सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 20 April 2022
_*आई मुलाला कडेवर का घेते ? माहिती आहे का ?*_
_*कारण जे आपल्याला दिसतंय तेच त्या मुलांना दिसावं.*_........
_*आणि वडील मुलाला खांद्यावर का घेतात?*_
_*कारण जे आपण बघितले नाही , ते आपल्या मुलांना दिसावं !!*_
_*प्रत्येकाच्या आयुष्यातील अशी एकच व्यक्ती असते, जिला वाटते की , त्याने आपल्या पेक्षा मोठं व्हावं...!!आणि तीं म्हणजेच* _
*"आई वडील"*
फेकुचन navare
*लोक आपल्या बायकांना इतके का घाबरतात, काही समजतच नाही…*
मी मात्र याला अपवाद आहे. 😊
माझ्या घरचा मी राजा आहे. 👑
जेव्हा मला थंड पाण्याने भांडी धुवायचा मूड असतो, तेव्हा मी थंड पाण्याने धुतो, जेव्हा गरम पाण्याने धुवायचा मुड असतो, तेव्हा गरम पाण्याने धुतो. 🙂
याबाबतीत मी इतर कोणाचंच ऐकत नाही।।। 🤨
लादी पुसताना फिनाईल घ्यायचं की लायझोल,
माझं मीच ठरवतो…😄
एक शब्द बोलायची बायकोची हिम्मत नसते…😎
सकाळचा चहा बनवून ☕ बायकोला जागं केल्यावर, चहा बेडवरच प्यायचा, की ड्रॉईंग रूम मध्ये प्यायचा की बाल्कनीत बसून प्यायचा, निर्णय माझाच असतो. काय हिम्मत आहे ती लुडबुड करेल…😌
कपडे सर्फ एक्सेलने धुवायचे की टाईड ने, तिथेही माझंच राज्य चालतं…😉
याबाबतीत तर मी बायकोला इतकं अज्ञानी करून ठेवलंय की तिला अजून वॉशिंग मशीन कशी चालवावी, हेही माहीत नाही…😃
कोणत्या झाडूनं घर झाडायचं, हा निर्णय दस्तुरखुद्द आम्हीच घेतो.🙂
जेवायला काय बनवायचे हे बायको कोण सांगणार? माझ्या इच्छेनुसार मीच तिला विचारून बनवतो…🤩
काच ओल्या फडक्याने पुसायची की कोलीन शिंपडून, चर्चा होतंच नाही…🥳
रविवारी शौचालय सकाळी स्वच्छ करायचं कि संध्याकाळी, हे देखील मीच ठरवतो…😊
*आणि सर्वात महत्वाचं ...*
रात्री झोपण्यापूर्वी तिचं डोकं आधी चेपायचं की पाय, निर्णय माझाच असतो…👍🏻
मी on the spot निर्णय घेतो.🙂
अरे बाबांनो, घरातील सर्व मोठे निर्णय घेता येणं, यात तर खरी पुरुषाची शान आहे🤠
पण तुम्ही निराश होऊ नका. माझा हेतू तुम्हाला जळवायचा किंवा तुमचं मनोबल खच्ची करण्याचा नाही…☺️
*एक यशस्वी नवरा ...*🧑🏻
नमोस्तुते !🙏🏻
हनुमान चालीसा कधी लिहिली गेली हे तुम्हाला माहीत आहे का?
नसेल तर जाणून घ्या
कदाचित काही लोकांनाच हे माहित असेल?
सर्वजण पवनपुत्र हनुमानजींची पूजा करतात आणि हनुमान चालीसाही पाठ करतात.
पण ते केव्हा लिहिले गेले, कुठे आणि कसे झाले हे फार कमी लोकांना माहीत असेल.
गोष्ट *इ.स. १६००* ची आहे* हा काळ *अकबर आणि तुलसीदासजींच्या काळातील होता.
एकदा तुलसीदास जी मथुरेला जात होते, रात्री होण्यापूर्वी त्यांनी आग्रा येथे मुक्काम केला, लोकांना कळले की तुलसीदासजी आग्रा येथे आले आहेत.
हे ऐकून
त्यांच्या दर्शनासाठी लोकांची झुंबड उडाली.
सम्राट अकबराला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याने बिरबलाला विचारले की हा तुलसीदास कोण आहे?
