Thursday, 7 April 2022

काश्मीर फाईल,उघडा डोळे

 बघा कोणाचे डोळे

उघडतायत का…? 👀🙄

——————————

#kashmirfilesmovie वरुन कौल काका आठवले मला. जुना लेख आहे.

निर्वासित

माझं घर बांधून नुकतंच झालं होतं तेव्हाची गोष्ट. पलंगांच्या मापांच्या गाद्या करून घ्यायच्या होत्या. गावातल्या एका चांगल्या फर्निशिंगच्या दुकानात फोन केला, मालक म्हणाले 'दुपारी नमुने घेऊन आमच्या माणसाला पाठवतो. तुम्ही हवी त्या जाडीची, हवी त्या प्रकारची गादी निवडा. तेच गृहस्थ मापं घेतील. तीन वाजता येतील ते गृहस्थ नमुने घेऊन तुमच्या घरी'. आता हे पुण्याचे तीन, त्यामुळे ते गृहस्थ निवांत साडेतीन पर्यंत येतील ह्या हिशेबाने आम्ही सव्वातीनपर्यंत नव्या घरी पोचलो, बघितलं तर फाटकाबाहेर एक जुनी दुचाकी उभी होती आणि घराच्या पायरीवर एक साठीचे गृहस्थ आमची वाट बघत शांतपणे बसून होते. बाजूला दोन मोठ्या पिशव्या ठेवलेल्या. 


दिवस एप्रिलचे, उन्हाने अंगाची नुसती काहिली काहिली होत होती आणि त्या उन्हात तापलेल्या पायरीवर ते गृहस्थ बसले होते. आम्ही खूप खजील झालो. उशिरा आल्याबद्दल त्यांची माफी मागितली, 'असू दे बेटा, होतं असं.' ते म्हणाले. मराठीतच बोलत होते, पण भाषेत किंचित उत्तरेकडचा बाज डोकावत होता. आम्ही बरोबर आणलेल्या किल्लीने दरवाजा उघडला आणि आत गेलो. पहिलं काम केलं म्हणजे पंखा लावला आणि त्यांना पाणी दिलं. बाटली वाकडी करून ते घटाघटा पाणी प्याले आणि डोळे मिटून काही क्षण पंख्याखाली स्वस्थ बसले. 'खूप उन्हाळा तापलाय ना ह्या वर्षी '? मी म्हणाले. ते हसले, म्हणाले, 'पंधरा वर्षे झाली महाराष्ट्रात येवून, पण इथला उन्हाळा काही अजून सहन होत नाही'. खरंच, उन्हाने त्यांचा मुळचा गोरा चेहरा चांगलाच रांपला होता. 


थोड्या वेळाने एक दीर्घ सुस्कारा सोडून उठत ते म्हणाले, 'चला, बेटा, नमुने बघून घेता?'. पुढचा काही वेळ ते कामात गढून गेले. आम्हाला आणि मुलांना आणलेले नमुने    

दाखवले, प्रत्येकाची किंमत, फीचर्स व्यवस्थित समजावून सांगितले आणि आम्ही निवड केल्यानंतर त्यांनी सगळ्या पलंगांची मापे घेतली. ते मापे घेत असताना मी त्यांचे निरीक्षण करत होते. अजिबात घाई न करता, काळजीपूर्वक त्यांचं काम चालू होतं. प्रत्येक बाजू मोजली की बरोबरच्या वहीत ते आकडे नोंदवायचे, ते सुद्धा सावकाश, एका ओळीत, सुंदर अक्षरात. त्यांच्या कामात कुठेही घिसाडघाई नव्हती. माझी मुलगी त्यांचं हे माप घेणं बारकाईने बघत होती, मधून मधून त्यांना प्रश्न विचारत होती, आणि ते काका अजिबात न कंटाळता तिच्या प्रश्नांना उत्तरं देत होते. त्यांचं एकूण सौजन्य, वागण्यात ओसंडून वाहणारा सुसंस्कृतपणा, खरोखरच वाखाणण्याजोगा होता. 

