादशमीच्या पावनपर्वात समाजातील दृष्ट प्रवृत्तींचा नाश व्हावा आणि चांगल्या प्रवृत्तीचे सृजन व्हावे, अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, विजयादशमी हा आपल्या संस्कृतीतील अतिशय महत्त्वाचा सण आहे. लोकभावनेला अभिव्यक्त करण्यात आपल्या सणांचे खूप मोठे योगदान आहे. विजयादशमी हा सण समाजातील चांगुलपणाचा, मांगल्याचा तसेच दुष्ट प्रवृत्ती आणि अवगुणावर विजय आहे. या पावनपर्वानिमित्त समाजात चैतन्याला उधाण येते. राज्यातील जनतेला सुख-समृद्धी लाभावी तसेच यानिमित्ताने दुःख, नकारात्मकता यांचे सीमोल्लंघन होऊन आनंद व सकारात्मकता सर्वांना लाभावी.
००००
आपटा आणि त्याचे उपयोग
आपटा आणि त्याचे उपयोग
आपटा ह्या झाडाची पाने दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून वाटतात. तसेच ह्याच्या पानाच्या विड्या करून त्या ओढतात.
◆लघवीला जळजळ, दुखत असेल तर.
लघवीच्या वेळी कळ,कंड, जळजळ होत असेल, तर आपट्याच्या पानांचा रस,आपट्याच्या पानांचा रस निघत नाही म्हणून पाणी घालून तो वाटून काढावा.हा रस 20 ग्रॅम काढून त्या रसाइतकेच दूध व साखर घालावी व हे औषध दिवसातून वयोमानाप्रमाणे चार वेळा घ्यावे. लघवी साफ सुटून सर्व विकार थांबतात. लघवीतून खर पडत असेल तर आपट्याच्या कोवळ्या तुऱ्यांचा किंवा पानांचा रस काढून 1चमचा सांजसकाळ घ्यावा, खर जाण्याची थांबते.आपट्याच्या शेंगा मूत्रल आहेत. पाण्यात उकळून साखरेबरोबर दिवसातून दोन तीन वेळ प्यायल्याने लघवीस साफ होते.
गंडमाळा, गंडरोग, गालगुंड व कंठरोग
गंडमाळा, गंडरोग, गालगुंड व कंठरोग झाला असता तसेच आपट्याच्या 40 ग्रॅम सालीचा अर्धा लिटर पाण्यात अष्टमांश काढा मंदाग्नीवर शिजवून आणि तो गार झाल्यावर मध घालून वयोमानाप्रमाणे सोसवेल एवढा प्यावा. गंड माळेवर आपट्याची साल बांधावी. गंडमाळा व गळ्याचे व्रण बरे होतात.
◆व्रणावर
व्रणावर आपट्याची साल बांधावी.चाळीस ग्रॅम आपट्याच्या सालीचा काढा गार झाल्यावर मध टाकून पोटात घ्यावा.त्यामुळे जीर्ण व्रण बरे होतात
◆नैसर्गिक डिलीव्हरी अन् गरोदरपणात लवकर सुटका होण्यासाठी गरोदरबाई अडली असेल तर आपट्याचे झाडास नमस्कार करून मुंज झाली नाही अशा मुलाकडून अगर लग्न झाले नाही अशा अविवाहिताकडून आपट्याची पाने काढून ती गरोदर बाईच्या अंगावरून बराच वेळ फिरवावी. ताबडतोब प्रसूत होते.
◆हृदयाची सूज
आपट्याच्या मुळाच्या सालीचा काथ हृदयाची सूज ओसरण्यास मदत करतो. मुळाची साल 10 ग्रॅम दोन भांडी पाण्यात उकळावी. अर्धा भांडे बाकी राहिल्यावर मिश्रण उतरवावे. मग ते गाळून प्यावे.
◆पोटातील मुरडा बरा होण्यासाठी
मधाबरोबर आपट्याची सुक्या काळ्या फुलांचे चूर्ण 10 ग्रॅम साखरेबरोबर घेतल्यास पोटातील मुरडा बरा होतो.
◆कृमीनाशक
आपट्याचे बीसुद्धा उपयुक्त आहे. बियांचे बारीक चूर्ण करून ते गाईच्या साजूक तूपात घोटून त्याचे मलम करावे जे जीवाणूंचे तसेच कीटक दंशस्थानी लावल्यास बरे वाटते.
◆लहान मुलांच्या पोटात कृमी झाले तर
आपट्याच्या बीचे घृत पोटात घ्यावे. कृमी शौचावाटे बाहेर पडण्यास मदत होते. कृमिवर पण उपयोगी आहे.
अशाप्रकारे हिंदू दसऱ्याच्या सणात विशेष महत्व असलेला आपटा आयुर्वेदियदृष्ट्यासुद्धा महत्वाचा आहे.
🙏🏻 *लक्षवेधी*
*सदर माहितीचे कॉपीराइट्स नितीन जाधव यांचे नावे असून त्यांचे नाव खोडून माहिती फॉरवर्ड केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.*
┈┉┅━━━ ❀꧁ω❍ω꧂❀━━━┅┉┈
*वरील माहीती बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही वैयक्तिक आम्हाला प्रश्न विचारू शकता. तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करू!!*
┈┉┅━━━ ❀꧁ω❍ω꧂❀━━━┅┉┈
╔══╗ संकलन: नितीन जाधव
║██║ स्रोत:- निसर्ग उपचार
╚══╝ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ +९१९०८२५५६६९४
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █
🥀 ᵃᵃºˢᵃi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ
◆नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!
धम्मचक्र प्रवर्तन दिन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा
मुंबई, दि. 4 : धम्मचक्र प्रवर्तन दिन हा सामाजिक क्रांतीचे सोनेरी पान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्त त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन केले आहे.
‘तथागतांचा मानव कल्याणाचा विचार आणि पंचशील अनुसरण यामध्ये समाज परिवर्तनाची महान शक्ती आहे. तथागतांच्या धम्मचक्र प्रवर्तनाचा संदेश घेऊनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोट्यवधींच्या जीवनात नवी पहाट आणली. हा दिवस आपल्यासाठी सामाजिक क्रांतीचे सोनेरी पान आहे. या निमित्ताने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन,’असेही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...






