Friday, 13 May 2022

 *बेसावधपणाची किंमत मृत्यू !*


*आंबा खाल्ल्यानंतर*

*कोल्डड्रिंक पिऊ नका !* 

*विशेषः मुलांवर लक्ष ठेवा.*👇

 *सावधान !* 😱

*काही दिवसांपूर्वी काही प्रवासी चंडीगढ़ (पंजाब) येथे फिरावयास गेले होते.*

*चंडीगढ़ येथे त्यांनी आंबा खाल्ल्यावर लगेच कोल्डड्रिंक प्याले. ज्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले व ते सगळे बेशुद्ध होऊ लागले.*

*त्यांना तातडीने उपचाराकरिता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता तिथे त्या सर्वांना मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरांनी मृत्युचे कारण असे सांगितले, की आंबा खाल्ल्यानंतर कोणतेही कोल्डड्रिंक किंवा सॉफ्टड्रिंक पिऊ नये. कारण आंब्यातील सायट्रिक ॲसिड आणि कोल्डड्रिंकमधील कार्बनिक ॲसिड एकत्र मिसळल्यामुळे शरीरात विष तयार झाले. ज्यामुळे त्या सर्वांना आपले प्राण गमवावे लागले.*

*कृपया हा मॅसेज आपल्या सर्व प्रियजनांपर्यंत पोचवा. जेणेकरून त्या सर्वांना याविषयी जागरूक राहाण्यास मदत होईल. कारण सध्या आंब्याचा सिझन सुरू झाला आहे.*


⛑Dr. Mahendra Bheda 8779630988

 



 


 

 किमान आधारभूत किमतीनुसार हरभरा खरेदीसाठी

शेतकऱ्यांनी १७ मे पर्यंत नोंदणी करावी

- सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

            मुंबई, दि ११ : किमान आधारभुत किमतीने हरभरा खरेदीसाठी आतापर्यंत ४ लाख 94 हजार ३९९ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. मार्चपासून आजतागायत 50.84 लाख क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला असून, उद्दीष्टपूर्तीसाठी १७ मे पर्यंत नोंदणीची तारीख अंतिम करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

            आज मंत्रालयात हंगाम २०२१-२२ मधील हरभरा (चणा) खरेदी, साठवणूक नियोजन व शेतकरी चुकारे संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आतापर्यंत चना खरेदी संदर्भातील आढावा घेतला व शेतकऱ्यांसाठी नोंदणीची तारीख वाढवावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिपक तावरे, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग, पणनचे सहसंचालक विनायक कोकरे , द विदर्भ सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक हरी बाबू, यांच्यासह पृथाशक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सौ.भाग्यश्री टिळेकर, विदर्भ ॲग्रीकल्चरल अलाईड प्रोड्युसर कंपनी(वॅपको) नागपूरच नाफेडचे श्री.पुनीतसिंग, भारतीय अन्न महामंडळ अंशुमन चक्रवर्ती व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            सहकार व पणन मंत्री श्री. पाटील म्हणाले, चालू वर्षी राज्यात हरभऱ्याचे उत्पादन चांगले झाले आहे. तथापि बाजारभाव मात्र हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ देण्यासाठी आणि राज्याला दिलेले हरभरा (चना) खरेदीचे उद्दिष्ट ६.८९ लाख मे टन पूर्ण करण्यासाठी सर्व राज्य नाफेड संस्थानी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे खरेदी केलेल्या मालाचे नुकसान होऊ नये, यासाठी सर्वतोपरी उपाययोजना कराव्यात. खरेदी केलेले शेतमाल गोदामात लवकर जमा करण्यासाठी योग्य ते नियोजन करावे. हरभरा खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे चुकारे अदा करण्यात यावेत. यासाठी व्यवस्थापकीय संचालक, पणन महासंघ मुंबई यांनी नाफेड व भारतीय अन्न महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत, शेतकरी चुकाऱ्यांबरोबर हमालीचे पैसे अनुषंगिक खर्च व बारदाण्याचे पैसेही नाफेडने लवकर अदा करावे, अशी सूचना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली.