तेव्हा बिरबलाने अकबराला सांगितले की, त्याने रामचरितमानसचा अनुवाद केला आहे.
हे रामभक्त तुलसीदास जी आहेत.
मीही त्यांना पाहून आलो आहे, त्यांची एक अद्भुत आणि अलौकिक प्रतिमा आहे.
अकबरनेही त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि मलाही त्यांना भेटायचे आहे, असे सांगितले.
सम्राट अकबराने आपल्या सैनिकांची एक तुकडी तुलसीदासजींकडे पाठवली आणि तुलसीदासजींना सम्राटाचा निरोप दिला की तुम्ही लाल किल्ल्यावर उपस्थित रहा.
हा संदेश ऐकून तुलसीदासजी म्हणाले की, मी प्रभू श्रीरामाचा भक्त आहे, माझा सम्राट आणि लाल किल्ल्याशी काय संबंध?
त्यांनी लाल किल्ल्यावर जाण्यास स्पष्ट नकार दिला.
हे प्रकरण सम्राट अकबरापर्यंत पोहोचल्यावर त्याला फार वाईट वाटले.
आणि सम्राट अकबर रागाने लाल लाल झाला आणि त्याने तुलसीदासजींना बेड्या ठोकून लाल किल्ला आणण्याचा आदेश दिला.
तरी
बिरबलाने अकबराला असे न करण्याचा सल्ला दिला.
पण अकबराला ते मान्य नव्हते
आणि तुळशीदासांना साखळदंडांनी बांधून आणण्याची आज्ञा केली.
तुलसीदासजींना साखळदंड घालून लाल किल्ल्यावर आणण्यात आले तेव्हा अकबर म्हणाला की तुम्ही करिष्माई व्यक्ती आहात, थोडा करिष्मा दाखवा आणि सुटका करा.
तुलसीदासजी म्हणाले-
मी फक्त भगवान श्री रामचा भक्त आहे, जादूगार नाही, जो तुम्हाला काही करिष्मा दाखवू शकेल.
हे ऐकून अकबर संतापला.
आणि त्यांना बेड्या ठोकून अंधारकोठडीत टाकण्याचा आदेश दिला.
दुसऱ्या दिवशी लाखो माकडांनी मिळून आग्राच्या लाल किल्ल्यावर हल्ला करून संपूर्ण किल्ला उद्ध्वस्त केला.
लाल किल्ल्यावर सगळीकडे गोंधळ माजला होता, मग अकबराने बिरबलला बोलावून विचारले, बिरबल काय चालले आहे?
तेव्हा बिरबल म्हणाला, महाराज, मी तुम्हाला आधीच सावध केले होते.
पण तू सहमत नाहीस
आणि करिश्माला बघायचं असेल तर बघ.
अकबराने तुलसीदासांना ताबडतोब अंधारकोठडीतून बाहेर काढले. आणि
साखळ्या उघडल्या गेल्या.
तुलसीदासजी बिरबलाला म्हणाले की मला अपराधाशिवाय शिक्षा झाली आहे.
मला अंधारकोठडीतील भगवान श्री राम आणि हनुमानजींची आठवण झाली.
मी रडत होतो.
आणि रडताना माझे हात स्वतःहून काहीतरी लिहीत होते.
हे 40 चतुर्भुज,
*हनुमान जी* यांच्या प्रेरणेने लिहिलेले.
तुलसीदास जी तुरुंगातून सुटल्यावर म्हणाले, ज्याप्रमाणे हनुमानजींनी मला तुरुंगातील संकटातून बाहेर काढून मदत केली आहे, त्याचप्रमाणे जो कोणी संकटात किंवा संकटात सापडला आहे आणि हे पाठ करतो, त्याचे दुःख आणि सर्व संकटे दूर होतील. काढले.
ती *हनुमान चालीसा* म्हणून ओळखली जाईल.
अकबरला खूप लाज वाटली आणि त्याने तुलसीदासजींची माफी मागितली आणि त्यांना पूर्ण आदर आणि पूर्ण संरक्षण देऊन, लव-लष्कर मथुरेला पाठवले.
आज सर्वजण हनुमान चालिसाचे पठण करत आहेत.
आणि
या सर्वांवर हनुमानाची कृपा आहे.
