Tuesday, 4 October 2022

अर्थविधी

 


जरा विसावू या वळणावर

 *सत्तरीच्या वाटेवर...*


एकदा एका साठी ओलांडलेल्या आणि सत्तरीच्या वाटेवर असणाऱ्या मित्राला त्याच्या मित्राने विचारले, "मित्रा, साठी ओलांडल्यावर आणि सत्तरीकडे जाताना तुझ्यात काय बदललंय असे तुला वाटतंय?" त्यानंतर त्या मित्राने जे उत्तर दिले ते आपल्यातील प्रत्येकाने समजून घेतलं तर प्रत्येकांसाठी आपले म्हातारपण सुसह्य होईल हे निश्चित! त्याने जे उत्तर दिले ते असे...


१. आजवर मी माझ्या आईवडीलांवर, भा्वंडांवर, मुलांवर, बायकोवर, सहकार्यावर, शेजाऱ्यापाजाऱ्यांवर, मित्रांवर खूप प्रेम केले, त्यांची खूप काळजी घेतली, पण आता मी स्वतःवर प्रेम करायला लागलोय, आता मी स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केलीय.

२. मला याची जाणीव झालीय की, आता मी शारिरीक किंवा मानसिकदृष्ट्या इतका सक्षम राहिलो नाही की कुणीही यावं आणि त्यांनी आपले ओझे माझ्या खांद्यावर टाकावे.

३. आता मी भाजीवाल्याशी, फळविक्रेत्याशी, फेरीवाल्याशी घासाघीस करायच सोडून दिलंय. उलट आता मला असे वाटतंय की माझ्या काही पैश्याने त्यांच्या मुलांचे शिक्षण होणार असेल किंवा त्याची गरीबी दूर होणार असेल तर चांगलेच होईल ना! 

४. आता मी माझ्या जीवनसंघर्षाच्या कहाण्या इतरांना सांगण्याचे आणि सल्ले देण्याचे बंद केलय. कारण एकतर त्या सगळ्यांना सांगून झाल्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या कालबाह्य झाल्या असाव्यात. माझ्या त्या संदर्भांचा आजच्या पिढीला किती उपयोग होईल हे माझे मलाच माहीत नाही.

५. आता मी कुणाला त्याच्या चुका सांगण्याच्या किंवा काय बरोबर आणि काय चुकीचे हे सांगण्याच्या भानगडीत पडत नाही.‌ कारण सगळ्यांना सुधारण्याची जबाबदारी माझी एकट्याची नाही हे मला कळून चुकलय. आता मला इतरांच्या परफेक्शनपेक्षा मला माझी शांतता अधिक महत्वाची वाटते. 

६. आता मी समोरच्याच्या चांगल्या गोष्टीसाठी त्याला निख्खळ दाद द्यायला आणि त्याचे कौतुक करायला शिकलोय. त्याने समोरच्याला बरे वाटते, तो सुखावून जातो.

७. आता माझ्या अंगावरच्या कपड्यांची घडी चुरगाळलेली असेल किंवा शर्टावर एखादा डाग पडला असेल तर त्याचा मला खूप फरक पडत नाही. जे लोक मला अंतर्बाह्य ओळखतात त्यांच्यासाठी माझा पेहराव फार महत्वाचा नाही हे मला कळून चुकलय.

८. ज्यांना माझी किंमत नाही अशांना मी आता दुर्लक्ष करतो. कारण त्यांना माहित नसली तरी मला माझी किंमत चांगली माहिताय.

९. माझ वय कुरघोड्या करण्याचे राहीले नाही. एखाद्याला जाणून बुजून संकटात सोडून देवून गंमत बघण्याचे वय राहीले नाही.

१०. आता मला माझ्या भावना व्यक्त करायची लाज वाटत नाही. भावना असणं हे जीवंतपणाचे लक्षण आहे. आता हसावस वाटलं की हसून घ्यायचं आणि रडावसं वाटलं की रडून घ्यायचं. भावना लपवण्याच्या नादात उगाच घुसमटत रहायचं नाही.

११. आपला अहंकार आपल्या नात्याच्या आड येणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतो. प्रसंगी मला थोडा कमीपणा घ्यायला लागला तरी मी एकवेळ तडजोड करतो, पण स्वतःचा स्वाभिमान सांभाळून! कारण नाते टिकवण्याची जबाबदारी कुणा एकाची असूच शकत नाही.

