Monday, 25 April 2022

आरोग्य म धन संपदा

 **ओम म्हणजे काय? सगळ्या समस्यांवर एक रामबाण उपाय* 

🕉️ *ओम मंत्रा ची माहिती* 

श्रीमती शहा उच्च रक्त दाबामुळे आजारी होत्या. त्या सगळ्या डॉक्टरांकडे जाऊन आल्या, पण काही उपयोग झाला नाही. सगळे उपाय थकले, पण ब्लड प्रेशर कमी झाले नाही. शेवटी त्यांनी एक योगासनाचा क्लास लावला. तेथे त्यांना योग शिक्षकांनी उच्च रक्त दाब कमी करण्यासाठी ओमकार करायला सांगितला. ह्यावर विश्वास ठेवण्यास त्या तयार नव्हत्या, पण त्यांना फक्त एक छोटासा प्रयोग करण्यास सांगितला.

प्रथम रक्तदाब मोजा;

कुठलाही विचार मनात न आणता शांतपणे बसा आणि श्वास-प्रश्वासा बरोबर ११ वेळा ओमकार करा;

रक्तदाब मोजा;

बघा काय परिणाम होतो ते.

तिच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही जेव्हा तिचा १८० / ८० रक्तदाब १६० / ८० पर्यंत कमी झाला होता. आता त्या पूर्णपणे रक्तदाबाच्या त्रासातून मुक्त झालेल्या आहे.

ओमकारचा चमत्कार

ॐ किंवा प्रणव हे सगळ्या मंत्रांचे पहले बीज अक्षर आहे. त्याच्यामध्ये गणपती, शंकर, विष्णू आणि ब्रह्माचे रूप आहे. तेव्हा ओमकार करतांना डोळ्यांसमोर ॐ हा शब्द आणून ओमकार केला तर चमत्कार घडू शकतात.

याचे प्रत्यंतर तुम्हाला त्या मंत्राच्या उच्चाराने जाणवेल. ही त्याची शक्ती आहे. हे बीजाक्षर सगळ्यां बीज मंत्रांचा शिरोमणी आहे. ह्याच्या मध्ये तीन अक्षरे आणि एक अर्ध मात्रा आहेत. ते म्हणजे ‘अ’, ‘ऊ’ आणि ‘म’. ही अक्षरे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतिक आहे. म्हणूनच कुठल्याही मंत्राच्या आधी ओंकार  लावला तर त्या मंत्राची शक्ती कितीतरी पटीने वाढते. असे म्हणतात की विश्वाची उत्पत्ती करण्यासाठी ब्रह्माने १२ वर्षे ओमकार करून तपश्चर्या केली. ब्रह्माचे हे १२ वर्ष म्हणजे पृथ्वीचे ३७,३२,४८० कोटी वर्ष. ह्या ओमकाराच्या गूढ आवाजाने आणि त्याच्या आत्म्याने त्याने आपण राहतो ती सूर्य माला उत्पन्न केली.


ओमकाराची किमया

मंत्रांच्या बाबतीत तो जेवढा लघु आणि सूक्ष्म असतो, तितका म्हणायला सोपा आणि ताकदीला जास्त असतो. तो छोटा असल्याने म्हणतांना मनाची एकाग्रता वाढते, आणि मंत्र जास्त परिणामकारक होतो. हा प्रवास ‘जड’ कडून सूक्ष्मकडे असतो. म्हणून ओमकाराने आपल्या सर्व शरीरात प्रेरणेचा संचार होतो.


ओमकाराची रचना आणि शरीरावर होणारे त्याचे परिणाम

ओमकार हा साडे तीन मात्रांचा बनलेला असतो. ते म्हणजे ‘अ’, ‘ऊ’, ‘म’ आणि अनुस्वाराची अर्ध मात्रा. त्याच्या पुढे १६ मात्रा होतात आणि प्रत्येकीचे चार भाग पडतात. प्रत्येक भाग पुरुष आणि प्रकृती ह्यामध्ये विभागले जातात. ह्याच्या पुढचे जे भाग पडतात ते आपल्या संवेदनावाहक मज्जातंतुंशी तंतोतंत जुळतात.