आणि सर्वांचे संकट दूर होत आहेत.
म्हणूनच हनुमानजींना "संकट मोचन" असेही म्हणतात.
*कृपया ही सुसंस्कृत आणि प्रेरणादायी पोस्ट तुमच्या मित्रांनाही शेअर करा, कृपया जास्तीत जास्त शेअर करा.*
Tuesday, 19 April 2022
आझादी का अमृत महोत्सव आणि महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्तकार्यक्रमांची रुपरेषा तयार करण्यात यावी
- मंत्री अमित देशमुख.
मुंबई, दि. 19 : आझादी का अमृत महोत्सव आणि महाराष्ट्राचा हिरक महोत्सव यानिमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. हे आयोजन करीत असताना निश्चित कार्यक्रम ठरवून या कार्यक्रमांची रुपरेषा तयार करण्यात यावी, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
मंत्रालयात सांस्कृतिक कार्य विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार, उपसचिव विलास थोरात आदी अधिकारी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले की, सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्य नाट्य स्पर्धा, चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजनाबरोबरच ‘आझादी का अमृत महोत्सव’ आणि ‘महाराष्ट्राचा हिरक’ महोत्सवानिमित्त कोणते कार्यक्रम आणि ते राज्यभरात कोठे आयोजित करण्यात येणार आहेत, त्याचे स्वरुप नेमके कसे असेल याबाबतची रुपरेषा विस्तृतपणे सादर करण्यात यावी. जेणेकरुन या कार्यक्रमांचे आयोजन मुंबईसह विभाग आणि जिल्हास्तरावर करण्यात येऊ शकेल.
000
आरोग्य सेवा व शैक्षणिक व्यवस्थापन प्रणालीचा आवश्यक
- मंत्री अमित देशमुख.
मुंबई, दि. 19 : वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाच्या कार्यप्रणालीत सुलभता आणि एकसमानता आणण्यासाठी आरोग्य सेवा व शैक्षणिक व्यवस्थापन प्रणालीचा (एच.एम.आय.एस.) अभ्यास करण्यात यावा असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
आज मंत्रालयात आरोग्य सेवा व शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली (एच.एम.आय.एस.)याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी एच.एम.आय.एस याबाबत सादरीकरण केले. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, उपसचिव प्रकाश सुरवसे उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्नित रुग्णालयांमध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करुन आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय माहिती निर्माण करणे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व शैक्षणिक बाबींमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर होणे ही गरज आहे. त्यामुळेच येत्या काळात या विभागासाठी आवश्यक सॉप्टवेअरचे विश्लेषण, मॉड्युल्सची संख्या, वापर करण्याची सुलभता आणि एकसमानता या पर्यायांचा सांगोपांग विचार करुनच राज्यामध्ये सर्वंकष अशी एकच एच.एम.आय.एस. कार्यप्रणाली विकसित होणे आवश्यक आहे.
केंद्र शासनाने आयुष्यमान भारत डिजिटल मिशन ही योजना 27 सप्टेंबर 2021 पासून संपूर्ण देशात कार्यान्वित केली आहे. या योजनेमध्ये आरोग्याशी संबंधित सर्व घटकांचा जसे, रुग्णालय, क्लिनिक्स, प्रयोगशाळा, फार्मसिज, रेडिओलॉजी सेंटर्स इत्यादीचा समावेश असणे आवश्यक आहे असे नमूद केले आहे. एच.एम.आय.एस कार्यप्रणालीचा वापर करताना वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील संस्थांमध्ये आवश्यक सॉप्टवेअर आणि हार्डवेअर, आवश्यक कुशल मनुष्यबळ यांची आवश्यकता असणार आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने सी-डॅक (C-DAC) यांच्याकडून रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणालीचा प्रस्ताव मागितला असून याबाबतचा पूर्ण अभ्यास करणे आवश्यक असल्याचेही मंत्री श्री.देशमुख यांनी सांगितले.
000
मुख्यमंत्र्यांनी घेतला ऊर्जा विभागाचा आढावा
८ हजार मेगा वॅट औष्णिक वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेऊन
तातडीच्या उपाययोजना करा
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्याला वीजेबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी तत्कालीक
तसेच दीघकालीन धोरण निश्चित करण्याचे निर्देश.
