Wednesday, 16 March 2022

 फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी रोहयो आणि फलोत्पादन

विभागाचा घेतला आढावा

हळद संशोधन व प्रक्रिया धोरणाविषयी चर्चा.

            मुंबई, दि. 15 : हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीद्वारे सादर करण्यात आलेल्या अहवालावर फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी समितीचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील यांच्याशी चर्चा करून सविस्तर आढावा घेतला.

            मंत्रालयात रोहयो आणि फलोत्पादन विभागाच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, कृषी व फलोत्पादन विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, फलोत्पादन विभागाचे संचालक कैलास मोते यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते .

             शेडनेटधारक शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात श्री.भुमरे यांनी समस्या जाणून घेतल्या. श्री.भुमरे म्हणाले, सर्व शेडनेटधारक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक असून त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याकरिता बँकांशी पत्रव्यवहार करण्यात येईल. यावेळी शेडनेटधारक शेतकऱ्यांच्या राज्यस्तरीय समितीने फलोत्पादन मंत्री भुमरे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

             हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील यांनी संशोधन व प्रक्रिया धोरणावर सविस्तर चर्चा केली.

00000



 जेवढा राग भर उन्हात गाडी पंक्चर झाल्यावर नाही येत, तेवढा राग

४० रुपयाचं कलिंगडं🍉 पांढरं निघाल्यावर येतो...😠😠

आणि त्याहुन जास्त येतो जेव्हा बायको म्हणते

*"कळत नाही तर आणता कशाला?*

😖😖

*उन्हाळ्याच्या शुभेच्छा*

😅😅 😜😜

 *३६५ दिवस✈️हार्टफुलनेस गोष्टीं बरोबर🌍*

❤️ *गोष्ट - १५६ *❤️

*नात्यांची वीण कशावर पोसली जाते?*

*नात्यांची वीण*

एका सोनाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले होते. त्यांच्याकडे खाण्यापिण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. एके दिवशी सोनाराच्या पत्नीने, आपल्या मुलाला नीलमणीचा एक हार दिला आणि म्हणाली- "बेटा, हा हार घेऊन तुझ्या काकांच्या दुकानात जा आणि त्यांना सांग की हा हार विका व आम्हाला काही पैसे द्या."

मुलगा तो हार घेऊन काकांच्या दुकानात गेला. काकांनी त्या हाराकडे बारकाईने पाहिले आणि म्हणाले - "बेटा, आईला सांग की सध्या बाजारात खूप मंदी आहे. थोडे दिवस थांबून नंतर तो विकल्यास, तुम्हाला चांगला भाव मिळेल." त्याला थोडे पैसे देत त्याचे काका म्हणाले, “तू उद्यापासून माझ्याबरोबर दुकानात बसत जा.”

दुसऱ्या दिवसापासून तो मुलगा रोज दुकानात जाऊ लागला आणि तिथे बसून हिर्यान्ची आणि रत्नांची पारख कशी करायची, ते शिकू लागला.

थोड्याच दिवसात, तो हिऱ्यांचा मोठा पारखी झाला. आपल्या हिऱ्यांची पारख करवून घेण्यासाठी, दूर -दूरवरून लोकं त्याच्याकडे येऊ लागले.

एके दिवशी त्याचे काका त्याला म्हणाले, "बेटा, तुझ्या आईकडून तो हार घेऊन ये आणि तिला सांग की आता बाजारात खूप तेजी आहे, त्याला चांगला भाव मिळेल."

आईकडून तो हार घेऊन, त्याने स्वत:च त्याची पारख केली असता तो हार नकली असल्याचे त्याला आढळून आले. त्याला आश्चर्य वाटले, की काका स्वत: हिऱ्याचे व रत्नांचे मोठे पारखी आहेत... मग त्यांनी आम्हाला हे का सांगितले नाही?

मुलगा तो हार घरीच ठेवून तसाच दुकानात परत आला.

काकांनी विचारले, "अरे तू हार का आणला नाहीस?" तो म्हणाला, "काका, तो हार तर नकली आहे... परंतु तुम्ही माझ्यापासून हे का लपवून ठेवलेत?"

तेव्हा काका म्हणाले, "जेव्हा तू पहिल्यांदा हार आणला होतास, तेव्हा जर मी तो हार नकली आहे असं सांगितलं असतं, तर तुला असं वाटलं असतं की आज आमच्यावर वाईट वेळ आली आहे, म्हणून काका मला असं सांगत आहेत.

पण आज जेव्हा तुला खरं काय आणि खोटं काय, हे पारखण्याचे ज्ञान झाले आहे, तेव्हा तुला समजलेच असेल की तो हार खरोखरीच नकली आहे. त्यावेळी खरं बोलण्यापेक्षा, नातं सांभाळणं, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं."

सत्य हे आहे की या जगात, खर्या ज्ञानाशिवाय आपण जो काही विचार करतो, पाहतो आणि जाणतो ते चुकीचे आहे. आणि म्हणूनच अशा गैरसमजुतींना बळी पडून आपल्या नात्यात दुरावा निर्माण होतो आणि आपलं आयुष्य भरकटायला लागतं.