म्हणून ओमकाराचा उच्चार केल्याने हे मज्जातंतू स्फुरण पावतात आणि सशक्त होतात. योग्य पद्धतीने ओमकार केल्यास आपल्या शरीरातील पायाचे तळवे, घोटे, मंड्या, कंबर, पृष्ठ भाग, वक्ष, खांदे, पाठ, मज्जा रज्जू, मान, लंब मज्जा, सहस्रार चक्र, मेंदू, डोळे, कान, जीभ, दात ह्या अवयवांवर अतिशय चांगला परिणाम होतो.

आपल्या शरीरातील ६ चक्रांपैकी मेंदूतील सहस्रार चक्र, ज्याला पिट्युटरी ग्लॅन्ड म्हणतात ते सर्व इतर चक्रांवर नियंत्रण ठेवते आणि सम्प्रेराकांवर पण नियंत्रण ठेवते. ह्यायोगे शरीराची चयापचय क्रिया योग्य पद्धतीने चालते. ओमकाराचा ‘म’ ठराविक प्रमाणात लांबवला तर तो ह्या सहस्रार चक्रावर चांगला परिणाम घडवून आणतो. हा ‘म’ कानाच्या पाळ्या पूर्ण बंद करून डोक्यामध्ये घुमवल्यास मन शांत होते आणि नकारार्थी भावना जसे राग, लोभ, मद, मत्सर, इत्यादी ह्या षड्रिपूंवर नियंत्रण होते. ह्या भावनांमुळे होणारे रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर इत्यादी रोगांचा उद्भवाच होत नाही. असे म्हणतात न, की “प्रिवेन्शन इज बेटर दॅन क्युअर”. ह्या उक्तीप्रमाणे आधीच ओमकार करून ह्या रोगांना शरीरात प्रवेशाच करू दिला नाही, तर पुढचे सगळे आयुष्य गोळ्या खात कंठण्याची पाळी येणारच नाही.

हा मंत्रोच्चार कसा करावा?

जरी हा मंत्र ‘अ’, ऊ’ आणि ‘म’ या वेगवेगळ्या अक्षरांनी बनलेला असला तरी, ही तिन्ही अक्षरे कुठेही न थांबता सलगपणे म्हणावी. ‘अ’च्या उच्चारासाठी २ सेकंद, ‘ऊ’च्या उच्चारासाठी ३ सेकंद आणि ‘म’च्या उच्चारासाठी ५ सेकंद द्यावेत. कमी रक्तदाबासाठी ‘अ’चा उच्चार वाढवावा आणि उच्च रक्तदाब असेल तर ‘म’ची लांबी वाढवावी.

म्हणावयाची कृती

पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून चटईवर सहजासन किंवा पद्मासन घालून बसावे. तीन वेळा पूर्ण श्वास आणि प्रश्वास करावा. त्यानंतर तीन वेळा वरील सांगितल्याप्रमाणे ओमकार करावा.

‘ओSSSम’ (३ वेळा);

ॐSSS, ॐSSS, ॐSSS (११ वेळा);

ॐSSS, ॐSSS, ॐSSS, ॐSSS (११ वेळा).

लक्षात ठेवा, की तुमची मनःस्थिती जर खूप बिघडलेली असेल, तर लगेच ओमकार करायला सुरुवात करू नका, कारण राग, हतबलता, द्वेष या भावना मेंदूत विशिष्ट रासायनिक प्रक्रिया करतात. त्यावेळी जर ओमकार केला, तर ओमकारामुळे होणाऱ्या रासायनिक प्रक्रिया आणि ह्या प्रक्रिया यांचे एकमेकाशी द्वंद्व होऊन पक्षाघात होण्याचा संभाव असतो. म्हणून प्रथम शांत बसा, पूर्ण श्वास घ्या, शरीर आणि मन सैल सोडा आणि मग हा मंत्र म्हणण्यास सुरु करा. त्यानी तुम्हाला मनःशांती मिळेल, दुसऱ्या बाजूने विचार करण्याची प्रवृत्ती निर्माण होईल आणि आपण उगीचच रागावलो के तुम्हाला कळून येईल.