१२. आता मी येणारा प्रत्येक क्षण सर्वार्थाने जगण्याचा प्रयत्न‌ करतो. मला जे करावसं वाटत ते मी करतो. फक्त एवढंच की, माझ्या स्वछंदी जगण्याचा इतरांना त्रास होणार नाही याची मी काळजी घेतो. 

१३. मला माहित आहे की, जे मी आजवर जगलोय त्यापेक्षा आता माझ्याकडे वेळ फार कमी आहे. त्यामुळे आज मी ना भूतकाळात जाऊन पश्चात्ताप करत बसत, ना भविष्यकाळात जाऊन चिंता करत बसत... आता निख्खळ आणि निख्खळ जीवनाचा आनंद घ्यायचा आणि जेवढा इतरांना देता येईल तितका द्यायचा...

* ज्या व्यक्तीने माझ्यासाठी घरदार, बायको लेकरांना वेळ दिला नाही, त्या व्यक्तीला मी कसलंच सहकार्य करू शकलो नाही. हे ही आठवून मरताना पश्चात्ताप होत असलेली भावना मनात येते. * आज माझं उर्वरीत आयुष्य पैशे मिळवण्यासाठी नसून परोपकारासाठी असल्याची भावना मनात निर्माण झाली आहे. ** आज उतारवयात लक्षात आले की, संकटात असलेल्या व्यक्तीला मदत नाही केली तर तो तक्रार न करता देवासमोर जावून रडतो. त्याचा तळमळलेल्या आत्म्याचा आवाज कानात ऐकू येत असलेली भावनाही मनात येते.

खरच, वर दिलेल्या एका मित्राच्या उत्तरातून आपण काही समजून घेतलं तर आपल्यातील प्रत्येकाला किती छान जीवन जगता येईल ना? 

*आत्ता या वयात कळले जीवन सुंदर आहे. पण सरळमार्गी जगणाऱ्या व्यक्तीचे आहे.*

सावधान


 

Monday, 3 October 2022

भुढापे मे भी खतरा

 


लम्पी बाधित

 राज्यातील लम्पी बाधितांपैकी 50 टक्के पशुधन रोगमुक्त

- पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह

 

            मुंबईदि. 3 : राज्यामध्ये दि. 3 ऑक्टोबर 2022 अखेर 31 जिल्ह्यांमधील 2151 गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील 48,954 बाधित पशुधनापैकी 24,797  म्हणजे सुमारे 50 टक्के पशुधन रोगमुक्त झाल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

            श्री. सिंह यांनी सांगितले कीराज्यातील बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर 109.31 लाख लस मात्रा  उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधून 105.62 लाख जनावरांना मोफत लसीकरण करण्यात आले आहे. अकोलाजळगांवकोल्हापूरवाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज सोमवार दि. 3 ऑक्टोबर रोजी 6 लाख लस मात्रा प्राप्त झाल्या आहेत. खासगी संस्थासहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण या आकडेवारी नुसार सुमारे 75.49 % गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले आहे.

            राज्यात दि. 3 ऑक्टोबर अखेर जळगाव 326, अहमदनगर 201, धुळे 30, अकोला 308, पुणे 121, लातूर 19, औरंगाबाद 60, बीड 6, सातारा 144, बुलडाणा 270, अमरावती 168, उस्मानाबाद 6, कोल्हापूर 97, सांगली 19, यवतमाळ 2, सोलापूर 22, वाशिम 28, नाशिक 7, जालना 12, पालघर 2, ठाणे 24, नांदेड 17, नागपूर 5, हिंगोली 1, रायगड 4, नंदुरबार 15 व वर्धा अशा एकूण 1916 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. पशुपालकांनी भीती न बाळगता आवश्यक खबरदारी घ्यावीअसे त्यांनी सांगितले.

            लक्षणे दिसल्यानंतर वेळेतच उपचार सुरू झाल्यास लम्पी आजाराचा सामना करता येतो. या आजारात मृत्यूची शक्यता अत्यंत कमी असून बहुतांश पशु उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. लम्पीचा प्रादुर्भाव पाहता सर्व पशुपालकांनी संभाव्य लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावाअसे आवाहन श्री. सिंह यांनी केले आहे.

