Thursday, 13 January 2022

 कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही

- परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांची ग्वाही

प्रवासी जनतेची गैरसोय टाळण्यासाठी, एसटीच्या भविष्यासाठी

संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर यावे

- ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांचे आवाहन

            मुंबई, दि. 10 : एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांहून अधिककाळापासून संप पुकारला आहे. विलिनीकरणाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. एसटी कामगारांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता व घरभाडे भत्ता देण्यात आल्यानंतरही केवळ विलिनीकरणासाठी संप सुरु ठेवण्यात आला आहे. राज्यभरात एसटी बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. आतापर्यंत ज्या संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही, अशा सुमारे 50 हजार कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू झाल्यास त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही. त्याचबरोबर बडतर्फ, निलंबित आणि सेवासमाप्ती यासारख्या कारवाई झालेल्या संपकरी कर्मचाऱ्यांच्याबाबतीत वाहतूक सुरळीत सुरु झाल्यानंतर सकारात्मक विचार करू, अशी ग्वाही परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली.

            या संपाच्या पार्श्वभूमिवर खासदार शरद पवार व परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी एसटी कामगार संघटनांच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी कृती समितीने संपकरी कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या कारवाईबाबत एसटी प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे मत मांडले. तसेच एसटीचे दैवत असलेल्या जनतेचे अतोनात हाल टाळण्यासाठी तातडीने एसटी सुरु करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.

            गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे एसटी महामंडळासारख्या सर्वसामान्यांशी नाळ जोडलेल्या संस्थेला आर्थिक संकटाशी सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये लाखो प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच आपल्या महामंडळाच्या भविष्यासाठी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर रूजू व्हावे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषीमंत्री व खासदार शरद पवार यांनी केले.

            खासदार श्री.शरद पवार म्हणाले, गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ विलिनीकरणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महाराष्ट्रातील लाखो प्रवासी जनतेचे अपरिमित हाल होत आहेत. गेली 70 वर्षांपेक्षा अधिककाळ सर्वसामान्यांची एसटी कष्टकरी एसटी कामगारांच्या प्रामाणिक प्रयत्नांवर व प्रवाशांच्या विश्वासार्हतेवर टिकून आहे. एसटी ही प्रवाशांच्या हितासाठी आहे. प्रवाशांच्या हिताची जोपासना करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक व्यवसाय संकटात सापडले आहेत. त्याला एसटी देखील अपवाद नाही. तरीदेखील एसटीच्या कर्मचाऱ्यांना 41 टक्क्यांपर्यंत वेतनवाढ देण्यात आलेली आहे. हा निर्णय अंत्यत धाडसी असून त्याबद्दल त्यांनी एसटी प्रशासन आणि शासनाचे कौतुक केले. तथापि, कृती समितीने सुधारीत वेतनवाढीतील तफावतीबाबत नोंदविलेल्या आक्षेपावर एसटी प्रशासन आणि राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

            परिवहन मंत्री ॲड.परब म्हणाले, निलंबन, बडतर्फ आणि सेवासमाप्ती झालेले कर्मचारी सोडून सुमारे 50 हजार कर्मचाऱ्यांना गैरहजेरीबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हे कर्मचारी कामावर रूजू झाल्यास नोटीस मागे घेण्यात येईल, तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. तसेच या बाबतचे परिपत्रकही काढण्याचे निर्देशही त्यांनी एसटी महामंडळ प्रशासनाला दिले. तसेच याबरोबरच बडतर्फ, निलंबित आणि सेवासमाप्ती यासारख्या कारवाई झालेल्या संपकरी कर्मचाऱ्यांच्याबाबतीत वाहतुक सुरळीत सुरु झाल्यानंतर सकारात्मक विचार करू, असे प्रति़पादन करीत संपकरी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन मंत्री ॲड.परब यांनी केले.