मुंबई, दि. १९ : राज्याला वीजेबाबत स्वंयपूर्ण करण्यासाठी विभागाने तात्कालीक स्वरूपात करावयाच्या तसेच दीर्घकालीन स्वरूपात करावयाच्या कामांचे धोरण निश्चित करावे, सध्याची वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन ८ हजार मेगावॅट औष्णिक वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेऊन तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज ऊर्जा विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये त्यांनी राज्याची सध्याची वीज निर्मिती, कोळशाचा साठा, वीजेची आजची आणि भविष्यातील मागणी आणि याअनुषंगाने करावयाच्या उपाययोजना याचा आढावा घेतला. बैठकीस उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, माजी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थाकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्यासह विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
दर आठवड्याला आढावा घेणार
राज्यात मागील पाच दिवसांपासून कोणत्याही स्वरूपाचे भारनियमन करण्यात आले नाही ही चांगली बाब असून अशीच परिस्थिती भविष्यातही कायम राहण्यासाठी वीज निर्मिती, कोळसा साठा, आयात कोळसा, वीज खरेदी याचे उत्तम नियोजन करण्यात यावे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी वीजेसंदर्भात जे निर्णय घेतले जातील त्याच्या अंमलबजावणीचा आपण दर आठवड्याला आढावा घेणार असून निर्णयांचा कार्यपूर्ती अहवाल या बैठकीत सादर करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
पावसाळ्याचे नियोजन करावे
केंद्र शासनाने १० टक्के कोळसा आयातीला मान्यता दिली आहे. ही प्रक्रिया गतीने पूर्णत्वाला न्यावी असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, येणारा पावसाळा लक्षात घेऊन कोळशाच्या साठ्याचे नियोजन करण्यात यावे. राज्याचा हक्काचा आणि दर्जेदार कोळसा राज्याला नियमितपणे उपलब्ध होईल यादृष्टीने महानिर्मितीने सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा. उरण येथील गॅस प्रकल्प सुरु करण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांशी तसेच पंतप्रधानांशी आपण स्वत: बोलू असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
मागील पाच दिवसांपासून राज्यात कोणतेही भारनियमन नाही- डॉ. नितीन राऊत
राज्यात भारनियमन करावे लागू नये म्हणून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांना यश मिळत असल्याचे व मागील ५ दिवसांपासून राज्यात कोणत्याही प्रकारचे भारनियमन करण्यात आलेले नसल्याची माहिती उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. एकट्या महाराष्ट्रातच नाही तर देशात वीजेची टंचाई आहे. कोळशाचा अपुरा पुरवठा हे त्यामागचे मुख्य कारण असून इतर १२ राज्यातही कोळशामुळे भारनियमन सुरु आहे.
राज्याला होत असलेला अपुरा कोळसा पुरवठा व उन्हाळ्यामुळे मागणी वाढली असल्याने राज्यात दर दिवशी २ हजार ते २ हजार ५०० मेगावॅट ची तूट निर्माण झाली होती. ती दूर करण्यात सध्या विभाग यशस्वी झाला आहे. विभागाने 20 लाख मेट्रिक टन कोळसा आयात करण्याच्या दृष्टीने निविदा काढल्या आहेत. महावितरणच्या स्तरावर आवश्यकतेनुसार 4 लाख मेट्रिक टन कोळसा आयात करण्याचे कार्यादेश दिलेले आहेत. वीज खरेदी करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. राज्यात भारनियमन करावे लागू नये यासाठीचे ऊर्जा विभागाने नियोजन केले आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. नगरविकास, ग्रामविकास विभागाकडील प्रलंबित वीज देयकांच्या थकबाकीची रक्कम विभागाला मिळावी अशी मागणीही डॉ. राऊत यांनी यावेळी केली. त्यांनी राज्यात येणाऱ्या कोळसा रॅकची संख्या कमी झाल्याने वीज निर्मितीमध्ये कमी आल्याचे सांगितले. कोळसा निर्मिती आणि रॅकचे उत्तम नियोजन होण्याच्या दृष्टीनेही विभाग प्रयत्न करत असल्याचेही मंत्री डॉ.राऊत म्हणाले.
बैठकीत महावितरण, महाजनकोमार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात आले.
...
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...