Thursday, 15 September 2022

ट्रान्स हार्बर लिंक

 मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्याकामाचीमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

रायगड जिल्ह्यातील चिर्ले परिसरात निर्माण होणार नविन ग्रोथ सेंटर

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबईदि. 14 : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम ८४ टक्के पूर्ण झाले आहे. पुढील वर्षी डिसेंबरपूर्वी हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यामाध्यमातून रायगड जिल्ह्यातील चिर्ले जवळील पेणपोयनाड परिसरात ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. लॉजिस्टिक्स पार्कटाऊनशिप आणि रोजगार निर्मिती या तीन बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार असून त्यामाध्यमातून याभागाचा सूनियोजितपणे विकास होईलअसा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

            शिवडी येथून सुरू झालेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष सागरी सेतूवर जावून कामाचा आढावा घेतला. यावेळी एम एम आर डी एचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी कामाबाबत माहिती दिली.

दिवसाला एक लाख वाहनांची ये-जा करण्याची क्षमता

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेमुंबईला रायगड जिल्ह्याशी थेट जोडणारा हा २२ किमी लांबीचा देशातील सर्वाधिक मोठा पहिला सागरी सेतूमार्ग आहे. या सागरी सेतूवरून दिवसाला किमान एक लाख वाहनांची ये-जा करण्याची क्षमता असून नागरिकांच्या वेळेची तसेच इंधनाची मोठी बचत होईल. प्रदूषण विरहित असा हा प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचे काम करताना पर्यावरणासोबतच फ्लेमिंगोंची देखील काळजी घेण्यात आली असून गेल्या वर्षीपेक्षा यंदा जास्त फ्लेमिंगो आल्याचे त्यांनी सांगितले. या सागरी सेतूमुळे मुंबई ते रायगड जिल्ह्यातील चिर्ले हे अंतर केवळ १५ ते २० मिनिटात पार करणे शक्य होईलअसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

एम टी एच एल प्रकल्प ईस्टर्न फ्री वेला जोडणार

            राज्याच्या सकल उत्पन्नात सर्वाधिक वाटा मुंबई महानगर क्षेत्रातून येत असून या भागातील नागरिकांना हा  प्रकल्प फायदेशीर ठरणार आहेअसे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,  मुंबई ट्रान्स हार्बर लिंक चिर्ले गावाजवळून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाला जोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर हा प्रकल्प ईस्टर्न फ्री वे ला जोडणार असल्याने थेट रायगडच्या दिशेने प्रवास करणे शक्य होणार आहे. शिवाय मुंबई - वरळी कोस्टल रोड देखील शिवडी वरळी कनेक्टरमार्गे हा प्रकल्प जोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

ओएसडी जपानी तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर

            या प्रकल्पाचे काम करताना ऑर्थोटॉपीक स्टील डेस्क (ओएसडी) या जपानी तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर पहिल्यांदाच करण्यात आला आहे. त्याचे वजन काँक्रीटपेक्षा कमी असून वेगाने काम होण्यास मदत होत आहे. पर्यावरणपूरक असा हा प्रकल्प असून त्याच्या माध्यमातून वर्षाला सुमारे २६ हजार टन कार्बनडायऑक्साईड कमी होणार आहे तीन पॅकेजच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            यावेळी शिवडी प्रकल्प कार्यालयास मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. श्रीनिवास यांनी प्रकल्पाबाबत सादरीकरण केले.

००००


Wednesday, 14 September 2022

छोटू ची भाकरी


 

राईट ऑफ फर्स्‍ट रिफुजल’

 मत्‍स्यव्‍यवसाय ठेका धोरणात ‘राईट ऑफ फर्स्‍ट रिफुजल’ या तत्‍वाचा समावेश.

मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय, शासन निर्णय निर्गमित.

सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणास मदत होणार.

            मुंबई, दि. 14 : सहकार क्षेत्राचे बळकटीकरण करण्‍याच्‍या दृष्‍टीने महामंडळाकडे हस्‍तांतरीत करण्‍यात आलेल्‍या जलाशयावरील स्‍थानिक मच्‍छीमार सहकारी संस्‍थांना प्राधान्‍य देण्‍याच्‍या उद्देशाने ई-निविदा प्रक्रिया करताना ‘राईट ऑफ फर्स्‍ट रिफुजल’ या तत्‍वाचा समावेश करण्‍याचा निर्णय मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.