००००




 



 सर्वसामान्यांचे आधारवड व्हापोलीस दलाची शान वाढवा

उपमुख्यमंत्री अजित पवार

·        भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

 

            मुंबईदि. 13 : महाराष्ट्राच्या पोलीस दलाला त्यागाचीबलिदानाचीशौर्याची परंपरा  आहे. महाराष्ट्र पोलीस दल जागतिक पातळीवर लौकिक प्राप्त झालेले पोलीस दल आहे. या पोलीस दलाचा राज्यातील प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. अशा महाराष्ट्र पोलीस दलात सेवा करण्याची आपणास मोठी संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करत सर्वसामान्यांचे आपण आधारवड व्हापोलीस दलाची शान वाढवाअसे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना केले.

            मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी परिविक्षाधीन अधिकारी अभयसिंह देशमुख (प्रशिक्षण जिल्हा लातूर)गोकुल राज (प्रशिक्षण जिल्हा कोल्हापूर)अशीत कांबळे (प्रशिक्षण जिल्हा जळगाव)महक स्वामी (प्रशिक्षण जिल्हा वाशीम)रश्मिथा राव निथीपुडी (प्रशिक्षण जिल्हा बीड)पंकज अतुलकर (प्रशिक्षण जिल्हा औरंगाबाद ग्रामीण)ऋषीकेश रेड्डी सिंगा रेड्डी (प्रशिक्षण जिल्हा रत्नागिरी)तेगबीर सिंह संधू (प्रशिक्षण जिल्हा पुणे ग्रामीण)एम.व्ही. सत्या साई कार्तिक (प्रशिक्षण जिल्हा सोलापूर ग्रामीण)शफकत अम्ना (प्रशिक्षण जिल्हा वर्धा) उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार  म्हणालेपोलीस दलातील अधिकारी म्हणून  सर्वसामान्य जनतेला तुमचा आधार वाटला पाहिजे. आपला माणूस’ अशी तुमची समाजात प्रतिमा असली पाहिजे. नोकरी करताना तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुमच्या कार्यालयात येणाऱ्या माताभगिनींना सन्मानाची वागणूक द्या. त्यांचे प्रश्न समजून घ्या. शाळकरीमहाविद्यालयीन मुलींना कोणी त्रास देत असेल तर त्यांचा बंदोबस्त करा. महाराष्ट्राचा वारसाइतिहाससामाजिक लढेचळवळीपरंपरा आपण समजून घ्या.

            महाराष्ट्र पोलीस दलाची शान वाढवण्याचीप्रतिष्ठा जपण्याचीप्रतिमा उंचावण्यासाठी कार्यरत राहून महाराष्ट्र पोलीस दलाचे वैभव समृद्ध करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

00000

 ☝️खासदार शशी थरूर यांचा हा व्हिडियो नुकताच पाहण्यात आला. एका विद्यार्थिनीने त्यांना असा प्रश्न विचारला की 'ब्रिटिश भारतात आलेच नसते तर काय झालं असतं ?'un त्यावर थरूर यांनी उत्तर दिलंय की, "ब्रिटिश भारतात आले नसते तर आज भारतावर मराठा साम्राज्याचे म्हणजेच महाराष्ट्रातील मराठी जनतेचे देशावर राज्य राहिले असते, आणि मराठ्यांनी म्हणजेच महाराष्ट्रातील मराठी जनतेने छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या लोकशाही आणि सर्वधर्म समभावाच्या विचाराने संविधानिक मार्गाने देशावर राज्य केलं असतं !" आपणही जरूर पहा !