   *​!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!​*

*------------------------------------*

*SANTOSH N. DHAGE*

    *M.D.Panchgavya.*                 

         *Therapy,*

*Yoga Naturopathy*

*(नाभीचिकित्सक ,नाडीपरिक्षा, योगोपचार,ऍक्युप्रेशर,निसर्गोपचार तज्ञ*

*☎️8208426494*

*👉🏻मो व्हाट्स ऍप*       *9594881581*

*सर्व आजार निसर्ग उपचाराने 100% बरे होतात*

👍 *माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा...!*

*दारू,तंबाखू,गुटखा,मावा,बिडीसिगारेट,गांजा,अफ्फू,चरस इ.अल्कोहल व निकोटीनच्या जीवघेण्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी हर्बल स्प्रे च्या सोप्या आणि बाह्य उपचार पध्दतीचा वापर करा.*

*आपणास किंवा आपल्या जवळच्या कोणाला व्यसन असेल तर संपर्क करा.*

*आधार व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर* 

    *Call☎️ 87998 53299*

*फोन करा किंवा Whatsap करा पूर्ण माहिती मिळेल** 

🕉️ *ओम मंत्रा ची माहिती.

श्रीमती शहा उच्च रक्त दाबामुळे आजारी होत्या. त्या सगळ्या डॉक्टरांकडे जाऊन आल्या, पण काही उपयोग झाला नाही. सगळे उपाय थकले, पण ब्लड प्रेशर कमी झाले नाही. शेवटी त्यांनी एक योगासनाचा क्लास लावला. तेथे त्यांना योग शिक्षकांनी उच्च रक्त दाब कमी करण्यासाठी ओमकार करायला सांगितला. ह्यावर विश्वास ठेवण्यास त्या तयार नव्हत्या, पण त्यांना फक्त एक छोटासा प्रयोग करण्यास सांगितला.

प्रथम रक्तदाब मोजा;

कुठलाही विचार मनात न आणता शांतपणे बसा आणि श्वास-प्रश्वासा बरोबर ११ वेळा ओमकार करा;

रक्तदाब मोजा;

बघा काय परिणाम होतो ते.

तिच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही जेव्हा तिचा १८० / ८० रक्तदाब १६० / ८० पर्यंत कमी झाला होता. आता त्या पूर्णपणे रक्तदाबाच्या त्रासातून मुक्त झालेल्या आहे.

ओमकारचा चमत्कार

ॐ किंवा प्रणव हे सगळ्या मंत्रांचे पहले बीज अक्षर आहे. त्याच्यामध्ये गणपती, शंकर, विष्णू आणि ब्रह्माचे रूप आहे. तेव्हा ओमकार करतांना डोळ्यांसमोर ॐ हा शब्द आणून ओमकार केला तर चमत्कार घडू शकतात.

याचे प्रत्यंतर तुम्हाला त्या मंत्राच्या उच्चाराने जाणवेल. ही त्याची शक्ती आहे. हे बीजाक्षर सगळ्यां बीज मंत्रांचा शिरोमणी आहे. ह्याच्या मध्ये तीन अक्षरे आणि एक अर्ध मात्रा आहेत. ते म्हणजे ‘अ’, ‘ऊ’ आणि ‘म’. ही अक्षरे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतिक आहे. म्हणूनच कुठल्याही मंत्राच्या आधी ओंकार लावला तर त्या मंत्राची शक्ती कितीतरी पटीने वाढते. असे म्हणतात की विश्वाची उत्पत्ती करण्यासाठी ब्रह्माने १२ वर्षे ओमकार करून तपश्चर्या केली. ब्रह्माचे हे १२ वर्ष म्हणजे पृथ्वीचे ३७,३२,४८० कोटी वर्ष. ह्या ओमकाराच्या गूढ आवाजाने आणि त्याच्या आत्म्याने त्याने आपण राहतो ती सूर्य माला उत्पन्न केली.

ओमकाराची किमया

मंत्रांच्या बाबतीत तो जेवढा लघु आणि सूक्ष्म असतो, तितका म्हणायला सोपा आणि ताकदीला जास्त असतो. तो छोटा असल्याने म्हणतांना मनाची एकाग्रता वाढते, आणि मंत्र जास्त परिणामकारक होतो. हा प्रवास ‘जड’ कडून सूक्ष्मकडे असतो. म्हणून ओमकाराने आपल्या सर्व शरीरात प्रेरणेचा संचार होतो.