मापं घेऊन झाली. नमुने परत पिशवीत ठेवत ते म्हणाले, 'आठ दिवसात गाद्या तयार होतील. पुढच्या गुरुवारपर्यंत डिलिव्हरी मिळून जाईल, आता जातो मी', 'थांबा काका, लिंबू शरबत करते' मी म्हटलं. 'नको, नको, उशीर होईल, परत गावात पोचायला हवं पाच वाजेपर्यंत,' ते संकोचानं म्हणाले. 'घ्या ना आजोबा शरबत', लेकीने आग्रह केला. हे आजोबा एकूण तिला फारच आवडले होते असं दिसत होतं. 'खूप गोड आहे तुमची मुलगी, लहानपणी माझी नात अगदी अशीच दिसायची', कौतुकाने अनन्याकडे बघत ते काका म्हणाले. 

मी शरबत करून आणलं, आणि आमच्या गप्पा सुरु झाल्या. 'तुम्ही मराठी खूप चांगलं बोलता', मी म्हटलं, 'बेटा, गेली पंधरा वर्षे झाली मी महाराष्ट्रात आहे, मग इथली भाषा शिकायला नको'? ते हसत म्हणाले. 'तुम्ही मुळचे कुठले, पंजाबचे का?' मी विचारलं. त्यांचा लख्ख गोरा रंग आणि भाषेचा लेहजा बघून मला ते मनोमन पंजाबी वाटले होते. 'नाही बेटा, माझं नाव हरीकिरण कौल. मी मुळचा काश्मीरचा. सारस्वत ब्राह्मण. काश्मिरी पंडित.' ते काहीसं खिन्न हसत बोलले. त्या एकाच वाक्यात त्यांनी त्यांच्या गेल्या दोन दशकातल्या आयुष्याचा पूर्ण जमाखर्च मांडला होता. 'मग तुम्ही, काश्मीर नव्वदमध्ये सोडलंत'? मला पुढे बोलवेना. 

'सोडावंच लागलं बेटा. श्रीनगर मध्ये दुकान होतं माझं स्वतःचं. हेच फर्निशिंगचं. घर होतं, जमीन होती. पण अक्षरशः एका रात्रीत सगळं सोडून जावं लागलं. ज्यांच्याशेजारी पिढ्यानपिढ्या राहिलो होतो तेच जीवावर उठले. आम्हाला सांगण्यात आलं, आजादीच्या लडाईत सामील व्हा, तुमच्या पोरी-बाळी आमच्या स्वाधीन करा नाहीतर काश्मीर सोडून चालते व्हा'. कौल म्हणाले. भावनावेगाने त्यांचा आवाज कापत होता. 'कुठे जाणार होतो आम्ही आमचं वतन सोडून? पण जावंच लागलं आणि सगळ्या आयुष्याचीच फरफट झाली पहा'. 

'काही दिवस जम्मूला नातेवाईकांकडे काढले, काश्मीरला लवकरच परिस्थिती निवळेल आणि आम्ही परत जाऊ ह्या आशेने. पण काही काही झालं नाही. सरकारने काहीही मदत केली नाही आम्हाला. तिथून आम्ही आलो दिल्लीला. तिथे निर्वासित म्हणून काही महिने काढले. मग पोटाच्या पाठी लागून एक दिवस मुंबईला आलो. मुलं शाळेत शिकत होती, हातपाय हलवणं भागच होतं आम्हाला. मुंबईला एका फर्निशिंगच्याच दुकानात नोकरी धरली, हरकाम्या म्हणून, काश्मीरला दहा माणसं माझ्या दुकानात पगारावर होती, आणि इथे मुंबईत मी हातात टेप घेऊन कुणाच्या तरी दुकानात सामान्य कामगार म्हणून उभा होतो. पुढे चांगल्या कामामुळे मालकाचा विश्वास कमावला आणि त्याने पुण्याला पाठवलं, इथल्या दुकानाची व्यवस्था बघायला. तेव्हापासून पुण्यातच आहे'. कौलकाका म्हणाले. 

त्यांची कहाणी ऐकून मी सुन्न झाले होते. काश्मिरी पंडितांची वाताहत कशी झाली, कुणी केली हे वर्तमानपत्रातून वाचणं वेगळं आणि अश्या ठसठसत्या वेदनेचा आलेख डोळ्यांसमोर कुणी उलगडत असताना ऐकणं वेगळं. 'आता मुलं काय करतात', गढूळलेलं वातावरण निवळावं म्हणून मी कौलकाकांना विचारलं. ते परत एकदा काहीसं कडवट हसले, म्हणाले, 'मुलं मोठी झालीत आता, मुलीचं लग्न झालंय. ती दिल्लीला असते. मुलगा अमेरिकेत एमएस करून नोकरी करतोय, म्हणतोय मी परत भारतात येणार नाही. आता अमेरिकेतच राहीन. निर्वासितच म्हणून राहायचं तर इथे अमेरिकेत का नको? आपल्याच देशात निर्वासिताचं जिणं जगणं ह्याहून जास्त लाजीरवाणी गोष्ट जगात असूच शकत नाही'. 