            या निर्णयाच्‍या अनुषंगाने शासनाच्‍या कृषी व पदुम विभागाने दिनांक १२ सप्‍टेंबर २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. ई-निविदेद्वारे प्राप्‍त ई-निविदांपैकी तांत्रिकदृष्‍ट्या पात्र निविदाधारकांमध्‍ये स्‍थानिक नोंदणीकृत मच्छिमार सहकारी संस्‍थांचा सहभाग असल्‍यास वाणिज्यिक निविदा उघडल्‍यानंतर ज्‍या निविदाधारकांचा ठेका रकमेचा दर सर्वात उच्‍चतम असेल त्‍या रकमेत २० टक्‍के सवलत देऊन जर स्‍थानिक मच्छिमार संस्‍था ठेका घेण्‍यास तयार असेल तर त्‍या संस्‍थेस प्रथम प्राधान्‍य देण्‍यात यावे. तसेच एकापेक्षा जास्‍त स्‍थानिक मच्छिमार संस्‍था तांत्रिकदृष्‍ट्या पात्र असतील तर त्‍यापैकी ज्‍या संस्‍थांची ठेका रक्‍कम जास्‍तीची असेल त्‍या संस्‍थेचा विचार प्रथम करण्‍यात यावा असा निर्णय देखील घेण्‍यात आला आहे.


            महाराष्‍ट्र मत्‍स्‍योद्योग विकास महामंडळाकडे मासेमारी हक्‍क हस्‍तांतरीत केलेल्‍या जलाशयांमध्‍ये मासेमारी करण्‍याकरिता ई-निविदेने ठेका देण्‍याबाबतची कार्यवाही करण्‍यास दिनांक ३ जुलै २०१९ च्‍या शासन निर्णयान्‍वये मान्‍यता देण्‍यात आली आहे. राज्‍यातील विविध मच्छिमार सहकारी संस्‍थांकडून ई-निविदा प्रक्रियेमध्‍ये प्राधान्‍य मिळावे, अशी मागणी मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडे करण्‍यात आली होती. त्‍याअनुषंगाने २५ ऑगस्‍ट २०२२ रोजी मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्र्यांच्‍या अध्‍यक्षतेखाली बैठकही आयोजित करण्‍यात आली होती. या बैठकीत श्री. मुनगंटीवार यांनी घेतलेल्‍या निर्णयाच्‍या अनुषंगाने १२ सप्‍टेंबर २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्‍यात आला आहे. या निर्णयामुळे सहकार क्षेत्राचे बळकटीकरण होण्‍यास मोठी मदत होणार आहे.


००००

उलेखनिय कामगिरी

 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांच्या

उल्लेखनीय कामगिरीचा होणार गुरुवारी गौरव

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार वितरण.

            मुंबई, दि. 14 : राष्ट्रीय अभियंता दिनाच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांनी केलेल्या उल्लेखनिय कामगिरीचा गौरव समारंभ तसेच राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कायापालट करण्याच्या दृष्टीने विभागाची कार्यपद्धती अधिक दर्जेदार व सक्षम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उद्या १५ सप्टेंबर रोजी विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

            विकासाचे भगिरथ भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन “राष्ट्रीय अभियंता दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. अभियंता दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व विभागीय मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता षण्मुखानंद सभागृह, सायन येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

            सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांचे या कार्यशाळेमध्ये मागदर्शन होणार आहे. तसेच, या प्रसंगी विविध ठिकाणच्या रस्त्यांवरील अपघात प्रवण क्षेत्र दुरुस्तीच्या अनुषंगाने करावयाच्या अधिक सक्षम उपाययोजना, नाविन्यपूर्ण प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध आराखडा तयार करणे व रस्ते, पूल बांधणी यामध्ये नवीन साहित्य, व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करणे, शासकीय जमीनींवर नवीन प्रकल्प उभारणे त्याचप्रमाणे शासकीय विश्रामगृहांचा सुयोग्य वापर करणे, विभागाचे संगणीकरण अद्ययावत करणे, तसेच रस्ते व इमारती यांची देखभाल दुरुस्ती व नवीन कामांसदर्भात कृति आराखडा तयार करणे आणि विभागाच्या सर्व कामांची गुणवत्ता सुधारण्याबाबत उपाययोजना करणे आदी सर्व बाबींवर सविस्तर चर्चा व तज्ज्ञांचे मार्गदर्शन या कार्यशाळेत होणार आहे.