            लम्पी आजाराबाबत विभागाच्या काही सेवांची आवश्यकता वाटत असल्यास अथवा माहिती द्यायची असल्यास संबंधितांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना / तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय / जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त स्तरावर किंवा पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र. १८०० - २३३० - ४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र.१९६२ तत्काळ संपर्क साधावाअसेही आवाहन आयुक्त श्री. सिंह यांनी केले आहे.

000000

पोटनिवडणूक - 2022 अंधेरी पूर्व

 अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाकरिता

पोटनिवडणूक - 2022 कार्यक्रम जाहीर

 

            मुंबईदि. 3 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या 166-अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या  एक जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे 3 ऑक्टोबर 2022 पासून अंधेरी (पूर्व) या विधानसभा क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीकरिता मतदान गुरूवारदिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे.

            निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक – 7 ऑक्टोबर 2022 (शुक्रवार)नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – 15 ऑक्टोबर 2022 (शनिवार)नामनिर्देशन पत्रांची छाननी – 15 ऑक्टोबर 2022 (शनिवार)उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2022 (सोमवार)मतदानाचा दिनांक – 3 नोव्हेंबर 2022 (गुरुवार)मतमोजणीचा दिनांक – 6 नोव्हेंबर 2022 (रविवार) आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक - 8 नोव्हेंबर 2022 (मंगळवार) आहे.

            या पोटनिवडणुकीसाठी दि. 1 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध झालेली मतदार यादी वापरण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकीत मतदानासाठी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. मतदारांची ओळख पटावी यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मतदार कार्ड वापरता येईल. तथापिज्या मतदारांकडे मतदार कार्ड नसेल त्यास आयोगाने निश्चित केलेल्या 9 ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र मतदानावेळी जवळ बाळगणे आवश्यक आहे.

            या पोटनिवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यासंदर्भातील माहिती वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर देणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर उमेदवार ज्या पक्षाकडून प्राधिकृत आहेत्या पक्षालाही संबंधित उमेदवाराची निवड का केली याबाबतची माहिती वृत्तपत्रेदूरचित्रवाणी आणि पक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले आहे.

०००

संजय ओरके/विसंअ/3.10.22


 


नेतृत्व विकास, आर्थिक व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण

 मौलाना आझाद महामंडळातील कर्मचाऱ्यांना

नेतृत्व विकासआर्थिक व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण

 

            मुंबईदि. 3 : जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नुकताच नेतृत्व विकास प्रशिक्षण आणि आर्थिक जोखीम व्यवस्थापन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नेतृत्वप्रेरणाआव्हानात्मक परिस्थितीत व्यवस्थापकीय निर्णय क्षमता विकसित करणेआर्थिक निरोगीपणाजोखीम व्यवस्थापन पद्धती आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

            अल्पसंख्याक विकास विभागाच्या तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव जयश्री मुखर्जी यांच्या हस्ते या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. जमनालाल बजाज संस्थेचे संचालक प्रा. डॉ. श्रीनिवासन आर. अय्यंगारमहामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

            प्रा. डॉ. अय्यंगार यांनी जमनालाल बजाज संस्थेमार्फत आयोजित केलेल्या काही प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती दिली. ते म्हणालेजमनालाल बजाज संस्थेने नेहमीच गुणवत्तेला महत्त्व दिले आहे. सध्याचा प्रशिक्षण कार्यक्रम महामंडळाच्या आवश्यकतेनुसार तयार करण्यात आला आहे. सहभागींना हा कार्यक्रम अतिशय नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त वाटेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            डॉ. शेख यांनी महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांबाबत माहिती सांगितली.  महामंडळाच्या विविध समस्या आणि आव्हानांचा उल्लेख केला. जमनालाल बजाज संस्थेच्या सहकार्यातून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाद्वारे महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्याबरोबरच त्यांचे अधिक सक्षमीकरण होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            महामंडळातील अधिकारी - कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण यशस्वी केल्याबद्दल डॉ. शेखप्रा. डॉ. अय्यंगारयांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

0000

इरशाद बागवान/विसंअ/3.10.22


 

Featured post

Lakshvedhi