कौलकाका निघून गेले तरी त्यांचे शब्द कितीतरी वेळ माझ्या कानात घुमत होते! 

- Shefali Vaidya…

 *सर्वानी झाडे लावा नाही तर ही नवीन कविता पाठ्यपुस्तकात येईल ........*


झुक झुक झुक झुक आगीनगाडी 🚂

पाण्याचे डबे आणून सोडी 🚎

वाळकी झाडे पाहू या 🎍🌾

मामाच्या गावाला जाऊ या 👫


मामाचा गाव मोठा 😆

पाण्याचा लय तोटा 🚱

हंडा रांगेत लावु या 🏮🏮

मामाच्या गावाला जाऊ या 👫


मामाची बायको सुगरण 💃🏻

पाण्यासाठी फिरते वणवण 😰

बिनआंघोळीचे राहू या 😝

मामाच्या गावाला जाऊ या 👫


मामाची बायको गोरटी ☺

म्हणेल कुठून आलीत ही कार्टी😜

पाण्यासाठी भांडु या 😡

मामाच्या गावाला जाऊ या 👫


मामा मोठा तालेवार 👳🏻

आंघोळीच्या गोळ्या आणल्यात चार 💊

कोरड्या पाण्याने न्हाऊ या 🗑

मामाच्या गावाला जाऊ या 👫


😝😂😆

*झाडे लावा, झाडे जगवा*

😂😂😂

आठवणीतील खेळ


 

 सर्व जिल्ह्यांत व तालुक्यात 7 मे रोजी राष्ट्रीय लोकअदालत.

            मुंबई, दि 6 : विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, १९८७ मधील तरतुदी अंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, यांनी संपूर्ण राज्यात तालुका, जिल्हा व उच्च न्यायालयात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय लोकअदालत 7 मे २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे, असे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांनी कळविले आहे.

.    न्यायालयीन प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तसेच दिवाणी दावे आपसी सामंजस्याने मिटविण्याबाबत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण हे वेळोवेळी लोक अदालतीचे आयोजन करीत असते.त्या अनुषंगाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार 7 मे २०२२ रोजी मुंबई येथील सर्व न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याद्वारे दूरचित्रसंवाद प्रणालीच्या माध्यमातून प्रकरणे तडजोड करून मिटविण्याची मुभा देण्यात आली आहे.

लोकअदालतीत ठेवण्यात येणारी प्रकरणे

            धनादेश अनादराची प्रकरणे, बॅंकेची कर्ज वसुली प्रकरणे, कामगारांचे वाद, विद्युत आणि पाणी देयकाबाबतची प्रकरणे, तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, आयकर कायद्यातील फौजदारी स्वरूपातील तडजोड प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई देण्याबाबतची प्रकरणे, वैवाहिक वाद, संपादन प्रकरणे व दिवाणी दावे तसेच उपरोक्त नमूद स्वरूपातील दाखल पूर्व प्रकरणे सुनावणी करिता ठेवण्यात येणार आहेत.

तरी ज्या पक्षकारांना वर नमूद प्रकारची प्रकरणे दि. 7 मे २०२२ रोजी लोकअदालतीत ठेवावयाची आहेत, त्या पक्षकारांनी संबंधित न्यायालयात आपल्या प्रकरणाचा विनंती अर्ज लवकर सादर करावा व प्रकरण सामंजस्याने तत्काळ मिळवावे असे आवाहन मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे तथा नगर दिवाणी व सत्र न्यायालय, बृहन्मुंबईच्या प्रधान न्यायाधीश उर्मिला जोशी-फलके व सचिव हितेंद्र वाणी यांनी केले आहे.

राष्ट्रीय लोक अदालतीचे फायदे

● प्रकरणात जमा केलेली संपूर्ण कोर्ट फी परत मिळते

●लोकअदालतीतील निवाड्यास कुठल्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही.

●सामंजस्याने वाद मिटल्यामुळे वेळ व पैसे दोन्हींची बचत होते.

· ● लोक अदालतीमध्ये पक्षकारांना आपली बाजू स्वत: मांडण्याची संधी मिळते.

अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी कळविली आहे.

०००

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातवैध मापन शास्त्र विभागाचे सहनियंत्रक डॉ.ललित हारोडे यांची मुलाखत.

          मुंबई, दि. 6 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात वैध मापन शास्त्र विभागाचे सहनियंत्रक डॉ.ललित हारोडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार रणधीर कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

        गुरुवार, दि. 7 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR

            वैध मापनशास्त्र विभागाचे कार्य, वजन मापासंदर्भात ग्राहकांच्या काही तक्रारी असतील तर त्याचे निराकरण कशाप्रकारे करण्यात येते, ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांनी घ्यावयाची काळजी, बाजारातून कुठलीही पॅकींग असलेली वस्तू खरेदी करताना घ्यावयाची काळजी, ग्राहकांना असलेले अधिकार, मापांबाबत असलेल्या तक्रारी कोठे करायच्या आदी विषयांची सविस्तर माहिती डॉ. ललित हारोडे यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.

0000



 मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतर्गत कामाची गुणवत्ता व

दर्जा राखुन वेळेत कामे पूर्ण करावी

- शंकरराव गडाख.

            मुंबई, दि. 6: मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत करण्यात येणारी कामे पूर्ण करताना कामाची गुणवत्ता, दर्जा सांभाळूनच कामे वेळेवर पूर्ण करण्यात यावीत असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

            मृद व जलसंधारण विभागामार्फत कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर मंडळांतर्गत सर्व जिल्ह्यातील मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम, राज्यस्तर योजना, जिल्हा नियोजन समिती व महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अंतर्गत 0 ते 600 हेक्टर सिंचनक्षमतेच्या सर्व योजनांचा आढावा मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात घेण्यात आला. यावेळी या विभागाचे सचिव डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्यासह विभागाचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. गडाख म्हणाले की, मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत साधारणपणे 2,500 ते 3,000 प्रकल्पांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच ही कामे करीत असताना कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहील याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. प्रगतीपथावरील योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी भूसंपादन करीत असताना कोणत्याही तक्रारी येणार नाही याकडेही विशेष लक्ष देण्यात यावे. योजनेचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी नियमित स्वरुपात स्थळ पाहणी करणे, जिओ टॅगिंग करणे, डॅशबोर्डवर माहिती भरणे तसेच दुरुस्ती व प्रगतीपथावरील सुमारे 4000 योजना पावसाळ्यापर्यंत पूर्ण कर्ण्याचे निर्देश श्री.गडाख यांनी दिले.

0000



 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना

राबविण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करा

 - विजय वडेट्टीवार.

            मुंबई, दि.6 : विमुक्त जाती, भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गाकरिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

            मंत्रालयातील दालनात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविण्याबाबत मंत्री श्री. वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इतर मागास प्रवर्ग विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, वित्त विभाग, नियोजन विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

            मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, विमुक्त जाती, भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गाकरिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविण्याबाबत सन २०२१-२२ या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली आहे.तसेच अन्न,नागरी पुरवठा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमितीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना ही स्वतंत्र योजना राबविण्याची शिफारस केलेली आहे.सध्या विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यात येत असल्याने विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गाकरिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. याकरिता विभागाने या योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करावा. असे निर्देशही मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी बैठकीत दिले.

००००



 प्रधानमंत्री पीक विमा योजनेत बीड मॉडेलचा समावेश व्हावा

                                             - कृषी मंत्री दादाजी भुसे

            नवी दिल्ली, दि. 6 : पीक विमा कंपन्यांना नफा व तोटा यामध्ये संतुलन राखणारे बीड मॉडेल (80:110) याचा समावेश प्रधानमंत्री पीक विमा योजनेत व्हावा अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्याकडे मंगळवारी केली.

            कृषी मंत्री श्री भुसे यांनी मंगळवारी श्री तोमर यांची भेट घेऊन त्यांना ‘बीड मॉडेल’ची माहिती दिली. या मॉडेलमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा विचार अधिक केला गेला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत याचा समावेश झाल्यास त्याचा लाभ शेतक-यांना होईल. त्यामुळे बीड मॉडेलचा समावेश व्हावा अशी मागणीचे निवेदन श्री भुसे यांनी श्री तोमर यांना दिले. येत्या खरीप हंगामात हे राबविल्यास शेतकऱ्यांना त्याचा अधिक लाभ मिळेल, असे, श्री भुसे यांनी बैठकीनंतर सांगितले.