ज्या अदृश्य धाग्याने नाते विणले जाते त्याचे पोषण, हे प्रेम आणि विश्वासावर होत असते.

"नात्यात निर्माण झालेल्या थोड्याशा दुराव्यामुळे, कोणाचीही साथ सोडू नका... नाहीतर लोकांना आपलेसे करण्यात आयुष्य खर्ची करावे लागते."                 

*सत्य अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करा, की ज्यामुळे इतरांमधे प्रेम निर्माण होईल.*

*दाजी*

*Heartfulness Meditation* 💌

*मराठी अनुवाद टीम, हार्टफुलनेस नाशिक

Tuesday, 15 March 2022

 एकाच मोजणी रजिस्टर नंबरचे दोन दस्तऐवज;

प्रकरणाची तपासणी करुन गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देणार

- राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे.

            मुंबई, दि. 15 : राजगुरुनगर नगरपरिषद हद्दीमध्ये गट नंबर ३१४/१ आणि ३१४/३ मध्ये बांधकाम सुरु असून संबंधित विकासकाने सादर केलेल्या दस्तऐवजात फेरफार असल्याचे तथ्य आढळून आले आहे. एकाच मोजणी रजिस्टर नंबरचे दोन दस्तऐवज संबंधितांनी नगरपरिषदेला दिले असून ही गंभीर बाब असल्याने या प्रकरणाची तपासणी करुन गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले जातील, असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत सांगितले.

            विधानसभेत दिलीप मोहिते-पाटील, ॲड.अशोक पवार, डॉ. किरण लहामटे या सदस्यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री तनपुरे यांनी सांगितले की, राजगुरुनगर नगरपरिषद हद्दीमध्ये गट नंबर ३१४/१ आणि ३१४/३ मध्ये बांधकाम सुरु असून त्याच्या १२०० चौरस मीटर क्षेत्रफळाची मोजणी २०१३ मध्ये करण्यात आली होती. या मोजणीची नक्कल २०१६ ला भूमी अभिलेखकडून मिळवली त्यात २४०० चौरस मीटर क्षेत्रफळाची नोंदणी केलेली आहे. या प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी सुरु असून अहवालानंतर कठोर कारवाई करण्यात येईल. या विकासकाला नगरपरिषदेने दिलेली बांधकाम परवानगी रद्द केली असून या आदेशाला विकासकाने न्यायालयातून स्थगिती मिळवली आहे. चुकीच्या नक्कल, सनद देखील रद्द केल्या असून त्याविरोधात संबंधित विकासक न्यायालयात गेला आहे, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचेही राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी सांगितले.

            खोटे दस्तऐवज तयार करुन एकाच क्रमांकाचे दोन दस्तऐवज नगरपालिकेला देणे ही गंभीर बाब असून भूमि अभिलेख उपसंचालकांना हे तपासून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. यासंदर्भात अधिकची कागदपत्रे निदर्शनास आली तर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले जातील, असेही राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी सांगितले.

 राष्ट्रीय सेवा योजनेसाठी अर्थसंकल्पात 7 कोटी रुपयांची तरतूद

- एनएसएस राज्य सल्लागार समिती सदस्य अंकित प्रभू

· उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्याला यश.

            मुंबई,दि. 15 : राज्याच्या अर्थसंकल्पात राष्ट्रीय सेवा योजनेसाठी 7 कोटी रुपयांची तरतूद केली असून यामुळे राज्यातील सुमारे साडे तीन लाख विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांनी राष्ट्रीय सेवा योजनेसाठी वाढीव निधीची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रीय सेवा योजनेसाठी वाढीव तरतूद केली असल्याची माहिती, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य सल्लागार समिती सदस्य अंकित प्रभू यांनी दिली.

            श्री. प्रभू म्हणाले, केंद्र सरकारने राष्ट्रीय सेवा योजनेसाठीच्या निधीतही वाढ केली आहे. ही बाब उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत लक्षात आणून दिली. तसेच आपणही निधी वाढवून देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यावेळी कोणताही विलंब न करता अर्थसंकल्पात 7 कोटी रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे श्री. प्रभू यांनी आभार मानले आहेत.

            राज्य आणि केंद्र सरकारने राष्ट्रीय सेवा योजनेच्या अनुदानात भरीव वाढ केल्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना पूर्वी नियमित कार्यक्रमासाठी 250 रुपये मिळत होते, त्यात वाढ होऊन 400 रुपये मिळणार आहेत. तर विशेष कार्यक्रमासाठी पूर्वी 450 रुपये मिळत होते, त्यात वाढ होऊन 700 रुपये मिळणार आहेत, अशी माहिती श्री. प्रभू यांनी दिली.

