है प्राणी शहरात घुसले की माणसे महत्वाची,मात्र पोटार्थी आदिवासी जंगलात सरपण गोळा करायला गेली व वन्य प्राण्यांचे भक्षस्थानी पडलेतर तर वन्य प्राणी yanchvar या चेवर अतिक्रमण. आणि हया वन्य जीवांना पाहणीसाठी तिकीट लावून उत्पन्न घेतले जाते, शेवटीं निरुपद्रवी प्राणी आदिवासी, हरीण, भक्ष बनवव्याचे.आणि श्रीमंतांचे शौक पूर्वावाचे. . त्यांना गाडीत बसवून जंगल सफर घडवून आणायची.त्या हिंस्त्र प्राण्या साठी इतर प्राणाचा बळी द्यायचा. शेवटी काय तर सृष्टी मध्ये उपद्रवी यांचा सन्मान.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 18 September 2022
सिंह महत्त्वाचा की आफ्रिकेतील चित्ता?की आदिवासीं
भारतीय सिंह महत्त्वाचा की आफ्रिकेतील चित्ता?
(भवतालाच्या गोष्टी ५६)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आफ्रिकी चित्ता आज भारतात आणण्यात आला. भारतातून नामशेष झाल्यातर ७० वर्षांनी चित्ता भारतात आणला, त्याचे मध्य प्रदेशमधील कुनो राष्ट्रीय उद्यानात पुनर्वसन केले जाणार आहे. या प्रकल्पाच्या केवळ जमेच्या बाजू दाखवून माध्यमे जल्लोष करत आहेत. पण ते अर्धसत्य असून, वस्तुस्थिती त्याच्यापलीकडे कुठेतरी आहे...
* आपल्यासाठी केवळ भारतात शिल्लक असलेल्या आशियाई सिंहाचे संवर्धन महत्त्वाचे की आफ्रिकेतील चित्त्याचे?
* हा ग्लॅमरस प्रकल्प राबवून आपण भारतातील वनांच्या, वन्यजीवांच्या मूलभूत प्रश्नांकडे सोयीस्कर डोळेझाक करत आहोत का?
* हा प्रकल्प राबवताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांना धाब्यावर बसवले जात आहे का?
...असे अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात.
संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-
https://bhavatal.com/Lion-or-
Cheetah
(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ५६ वी गोष्ट.)
भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com
इतरांसोबत शेअरही करा.
--भवतालBhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
जयघोष*शिवरायांचा
हैद्राबादच्या परेड ग्राऊंडवर शिवरायांचा जयघोष*
*महाराष्ट्राच्या ढोल ताशांनी परेडमध्ये मने जिंकली*
*सरदार पटेलांच्या निजामावरील पोलीस ॲक्शनप्रमाणेच प्रधानमंत्री, गृहमंत्र्यांची कश्मीरमधून ३७० कलम हटविण्याची हिम्मत*
*--- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*
मुंबई दि 18: कश्मीर मधून 370 कलम हटविण्याची हिंमत प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांनी दाखविली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हैद्राबाद मुक्ती संग्रामानिमित्त काल हैद्राबाद येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाला उपस्थितांनी दाद दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठी मधून आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या, त्यावेळी येथील परेड ग्राऊंडवर टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
काल सकाळी औरंगाबाद येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री हैद्राबाद येथे पोहचले आणि त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी आयोजित केलेल्या हैद्राबाद मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.
या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.
*शिस्तबद्ध, आकर्षक परेड*
प्रारंभी महाराष्ट्र तेलंगणा आणि कर्नाटक अशा तीनही राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी दर्शकांची मने जिंकून घेतली. विशेषतः महाराष्ट्राच्या ढोल ताशाच्या पथकांनी तर वातावरणात चैतन्य निर्माण केले. यावेळी आदिलाबादच्या पथकांनी लांबाडी तसेच गुसाडी, चिडूतालु, कोलाटम ही नृत्ये सादर केली. कर्नाटक पथकाने डोला कुनिथा बँड वाजविला. परेडमध्ये लष्कराच्या दलांनी, एनसीसी विद्यार्थ्यांनी देखील संचालन केलं आणि वाहवा मिळविली.
1948 मध्ये निजामाच्या विरुद्ध पोलीस ॲक्शन द्वारे कारवाई करत तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैद्राबाद संस्थानाला स्वतंत्र करून देशात विलीन केले हा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले की, सध्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कश्मीर मधून 370 कलम हटविण्याची हिंमत दाखविली आहे.