ओमकाराची रचना आणि शरीरावर होणारे त्याचे परिणाम

ओमकार हा साडे तीन मात्रांचा बनलेला असतो. ते म्हणजे ‘अ’, ‘ऊ’, ‘म’ आणि अनुस्वाराची अर्ध मात्रा. त्याच्या पुढे १६ मात्रा होतात आणि प्रत्येकीचे चार भाग पडतात. प्रत्येक भाग पुरुष आणि प्रकृती ह्यामध्ये विभागले जातात. ह्याच्या पुढचे जे भाग पडतात ते आपल्या संवेदनावाहक मज्जातंतुंशी तंतोतंत जुळतात.

म्हणून ओमकाराचा उच्चार केल्याने हे मज्जातंतू स्फुरण पावतात आणि सशक्त होतात. योग्य पद्धतीने ओमकार केल्यास आपल्या शरीरातील पायाचे तळवे, घोटे, मंड्या, कंबर, पृष्ठ भाग, वक्ष, खांदे, पाठ, मज्जा रज्जू, मान, लंब मज्जा, सहस्रार चक्र, मेंदू, डोळे, कान, जीभ, दात ह्या अवयवांवर अतिशय चांगला परिणाम होतो.

आपल्या शरीरातील ६ चक्रांपैकी मेंदूतील सहस्रार चक्र, ज्याला पिट्युटरी ग्लॅन्ड म्हणतात ते सर्व इतर चक्रांवर नियंत्रण ठेवते आणि सम्प्रेराकांवर पण नियंत्रण ठेवते. ह्यायोगे शरीराची चयापचय क्रिया योग्य पद्धतीने चालते. ओमकाराचा ‘म’ ठराविक प्रमाणात लांबवला तर तो ह्या सहस्रार चक्रावर चांगला परिणाम घडवून आणतो. हा ‘म’ कानाच्या पाळ्या पूर्ण बंद करून डोक्यामध्ये घुमवल्यास मन शांत होते आणि नकारार्थी भावना जसे राग, लोभ, मद, मत्सर, इत्यादी ह्या षड्रिपूंवर नियंत्रण होते. ह्या भावनांमुळे होणारे रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर इत्यादी रोगांचा उद्भवाच होत नाही. असे म्हणतात न, की “प्रिवेन्शन इज बेटर दॅन क्युअर”. ह्या उक्तीप्रमाणे आधीच ओमकार करून ह्या रोगांना शरीरात प्रवेशाच करू दिला नाही, तर पुढचे सगळे आयुष्य गोळ्या खात कंठण्याची पाळी येणारच नाही.

हा मंत्रोच्चार कसा करावा?

जरी हा मंत्र ‘अ’, ऊ’ आणि ‘म’ या वेगवेगळ्या अक्षरांनी बनलेला असला तरी, ही तिन्ही अक्षरे कुठेही न थांबता सलगपणे म्हणावी. ‘अ’च्या उच्चारासाठी २ सेकंद, ‘ऊ’च्या उच्चारासाठी ३ सेकंद आणि ‘म’च्या उच्चारासाठी ५ सेकंद द्यावेत. कमी रक्तदाबासाठी ‘अ’चा उच्चार वाढवावा आणि उच्च रक्तदाब असेल तर ‘म’ची लांबी वाढवावी.

म्हणावयाची कृती

पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून चटईवर सहजासन किंवा पद्मासन घालून बसावे. तीन वेळा पूर्ण श्वास आणि प्रश्वास करावा. त्यानंतर तीन वेळा वरील सांगितल्याप्रमाणे ओमकार करावा.

‘ओSSSम’ (३ वेळा);

ॐSSS, ॐSSS, ॐSSS (११ वेळा);

ॐSSS, ॐSSS, ॐSSS, ॐSSS (११ वेळा).

लक्षात ठेवा, की तुमची मनःस्थिती जर खूप बिघडलेली असेल, तर लगेच ओमकार करायला सुरुवात करू नका, कारण राग, हतबलता, द्वेष या भावना मेंदूत विशिष्ट रासायनिक प्रक्रिया करतात. त्यावेळी जर ओमकार केला, तर ओमकारामुळे होणाऱ्या रासायनिक प्रक्रिया आणि ह्या प्रक्रिया यांचे एकमेकाशी द्वंद्व होऊन पक्षाघात होण्याचा संभाव असतो. म्हणून प्रथम शांत बसा, पूर्ण श्वास घ्या, शरीर आणि मन सैल सोडा आणि मग हा मंत्र म्हणण्यास सुरु करा. त्यानी तुम्हाला मनःशांती मिळेल, दुसऱ्या बाजूने विचार करण्याची प्रवृत्ती निर्माण होईल आणि आपण उगीचच रागावलो के तुम्हाला कळून येईल.