 🪔🪔🪔🪔🪔🏵️🪔🪔🪔🪔🪔

                    *🔸उपदेशामृत.🔸*

*एकदा समर्थ रामदासस्वामी भिक्षा मागण्यासाठी एका घरासमोर उभे राहिले. त्यांनी दार वाजवून "जय जय रघुवीर समर्थ।" असा आवाज दिला.*

*त्या वेळी घराचे दार उघडून एक स्त्री बाहेर आली. तिने महाराजांच्या झोळीत भिक्षा घातली आणि म्हणाली,*

*स्त्री : महाराज, काही उपदेश द्या.*

*समर्थ : आज नाही; उद्या देतो.*

*दुसर्‍या दिवशी समर्थांनी पुन्हा त्या घरासमोर उभे राहून आवाज दिला.*

 *त्या दिवशी त्या महिलेने बदाम आणि पिस्ता घालून खीर बनवली होती. ती स्त्री खीरीचा वाडगा घेऊन बाहेर आली.*

 *समर्थांनी कमंडलू पुढे केल्यावर खीर त्या कमंडलुत ओतण्याआधी तिला त्यात शेण आणि कचरा दिसला. त्यामुळे ती खीर घालण्यासाठी थांबली.*

*ती समर्थांना म्हणाली,*

*स्त्री : महाराज, हा कमंडलू तर खराब आहे.*

*समर्थ : खराब तर आहे; पण तू त्यातच खीर घाल.*

*स्त्री : नाही महाराज. मग खीर खराब होईल. तुमचा कमंडलू द्या. तो मी धुऊन स्वच्छ करून देते.*

*समर्थ : म्हणजे हा कमंडलू स्वच्छ झाल्यावरच तू त्यात खीर घालणार ना ?*

*स्त्री : हो महाराज.*

*समर्थ : माझाही हाच उपदेश आहे. मनात जोपर्यंत चिंतेचा कचरा आणि वाईट संस्कारांचे शेण असेल, तोपर्यंत उपदेशामृताचा काही लाभ होणार नाही.*

*"जर उपदेशामृत मिळवायचे असेल, तर आधी मन शुद्ध करावे लागेल. वाईट संस्कारांचा त्याग करावा लागेल."*

*तेव्हाच खर्‍या सुखाची आणि आनंदाची प्राप्ती होऊन तो अनुभवता येईल...!!!*

🪔🪔🪔🪔🪔🏵️🪔🪔🪔🪔🪔

 🌺उन्हाळ्यात तब्येत सांभाळा🌺


🔥 उष्ण व थंड पदार्थ ❄

कलिंगड - थंड

सफरचंद - थंड

चिकू - थंड 

संत्री - उष्ण

आंबा - उष्ण            

लिंबू - थंड

कांदा - थंड

आलं/लसूण - उष्ण

काकडी - थंड

बटाटा - उष्ण

पालक - थंड 

टॉमेटो कच्चा - थंड

कारले - उष्ण

कोबी - थंड 

गाजर - थंड 

मुळा - थंड

मिरची - उष्ण

मका - उष्ण

मेथी - उष्ण

कोथिंबीर/पुदिना - थंड

वांगे - उष्ण

गवार - उष्ण

भेंडी साधी भाजी - थंड

बीट - थंड 

बडीशेप - थंड 

वेलची - थंड 

पपई - उष्ण

अननस - उष्ण 

डाळींब - थंड 

ऊसाचा रस बर्फ न घालता - थंड

नारळ(शहाळ) पाणी - थंड

मध - उष्ण

पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर) - थंड

 *मीठ* - *थंड* 

मूग डाळ - थंड 

तूर डाळ - उष्ण

चणा डाळ - उष्ण 

गुळ - उष्ण 

तिळ - उष्ण 

शेंगदाणे,बदाम,काजू,अक्रोड,खजूर - उष्ण 

हळद - उष्ण 

चहा - उष्ण

कॉफी - थंड

पनीर - उष्ण

शेवगा उकडलेला - थंड

ज्वारी - थंड

बाजरी/नाचणी -उष्ण

आईस्क्रीम - उष्ण

श्रीखंड/आम्रखंड - उष्ण

दूध,दहही,तूप,ताक (फ्रिज मधले नाही) - थंड 

फ्रिज मधले सगळे पदार्थ -उष्ण

फ्रिज मधिल पाणी - उष्ण

माठातील पाणी - थंड

एरंडेल तेल - अती थंड

तुळस - थंड

तुळशीचे बी - उत्तम थंड

सब्जा बी - उत्तम थंड

नीरा - थंड

मनुका - थंड 

पाव/खारी/ बिस्कीट -उष्ण

हॉट ड्रिंक सर्व - उष्ण

कोल्डरिंग सर्व - उष्ण 

मास/चिकन/मटण- उष्ण

अंडी (फक्त उकडलेल पांढरे) - थंड

*उन्हाळ्यात नैसर्गिक रित्या थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास गरमीपासून शरीरास होणारा त्रास कमी होतो .*

🌺कृपया वाचून झाल्यावर आपल्या जवळ जी मित्रमंडळी असतील त्या सर्व लोकांना पाठवा...📲🙏

Featured post

Lakshvedhi