 *साखर पूर्णपणे बंद करण्यामुळे आरोग्यावर काय परिणाम होतात, हे तुम्हाला ठाऊक आहे का? ठाऊक नसेल, तर ते जाणून घ्यायची इच्छा नक्कीच असेल ना....? तर मित्रहो, साखर पूर्णपणे बंद केल्याने शरीरावर काय परिणाम दिसून येतो हे तुम्हाला माहित आहे का? चला जाणून घेऊ या!*

१. साखर कमी केल्याने तुमचे हृदय चांगल्याप्रकारे काम करेल. हृदय हा एक संवेदनशील अवयव आहे, त्यामुळे त्याची अतिरिक्त काळजी घेणे गरजेचे आहे. साखर कमी केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

२. साखर कमी केल्याने तुम्हाला तुमच्या त्वचेमधेही फरक दिसेल. तुमची त्वचा आणखी सुंदर आणि तजेलदार दिसेल. विशेषतः रात्रीच्या वेळी साखरेचे पदार्थ न खाल्यास तुमच्या त्वचेववर सुरकुत्या उमटत नाहीत.तुमच्या चेहऱ्यावरील मुरुमे, डाग घालवण्यासाठी तुम्हाला क्रीम वगैरे लावायची देखील गरज भासणार नाही. साखर कमी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये विलक्षण फरक दिसेल.

३. साखर कमी केल्याने तुम्हाला शांत झोप लागते. तर दुसरीकडे साखरेचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला निद्रानाशास सामोरे जावे लागते.

४. साखर जास्त खाल्याने जळजळ आणि श्वासोच्छवास करण्यास त्रास होणे, अशा समस्यांना सामोरे जावे लागते.

५. साखर कमी करून तुम्ही तुमचे अतिरिक्त वजन कमी करू शकता. डोनेट, पेस्ट्री आणि तत्सम साखरयुक्त गोड पदार्थ खाणे बंद केले पाहिजे.

६. साखर कमी केल्याने तुम्ही तुमची स्मरणशक्ती सुधारू शकाल.साखरेचे अधिक सेवन केल्याने तुमच्या बुद्धीयंत्रणेवर परिणाम होतो आणि स्मरणशक्ती कमजोर होते. त्यामुळे साखरेचे सेवन कमी केल्याने तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

७ .साखर कमी केल्याने तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका राहणार नाही. मधुमेह हा आजार तुमच्या यकृतामध्ये वाढणाऱ्या चरबीमुळे होण्याची संभावना असते.साखरेमुळे आपले स्वादुपिंड योग्यरीत्या काम करत नाही. त्यामुळे साखर कमी करणे हा मधुमेहावरचा रामबाण उपाय आहे.

८. साखर बंद केल्यानंतर पोट आणि आतडे चांगल्याप्रकारे अन्न पचवण्यास मदत करते.

९. साखर खाणे बंद केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. साखर पांढऱ्या पेशींना घातक जीवाणू नष्ट करण्यापासून रोखते.

१०. साखर कमी केल्यानंतर तुमच्या सांधेदुखी व तत्सम वेदना (Joint Pains) कमी होण्यास मदत होईल.

११. शरीरातील शर्करेचे प्रमाण कमी झाल्यास इन्सुलिनची मात्रा वाढून मधुमेहाचं प्रमाण कमी करू शकता.

*काय तर मग? घ्याच आता साखर कमी करण्याचा कटू निर्णय!*

*अधिक माहितीसाठी जॉईन करा*

https://chat.whatsapp.com/Ho3lXqZWBrH9hGdABTmPOz

 *प्रारब्धवशात जे आहे तेच होते...*

१) लग्न (२) पैसा (३) मरण (४) अन्न (५) जन्म...हे ज्याचे जिथे असतील तिथे ओढून घेऊन जातात...