            यासह एकात्मिक फलोत्पादन अभियानामध्ये फळबागांसाठी प्लॉस्ट‍िक कव्हर व नेट (जाळी) चा समावेश करावा अशीही मागणी श्री भुसे यांनी श्री तोमर यांच्याकडे केली. फळांना चांगला भाव मिळण्यासाठी हंगामापूर्वी किंवा नंतर फळांचे उत्पादन वाढविण्यासाठी, नैसर्गिक आपत्तीपासून फळांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी प्लॉस्ट‍िक कव्हर अथवा नेट वापरतात. काही शेतकरी ते स्वत: खर्च करतात. मात्र, सर्वच शेतकऱ्यांना ते परवडण्यासारखे नसते. त्यामुळे एकात्मिक फलोत्पादन अभियानामध्ये याचा समावेश झाल्यास शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पादन घेण्यास सोयीचे होईल, त्यामुळे या योजनेत प्लॉस्ट‍िक कव्हर व नेट चा समावेश करण्याची मागणी श्री भुसे यांनी केंद्रीय कृषीमंत्री यांच्याकडे केली.

            याच योजनेमधल्या घटकांचे मापदंड व्याप वाढविण्याबाबतची मागणी श्री भुसे यांनी यावेळी केली. या अंतर्गत कांदाचाळी, वेअरहाऊस, कोल्ड स्टोरेज आदींचा लाभ देण्यात येतो. याबाबतचे मापदंड 2014 मध्ये निश्चित करण्यात आले होते. सध्या कच्च्या मालाचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना कांदाचाळी, वेअर हाऊस, कोल्ड स्टोरेज उभारणीचा खर्च वाढला आहे. मात्र, त्यावर आधारीत अनुदान कमी मिळते. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांकडून याबाबतचे मापदंड बदलून नव्याने तयार करण्याची मागणी असल्याचे श्री. भुसे यांनी श्री तोमर यांच्या निर्देशनास आणून दिले. कृषी मंत्री श्री तोमर यांनी राज्यातील कृषी आणि फलोत्पादनाशी निगडित विषयांवर सकारात्मक निर्णय घेतले जातील, असे आश्वासन दिल्याचे श्री भुसे यांनी बैठकीनंतर सांगितले.          

खरीप हंगामासाठी केंद्राने खते लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी

            राज्यात खरीप हंगामासाठी केंद्राने लवकरात लवकर खते उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय रासायनिक आणि खते मंत्री भगवंत खुबा यांच्याकडे केली. याविषयीचे निवेदनही श्री. खुबा यांना दिले. राज्याने 2022 खरीप हंगामासाठी 52 लक्ष मेट्रीक टन खतांची मागणी केली आहे. केंद्र सरकारने 45 लक्ष मेट्रीक टन खतांची मागणी मंजुर केली आहे. राज्याची मागणी बघता केंद्राने वाढीव खतांचा पुरवठा मंजूर करून राज्याला लवकरात लवकर खते पुरवावी अशी विंनती श्री भुसे यांनी श्री खुबा यांच्याकडे केली.

राष्ट्रीय महामार्ग 160 आणि राज्य महामार्ग 19 बाबत केंद्रीय परिवहन मंत्री यांची भेट

            मालेगाव शहरासाठी बायपास असणारा सिन्नर-घोटी- त्र्यंबकेश्वर- मोखाडा-जव्हार-‍विक्रमगड-मनारे-पालघर या राष्ट्रीय महामार्ग 160 चे काम लवकर पूर्ण झाल्यास नाशिक आणि मुंबईसाठी रहदारी अधिक सोयीचे होईल, असे कृषी मंत्री श्री भुसे यांनी केंद्रीय परिवहन मंत्री श्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली.

            यासह कोठारे-सटाणा-मालेगाव-चाळीसगाव राज्य महामार्ग 19 चे चौपदरीकरणही लवकर पूर्ण केल्यास नाशिक जिल्ह्यातील वाहतूक अधिक सूरळीत होईल, असे श्री गडकरी यांना श्री भुसे यांनी विंनती केली. केंद्रीय मंत्री श्री गडकरी यांनी याबाबत सकारात्मक आश्वासन दिले, असल्याचे श्री भुसे यांनी बैठकीनंतर सांगितले.


००००



 

Featured post

Lakshvedhi