मुख्यमंत्री आपल्या छोटेखानी भाषणात म्हणाले की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यावर माझा पहिला कार्यक्रम होता देशव्यापी हर घर तिरंगा मोहीम . राज्यातल्या अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकावून आम्ही ही मोहीम यशस्वी करून दाखवली. आज देशात पहिल्या प्रथमच केंद्र सरकारने हैदराबाद राज्याचा मुक्तिसंग्राम कार्यक्रम सुरू करून, हा मुक्ती संग्राम नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा मोठा प्रयत्न केला आहे आणि आम्हाला याचा अभिमान आहे. हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिन मराठवाड्यामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेला लढा आजही आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
हैदराबाद मुक्तिसंग्राम हा निजामासारख्या क्रूर शासकापासून मुक्ती मिळवण्याचा दिवस आहे. हा दिवस म्हणजे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना नमन करण्याचा आहे असेही मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले.
बाबी पावडर जॉन्सन ban
जॉन्सन बेबी पावडर मुलुंडचा**उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द*
मुंबई दि.18: अन्न व औषध प्रशासन विभागाद्वारे मे. जॉन्सन अँड जॉन्सन प्रा.लि. या बहुराष्ट्रीय कंपनीने उत्पादित केलेल्या 'जॉन्सन बेबी पावडर' या सौंदर्य प्रसाधनांचा परवाना 15 सप्टेंबर 2022 पासून कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक व पुणे येथील औषध निरीक्षकांनी तपासणी साठी नमुने घेतले होते. शासकीय विश्लेषक, औषध नियंत्रण प्रयोगशाळा, मुंबई यांनी बेबी पावडरचे उत्पादन अप्रमाणित घोषित केल्याने ही कारवाई करण्यात आली.
'जॉन्सन बेबी पावडर' चा प्रामुख्याने नवजात बाळासाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. वरील उत्पादन पध्दतीमध्ये दोष असल्यामुळे सदर उत्पादनाचा सामू ( PH) हा प्रमाणित मानकानुसार नाही. त्याच्या वापरामुळे नवजात शिशु व लहान मुलांच्या त्वचेस हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे उत्पादन सुरु ठेवणे हे जनहिताच्या दृष्टीने योग्य होणार नाही, त्यामुळे मुलुंड, मुंबई या उत्पादन कारखान्याचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
वरील अप्रमाणित घोषित नमुन्याच्या अनुषंगाने संस्थेची अनुज्ञप्ती रद्द का करण्यात येऊ नये ?अथवा नमूद केलेल्या परवान्या अंतर्गत मंजूर असलेल्या सौंदर्य प्रसाधनांची उत्पादन अनुमती निलंबित का करु नये? याबाबत कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. संस्थेस या उत्पादनाचा साठा बाजारातून परत बोलावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. वरील नमुन्याचे प्राप्त शासकीय विश्लेषकाचे अहवाल मान्य करण्यात आले नाहीत म्हणून संस्थेने औषध प्रयोगशाळेकडून फेरचाचणी होण्यासाठी नाशिक व पुणे न्यायालयात अर्ज केला होता.
केंद्रीय औषध प्रयोगशाळेकडून सदरील फेरचाचणी नमुन्यांची चाचणी होऊन संचालक, केंद्रीय औषध प्रयोगशाळा, कलकत्ता यांनी अहवाल अप्रमाणित घोषित केल्याने परवाना रद्दची कारवाई करण्यात आली..अशी माहिती गौरीशंकर ब्याळे,सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई यांनी दिली.
..................
My आर्मी,support
Small Request 🙏🏼फॉर my army
Please forward on your groups. Its a small step to help our Army 🙏🏼
Bisleri and Aquafina are the foreign companies.
The money spent on buying this water goes to other countries from Bharat.
INDIAN ARMY PERSONNEL HAVE A SMALL REQUEST:
While travelling or while shopping, demand for "SENA JAL" (ARMY WATER).
This SENA JAL is almost available at all the places (even at wholesale).
Army Wives Welfare Association of Indian Army has introduced SENA JAL. This is started by Madhulika Rawat, wife of Late General Vipin Rawat. The pack is available in half litre and one litre pack.
Cost of half litre ₹.6/-
One litre ₹.10/- only.
Other companies are selling water at ₹.20/- per litre!
The profits earned from the sale of SENA WATER is sent to Military Welfare Committee & the money is utilized on the Martyr Soldiers Families and Education of their Children!
The SENA JAL is produced by Indian Army, hence there is no news or canvassing on TELEVISION or by ANY MEDIA. This is one of the reason to sell the SENA WATER at a low rate. Very few people know about this since there is no canvassing!
Whenever you want to buy packed drinking water, ask for SENA JAL with the shop vendor!
If we are proud about our nation, please share this message widely to spread every where!
JAI HIND 🇮🇳
विचार
✍️ *तुम्हाला तुमच्या क्षेत्रात* *टिकायचे असेल तर...*
*तुमच्यावर होणारी टिका तुम्हाला* *सहन करावीच लागेल.*
*कारण स्तुती व्यक्तीला सुस्त बनवते* *तर..*
*टिका व्यक्तीला खडबडुन जागं करते.*
🙏 *शुभ दिवस* 🙏
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...