१)रावणाने मुलगी झाल्यानंतर ब्रम्हदेवांना विचारले, "या मुलीचे लग्न कोणाबरोबर होणार आहे ?" ब्रम्हदेवांनी कुंडली पाहून सांगितले, "समोर लहान झाडूवाला मुलगा दिसतो आहे, त्याच्याबरोबर होणार आहे." रावणास राग आला. माझी मुलगी या झाडूवाल्याला द्यायची ? शक्यच नाही. नोकरांना सांगितले, "याला समुद्रात फेकून द्या." नोकरांनी त्याचा अंगठा कापला व त्यास समुद्रात टाकला. तो मुलगा वाहत-वाहत एका बेटावर पोहोचला. तिथला राजा वारला होता. लोक हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यामागे फिरत होते. हा मुलगा दिसल्याबरोबर हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली. लोकांनी त्यास त्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारले. मुलगा वयात आला. रावणाची कन्या उपवर झाली, बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून दिला. रावणाने पाहुणचाराकरिता एकदा जावयास बोलाविले रावण म्हणाला, "ब्रम्हदेवपण हल्ली खोटे बोलतो." त्याने सांगितले होते, "माझ्या मुलीचे लग्न झाडूवाल्याच्या मुलाबरोबर होणार म्हणून पण आपण तर राजकुमार आहात." जावई म्हणाला, माफ करा मामा, मी तोच मुलगा आहे." पायाचा अंगठा दाखविला. मग रावणास खात्री पटली. या ब्रम्हदेवाच्या गाठी असतात.

*२)पैसा -* ज्याला ज्या ठिकाणी मिळायचा त्या ठिकाणीच मिळतो.

*३)मरण*-ज्याचे मरण जिथे असते तिथेच येते...*

*कथा -* एकदा गरुडाची आई आजारी पडली. सर्व येऊन भेटत होते. गरुड रोज संध्याकाळी आईस विचारी, आज कोण कोण आले होते ? आई सर्वांची नावे सांगत होती. एकदा यमराज आले व भेटून गेले. पण जाताना हसले. संध्याकाळी गरुडाने आईस विचारले, आज कोण आले होते ? आई म्हणाली, *आज यमराज आले होते व जाताना हसले."* गरुडास शंका आली, का हसले असावे ? त्याने आईस उचलले व जंगलातील झाडाच्या खोडात ठेवले. *यमराज दुसऱ्या दिवस तिथेही आले. यमराजांना गरुडाने विचारले, "आपण काल माझ्या आईस पाहण्यास आला होता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. पण जाताना आपण हसला का? "यमराज म्हणाले,"आपल्या आईचा मृत्यू या झाडाच्या खोडात असताना अद्याप घरात कशी म्हणून हसलो." त्यावेळी गरुडाची आई झाडाच्या खोडात वारली होती... 

*तात्पर्य-काहींचा मृत्यू एसटीत, काहींचा रेल्वेत, काहींचा विमानात, काहींचा पाण्यात, काहींचा रस्त्यावर हे सर्व काळाच्या हातात आहे... पण काळाचा सूत्रधार मात्र परमात्मा आहे..*🌹🔱🙏

 पात्र, गरजू लाभार्थ्यांची निवड करा; आर्थिक शिस्त पाळा

                                              - उपमुख्यमंत्री अजित पवार

· सर्वच महामंडळाच्या मंजूर निधीचे तातडीने वितरण करण्याचे निर्देश.

· अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा आढावा.

            मुंबई, दि. 10 : अण्णासाहेब पाटील आर्थिक‍ मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना, काटेकोरपणे आर्थिक शिस्त पाळा. महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविताना समाजातल्या पात्र, गरजू लाभार्थ्यांची निवड करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. त्याचबरोबर सर्व महामंडळांसाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीचे तातडीने वितरण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

            अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कामाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती कक्षात घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नामदेव भोसले, नियोजन विभागाचे उपसचिव श्री. देसाई, नियोजन विभागाचे अवर सचिव श्री. बोरकर, वित्त विभागाचे सहसचिव श्री. दहीफळे उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यातील सर्व समाजघटकांच्या शैक्षणिक, आर्थिक उन्नतीसह समतोल सामाजिक प्रगती साधण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने वेगवेगळ्या प्रवर्गासाठी विविध विकास महामंडळाच्या माध्यमातून योजना राबविण्यात येतात. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना शेतीपूरक व्यवसाय, विपणन, प्रक्रियाउद्योग, पुरवठा आणि साठवणूकीबरोबरच लघू उद्योग, वाहतुक, अन्य व्यवसायिक उद्योगासाठी आर्थिक मदत करताना राज्यातील सर्व भागातील जास्ती-जास्त तरुणांना या योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करावा, असेही श्री.पवार यांनी सांगितले.

            अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाबरोबरच महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, श्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळासह इतर सर्व महामंडळासाठी तरतुद केलेल्या निधीचे तातडीने वितरण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

*****

वृत्त क्र. 74

मालेगाव एमआयडीसीमध्ये उद्योग प्रकल्प

जलदगतीने सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार

                                                - उद्योग मंत्री सुभाष देसाई

         · मालेगाव जलदगतीने पूर्ण करण्यात आलेली विशेष एमआयडीसी

         · कृषीमंत्री यांनी सोडविल्या मालेगाव एमआयडीसीअंतर्गत उद्योजकांच्या समस्या

            मुंबई, दि. 10 : मालेगाव येथील एमआयडीसी जलदगतीने उभारण्यात आलेली विशेष एमआयडीसी असून, याअंतर्गत असलेली प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. येथील उद्योग प्रकल्प तातडीने सुरू करण्याबाबत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. उद्योग नियमावलीप्रमाणे वस्त्रोद्योग पार्क व अजंग प्रकल्पांसाठी भूखंड वाटपाच्या दरास मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत सांगितले.

            मंत्रालयात नाशिक, मालेगाव येथील अजंग-रावळगाव औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक 3 येथील प्रलंबित कामाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पी. अन्बलगन, सहसचिव संजय देगांवकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय काटकर, अवर सचिव किरण जाधव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

            एमआयडीसीअंतर्गत असलेल्या समस्या कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी मांडल्या. त्यांनी मालेगाव येथील उद्योजकांसाठी केलेल्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

            उद्योग मंत्री श्री.देसाई म्हणाले, मालेगाव एमआयडीसी अंतर्गत अजंग गाव ते औद्योगिक वसाहत पोहोच रस्त्यांच्या कामासंदर्भातील कार्यवाही एका महिन्यात पूर्ण करावी. तसेच अभिन्यांसातील अंतर्गत रस्ते तयार करण्यात यावेत. वस्त्रोद्योग पार्क व अजंग टप्पा क्रमांक ३ भुखंड वाटपाच्या रू ६०० प्रति चौमी या दरास मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. यानंतर ७९० प्रमाणे दर करण्यात यावेत. जे प्रकल्प काम सुरू करत आहेत त्यांना तात्पुरत्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पाणीपुरवठा योजना क्रमांक दोनसाठी तांत्रिक मंजुरी तसेच निविदा प्रक्रियेची प्रक्रिया करण्यात यावी. वीजेसंदर्भातही सध्या तात्पुरत्या स्वरूपात वीज व्यवस्था करून ऊर्जा विभागासोबत पाठपुरावा करून वीजेसाठी सबस्टेशन कार्यान्वीत करावेत. प्लास्टिक, वस्त्रोद्योग, फुड व इतर उद्योगांसाठी सुधारित अभिन्यास मान्यता देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश उद्योग मंत्री देसाई यांनी दिले.

०००


 संस्कृत भारतीच्या सुभाषित पाठांतर स्पर्धेचे पारितोषिक वितरण.

§ सुभाषित अभियान अंतर्गत उपक्रम

            पनवेल दि ११ः संस्कृत भारती कोकण प्रांताच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सुभाषित अभियान अंतर्गत सुभाषित पाठांतर स्पर्धेचे पारितोषिक वितरण नुकतेच झाले. कृष्णभारती हॉल येथे या स्पर्धा व पारितोषिक वितरण कार्यक्रम झाला.