   *​!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!​*

*------------------------------------*

*SANTOSH N. DHAGE*

    *M.D.Panchgavya.*                 

         *Therapy,*

*Yoga Naturopathy*

*(नाभीचिकित्सक ,नाडीपरिक्षा, योगोपचार,ऍक्युप्रेशर,निसर्गोपचार तज्ञ*

*☎️8208426494*

*👉🏻मो व्हाट्स ऍप* *9594881581*

*सर्व आजार निसर्ग उपचाराने 100% बरे होतात*

👍 *माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा...!*

*दारू,तंबाखू,गुटखा,मावा,बिडीसिगारेट,गांजा,अफ्फू,चरस इ.अल्कोहल व निकोटीनच्या जीवघेण्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी हर्बल स्प्रे च्या सोप्या आणि बाह्य उपचार पध्दतीचा वापर करा.*

*आपणास किंवा आपल्या जवळच्या कोणाला व्यसन असेल तर संपर्क करा.*

*आधार व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर* 

    *Call☎️ 87998 53299*

*फोन करा किंवा Whatsap करा पूर्ण माहिती मिळेल*

Sunday, 24 April 2022

 


 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन

            मुंबई, दि. 24: भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज एक दिवसाच्या मुंबई भेटीसाठी भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने आगमन झाले.

            छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राजशिष्टाचार राज्यमंत्री आदिती तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, तीनही सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, लोकप्रतिनिधी आदींनी प्रधानमंत्र्यांचे स्वागत केले

 




 

 






 मुंबईच्या झवेरी बाजारात जीएसटी विभागाची कारवाई;

भिंतीत 10 कोटींची रोकड, 19 किलो चांदीच्या विटा सापडल्याल

सोनेव्यापाऱ्याची उलाढाल तीन वर्षात

23 कोटींवरुन 1764 कोटी रुपयांवर

संशयास्पद व्यवहार जीएसटीच्या रडारवर.

            मुंबई, दि. 23 :- मुंबईच्या झव्हेरी बाजारातील मेसर्स चामुंडा बुलीयन या कंपनीची उलाढाल वर्ष 2019-20 मध्ये 22.83 कोटी रुपयांवरुन वर्ष 2020-21 मध्ये 652 कोटी आणि वर्ष 2021-22 मध्ये 1764 कोटी रुपयांपर्यंत संशयास्पदरित्या वाढल्याचे राज्य जीएसटी विभागाच्या विश्लेषणात लक्षात आले. त्यानंतर जीएसटी विभागाने टाकलेल्या छाप्यात कंपनीच्या अनेक शाखांची नोंदणी आढळून आली नाही. कंपनीच्या 35 चौरस मीटरच्या एका छोट्या जागेत जीएसटी विभागाला भिंतीत लपवून ठेवलेली 9 कोटी 78 लाखांची रोकड आणि 19 किलो वजनाच्या (13 लाख रुपये किमतीच्या) चांदीच्या विटा आढळून आल्या. 

            राज्य जीएसटी विभागाने ही जागा सिलबंद केली असून प्राप्तीकर विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाने ही रक्कम आणि मालमत्तेचा स्त्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. राज्य जीएसटी विभागाने गेल्या काही महिन्यांपासून जीएसटी चोरी शोधणे आणि कारवाईची मोहिम तीव्र केली असून हजारो कोटींची जीएसटी चोरी शोधण्यात यश मिळविले आहे. राज्य कर विभागाचे सहआयुक्त राहूल द्विवेदी, उपायुक्त विनोद देसाई यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. जीएसटी चोरीविरुद्धची कारवाई या पुढच्या काळात अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती राज्य कर आयुक्त राजीव मित्तल यांनी दिली आहे.

0000


 



Featured post

Lakshvedhi