            राज्यातील चना खरेदी वाढवावी त्याचबरोबर गोडाऊनचा उपलब्धतेसाठी प्रयत्न करण्यात यावेत अशा सूचना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी संबंधित मंडळांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

            हरभरा ५२३० प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात येत असून, दिनांक १ मार्च पासून ७३० खरेदी केंद्रांवर हरभरा (चना) खरेदी सुरू करण्यात आला आहे. आजतागायत ४ लाख ९४ हजार ३९९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ५०.८४ लाख क्विंटल खरेदी करण्यात आली आहे. २ लाख ८० हजार २८४ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. खरेदीची एकूण किंमत २६५८.९३ कोटी असून, १९५८.४० कोटी निधी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे. अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.

0000


संदेश

 *🌻धम्म संदेश ज्ञ🌻*

"न हि वेरेन वेरानि, 

सम्मन्तीध कुदाचनं ।

अवेरेन च सम्मन्ति, 

एस धम्मो सनन्तनो ।"

         - तथागत बुद्ध 

*इस संसार में वैर से वैर कभी शान्त नहीं होता, मैत्री से ही (वैर) शान्त होता है। यही संसार का सनातन नियम है।*

मन को मंगल कामनाओं से भर देने को भगवान बुद्ध *'मैत्री भावना'* कहते हैं । 

भिक्षुओं को सम्बोधित करते हुए तथागत बुद्ध ने कहा- 

भिक्षुओ ! मैत्री रखने में ग्यारह लाभ है? 

कौन-से ११ लाभ है?

*🍀मंगल मैत्री के 11 लाभ🍀*  

मैत्री भावना करनेवाला : 

*🍀1. सुख की नींद सोता है।*

*🍀2. तरोताज़ा जागता है।*

*🍀3. दुःस्वप्न नहीं देखता है।*

*🍀4. मनुष्यों में प्रिय होता है।*

*🍀5. अमनुष्यों में प्रिय होता है।*

*🍀6. देवता उसकी रक्षा करते है।*

*🍀7. अग्नि, विष, शस्त्र उसे मार नहीं सकते। ( यानी कोई शत्रु नहीं होने के कारण कोई उसे अग्नि, विष, शस्त्रसे  नही मारते है।)*

*🍀8. सहज समाधिस्थ हो सकता है।*

*🍀9. मुख का वर्ण निखरता है। मुखाकृति शांत होती है।*

*🍀10. बेहोशी में नहीं मरता है।*

*🍀11. मरने के बाद अच्छी गति होती है ।*

🙏🏻🙏🏻🙏🏻

 सावित्री नदीतील गाळ काढण्यासाठीजलसंपदा विभागाने सुधारित प्रस्ताव सादर करावा

- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे.

            मुंबई, दि. 12 : रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीतील गाळ काढण्यासाठी सीआरझेडची परवानगी आवश्यक आहे. यासाठी बाणकोट खाडी परिसरातील नौकानयन सुलभ होण्याच्या अनुषंगाने जलसंपदा विभागाने महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडे सुधारित प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.

            सावित्री नदीच्या मान्सूनपूर्व तयारीचा श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा घेण्यात आला. यावेळी पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, स्थानिक आमदार भरत गोगावले, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी श्री. गौतम, पूर नियंत्रण समिती रायगड चे सदस्य आदी उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.  

            महाड जवळ बाणकोट खाडीत नौकानयन सुलभ होण्यासाठी मेरीटाईम बोर्ड आणि राजेवाडी ते केंबुर्ली या भागात सावित्री नदीतील गाळ आणि बेटे काढण्यासाठी जलसंपदा विभागाने स्वतंत्र प्रस्ताव सादर केले होते. यातील मेरीटाईम बोर्डाच्या प्रस्तावास महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीमार्फत मान्यता देण्यात आली आहे. जलसंपदा विभागाने सीआरझेड मधील तरतुदींनुसार मेरीटाईम बोर्ड मार्फत सुधारित प्रस्ताव सादर केल्यास त्यास मान्यता देता येईल, याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

00000


 



Featured post

Lakshvedhi