            संस्कृत भारती कोंकण प्रांताच्या वतीने सुभाषित अभियान घेण्यात आले. 5 सप्टेंबर 2021 पासून 13 डिसेंबर 2021 पर्यंत रोज एक याप्रमाणे 100 सुभाषिते व्हाॅटसॅप ग्रुपव्दारे पाठवण्यात आली. इयत्ता 5 वी ते 10 वीचे विद्यार्थी या अभियान अंतर्गत पाठांतर स्पर्धेत सहभागी झाले होते.

           हे अभियान संपूर्ण कोकण प्रांतात सुरु आहे. अभियान स्पर्धेचा एक महत्त्वाचा टप्पा जिल्हास्तरीय स्पर्धा होत्या. स्पर्धा 5 वी ते 10 वी असे सहा गट व 100 सुभाषिते पाठ असणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष गट अशा एकूण सात गटात झाली. या स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग, कर्जत, खोपोली, गोरेगाव येथून विद्यार्थी आले होते.

            स्पर्धेसाठी पनवेल येथील श्री.चारुदत्त जोशी आणि श्रीमती सुनंदा लखपती, यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. श्रीमती सुनंदा लखपती मार्गदर्शन करताना म्हणाल्या, स्पर्धा संपली म्हणून सुभाषितांचा अभ्यास थांबवू नका. सुभाषितांमधील मार्गदर्शन आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उपयोगी ठरते त्यामुळे अधिकाधिक सुभाषिते पाठ करा आणि सतत सुभाषितांच्या सहवासात रहा.

            स्पर्धेत एकूण 34 विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रत्येक गटातून तीन क्रमांक काढण्यात आले. आणि 100 सुभाषिते पाठ असणा-या विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिक देण्यात आले.

गट क्र. १

१. प्रथमः क्रमांक :- ईशा महावीर जाधव

२. द्वितीयः क्रमांक:- आशिष जयन नायर 

३. तृतीयः क्रमांक: - साईज्ञा सतीश खिलारी                  

गट क्र. २

१. प्रथमः क्रमांक: - अक्षरा साहू

२. द्वितीयः क्रमांक: - किमया शशिकांत गायकवाड

३. तृतीयः क्रमांक:- हिमांशु पराग घरत

गट क्र. ३

तृतीयः क्रमांक: - निवेदिता गणेश मुसळे

गट क्र. ४

१.प्रथमः क्रमांक: - पूर्वा अमित पाटील 

२. द्वितीयः क्रमांक: - वेदश्रुति विद्येश मराठे

३. तृतीयः क्रमांकः नेहल सचिन गांधी

गट क्र. ५

१. प्रथमः क्रमांक: - श्रुती चंद्रकांत पाटील 

२. द्वितीयः क्रमांक- भक्ती संजय कांबळे

३. तृतीयः क्रमांक - तन्वी ब्रह्मदेव मिसाळ

गट क्र. ६

१. प्रथमः क्रमांक: - सोनल रवींद्र पतंगे

२.द्वितीयः क्रमांक :- ज्ञानेश्वरी बापू कामठे

३. तृतीयः क्रमांक :- आयुष जयंत ठाकुर

विशेष गट १०० सुभाषित

१. अ+श्रेणी - भक्ती संजय कांबळे

२. अ श्रेणी - आशिष जयन नायर

३. ब श्रेणी - क्रितिका तिवारी

४. ब श्रेणी - तन्वी बह्मदेव मिसाळ

            या सुभाषित अभियानाचे आणि स्पर्धेचे संपूर्ण नियोजन आणि पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाचे सत्र संचालन संस्कृत भारती जिल्हा संयोजक श्री. विक्रांत जोशी यांनी केले.

            कार्यक्रमाची सुरुवात सौ. प्रतिमा जोगळेकर यांच्या ध्येयमंत्राने झाली. परीक्षकांचा परिचय सौ. तृप्ती गोरे यांनी करुन दिला तर प्रास्ताविक सौ. अनया करंदीकर यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. स्नेहला पाडळकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शान्तिमंत्राने झाली.

0000


 



Featured post

Lakshvedhi