            तसेच, सन २०१४ ते २०१९ या कालावधीतील विभागाच्या उत्कृष्ट अभियंत्यांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते गौरव होणार आहे. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे. तसेच, या प्रसंगी सचिव (रस्ते) स.शं.साळुंखे, सचिव (इमारती) प्र.द.नवघरे, मुंबई प्रदेश प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे सचिव सु.अ.वांढेकर, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनाचे सचिव खं.तु.पाटील, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाचे सह व्यवस्थापकीय संचालक अ.ब.गायकवाड, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे र.रा.हांडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

            या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागातील पुरस्कारप्राप्त अभियंत्यांचे मनोगत तसेच विविध मान्यवरांचे मार्गदर्शन होणार असल्याची माहिती, मुंबई सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी यांनी दिली आहे.



रोजगार

 अडचणीतील सूतगिरण्या आणि यंत्रमाग पूर्ण क्षमतेने

सुरू राहण्यासाठी शासन सहकार्य करणार

- वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील.

            मुंबई दि. 14 : कृषीक्षेत्रानंतर देशात दुसऱ्या क्रमांकाचे रोजगार निर्मितीचे क्षेत्र म्हणून वस्त्रोद्योगाकडे पाहिले जाते. परंतु राज्यातील अनेक सूतगिरण्या आणि यंत्रमाग अडचणीत आहेत. त्या पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी शासन सहकार्य करेल असे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

            आज मंत्रालयात मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, वस्त्रोद्योग आयुक्त शितल उगले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            श्री. पाटील म्हणाले, राज्यातील सूतगिरण्या अनेक वर्षांपासून अडचणीत आहेत. काही बंद आहेत तर काही बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत. या सर्व सूतगिरण्यांबाबत त्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत. यावर काय उपाययोजना करता येतील याबाबत प्रत्येक सूतगिरणी नुसार विभागाने सविस्तर प्रस्ताव तयार करावा. या सूतगिरण्या सुरू राहतील यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. यासाठी राज्य शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे श्री. पाटील यांनी सांगून टेक्सटाईल पार्क संदर्भात आढावा घेतला. काही टेक्सटाईल पार्कला भेट देऊन पाहणी करण्यात येईल त्यांच्या अडचणी समजून घेण्यात येतील, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

0000



आरोग्य आणि वातावरण

 आरोग्य आणि वातावरणातील बदलांचा

एकत्रित विचार करण्याची आवश्यकता

- आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

 

            मुंबईदि. 13 : गृहनिर्माण आणि आरोग्य यांचा एकमेकांशी अतिशय निकटचा संबंध आहे. त्यामुळे आरोग्यगृहनिर्माण आणि वातावरणातील बदल यांचा एकत्रित विचार करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज येथे केले.

            डॉ. सावंत यांच्या हस्ते नागरी स्वास्थ्यगृहनिर्माण आणि वातावरणीय बदल या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन झाले. बांद्रा कुर्ला संकुल येथील हॉटेल सोफिटेल येथे झालेल्या या कार्यशाळेत आरोग्य विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते. डॉक्टर फॉर यू आणि युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

            यावेळी डॉक्टर फॉर यू स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष डॉ. रजत जैनसंस्थापक डॉ. रविकांत सिंगमुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाषचंद गुप्तायुनिसेफच्या देविका देशमुखहिमांशू जैन आदी उपस्थित होते.

            मुंबई शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये आरोग्यविषयक विविध समस्या आहेत. झोपडपट्टींचा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी सुधारित घरे बांधली जात आहेत. यासाठी मुंबई महापालिकामुंबई महानगर क्षेत्र प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेतअसे डॉ. सावंत यांनी सांगितले.

            मुंबईतील विविध आव्हानांना सामोरे जात आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. आरोग्याच्या क्षेत्राशी निगडीत आव्हानांचा एकत्रित विचार करण्याची गरज आहे. यासाठी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी होवू शकेल का याचाही विचार केला जाईलअसेही त्यांनी सांगितले.

            यावेळी केंब्रिज विद्यापीठाच्या प्रा. रोनिता बर्धनमोहम्मद खोराकीवालायांनी आपली मनोगत व्यक्त केले.


संस्कार


 

Featured post

Lakshvedhi