*आप प्रसन्न हैं,*
*यह स्थिति उत्तम है,*
*परन्तु*
*यदि कोई आपके कारण प्रसन्न है,*
*तो यह परिस्थिति सर्वोत्तम है*
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
शासकीय वसतीगृहाच्या सन २०२१-२२ साठीचे प्रवेशाचे वेळापत्रक
मुंबई, दि. 30 : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या वतीने सन 2021-22 साठी वसतीगृह प्रवेश मिळविण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ते पुढीलप्रमाणे :- शालेय विद्यार्थी ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी दि. 4 ऑक्टोबर 2021 ते 20 डिसेंबर 2021, पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिद्ध करणे दि.24 डिसेंबर 2021 व पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 30 डिसेंबर 2021. रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे 5 जानेवारी 2022. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश 13 जानेवारी 2022, पहिल्या व दुसऱ्या निवड यादी खेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे दि.20 जानेवारी 2022.
इयत्ता १० वी व ११ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी (व्यावसायीक अभ्यासक्रम वगळून) ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 4 ऑक्टोबर 2021 ते 20 डिसेंबर 2021.
पहिली निवड यादी अंतिम करणे दि.24 डिसेंबर 2021 व पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 30 डिसेंबर 2021. रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे 5 जानेवारी 2022. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश 13 जानेवारी 2022, पहिल्या व दुसऱ्या निवड यादी खेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे दि.20 जानेवारी 2022.
बी. ए./बी. कॉम / बी. एस. सी अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका / पदवी आणि एम. ए./ एम. कॉम. / एम. एस. सी असे पदवीनंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदविका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी दि .4 ऑक्टोबर 2021 ते 20 डिसेंबर 2021.
पहिली निवड यादी अंतिम करणे दि.24 डिसेंबर 2021 व पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 30 डिसेंबर 2021. रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे 5 जानेवारी 2022. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश 13 जानेवारी 2022, पहिल्या व दुसऱ्या निवड यादी खेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे दि.20 जानेवारी 2022.
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी दि.4 ऑक्टोबर 2021 ते 31 डिसेंबर 2021.
पहिली निवड यादी अंतिम करणे दि.6 जानेवारी 2022 व पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 12 जानेवारी 2022. रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे 20 जानेवारी 2022. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश 25 जानेवारी 2022, पहिल्या व दुसऱ्या निवड यादी खेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे दि.1 फेब्रुवारी 2022.
पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज वसतीगृहातील प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्यास दिलेल्या रकान्यामधील दिनांकापर्यंत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास तात्काळ त्याच दिवशी वसतीगृहात प्रवेश द्यावा (स्पॉट अॅडमिशन) असे पुण्याचे समाजकल्याण आयुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
महिला शिक्षणातील अग्रणी.. सावित्रीबाई
मुंबई दि.02: महिलांच्या उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा जोतिराव फुले यांनी हाती घेतलेला समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या, सर्वसामान्य मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या अग्रणी सावित्रीबाई फुले यांची ३ जानेवारी ही जयंती. यानिमित्त त्यांच्या महिला शिक्षणक्षेत्रातील कार्याची ही थोडक्यात आठवण..
स्वातंत्र्यपूर्व शंभर वर्षापूर्वीचा काळ हा सामाजिक रूढी परंपरांचा काळ होता. महिलांचे शिक्षण हे त्या काळी वर्ज्य होते. त्या काळात सर्वांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत विशेषत: महिलांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कठीण कार्य जोतिराव व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाईंनी स्वत: शिक्षण घेऊन महिलांसाठी शिक्षिकेचे काम केले. त्यांच्या या अनन्यसाधारण कार्यामुळेच त्यांना महिला शिक्षणाचे प्रवर्तक मानले जाते.
सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्रीबाईंचा विवाह १८४० मध्ये जोतिरावांसोबत झाला. सावित्रीबाईचे शिक्षण जोतिरावांनीच पुरे केले. जोतिबा फुले यांच्या मदतीने त्यांना सतत पुढे जाण्याकरीता प्रेरणा मिळत होती, ते त्यांचे फक्त पती नव्हते तर एक चांगले गुरू व संरक्षक देखील होते. सावित्रीबाईंच्या कार्याचे ते सतत कौतुक करून त्यांचा उत्साह वाढवित असत. सावित्रीबाई यांनी शिक्षिकेचे व्रत अंगीकारून पतीच्या कार्यात पूर्ण सहकार्य दिले. त्यांच्या या योगदानामुळे महिला-शिक्षणाची महाराष्ट्रातील अग्रणी म्हणून सावित्रीबाईंचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर या शिक्षणाचा उपयोग समाजातील महिलांना शिक्षीत करण्याकरता करावा असा विचार सावित्रीबाईंनी केला पण हा विचार एखाद्या आव्हानापेक्षा कमी नव्हता, कारण त्या काळात महिलांना शिक्षणाची परवानगी नव्हती. यासाठी सावित्रीबाईंनी खूप संघर्ष केला आणि या रूढीला तोडण्यासाठी पती जोतिबांच्या साहाय्याने 1 जानेवारी 1848 पासून शिक्षणाचे माहेर घर असे ज्याला आज आपण म्हणतो त्या पुण्याच्या भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली. पती जोतिबा फुले यांच्या मदतीने कुणाचेही आर्थिक साहाय्य न घेता सुरूवात करून दोघांनी पुढे अनेक शाळा सुरू केल्या. महिलांच्या शिक्षणाच्या ध्येयाने प्रेरीत सावित्रीबाई सतत या क्षेत्रात काम करीत राहिल्या.
सर्वसामान्य मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे बहुजन समाजाचे हे जोडपे आणि त्यांचे त्याकाळातील कार्य संस्मरणीय आहे. म. फुले यांनी मुलींसाठी काढलेल्या शाळेत लहुजी साळवे यांनी स्वत:च्या मुक्ता या पुतणीस पाठविले आणि राणबाच्या मदतीने अनेक मुलींना त्यांच्या शाळेत दाखल केले. पुढे शाळेत मुलींची संख्या वाढत गेली. अस्पृश्य समाजातील मुलींची संख्या यात लक्षणीय होती. या दरम्यान त्यांच्या समस्या वाढत गेल्या सावित्रीबाई शिकविण्याकरता ज्यावेळेस घरून निघत असत त्या दरम्यान शाळा ते विद्यालय हे अंतर पार करतांना त्यांना अनेक कटु अनुभवांना सामोरे जावे लागत असे. असे तरी देखील त्या त्यांच्या निश्चयापासून डगमगल्या नाहीत, ध्येयापासून परावृत्त झाल्या नाहीत. आत्मविश्वासाने आलेल्या प्रत्येक प्रसंगाचा त्यांनी सामना केला आणि महिला शिक्षणाची जाज्वल्य ज्योत आपल्या मनात तेवत ठेवली. अस्पृश्याचे हाल पाहून जोतिबांचे काळीज पिळवटून निघत असे. जोतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतिला प्रज्वलीत करण्याचे कार्य सावित्रीनेच केले व ती खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाली.
सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षिकाच नव्हे तर त्या एक उत्तम कवयित्री, अध्यापिका, समाजसेविका देखील आहेत. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांना शिक्षीत करण्याकरता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याकरता खर्ची घातले.
पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतीपत्नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला. त्यानंतरही सावित्रीबाई फुले यांनी आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले.
शिक्षणाची महती गाताना सावित्रीबाई म्हणतात... ‘विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून, तिचा साठा ज्यापाशी, तो ज्ञानी मानिती जन..’सावित्रीबाईंनी महिलांसाठी शिकविणे सुरू केले, यात त्यांच्या जोडीने महिला शिक्षणाची ज्योत पुढे नेण्याचे काम केले ते फातिमा शेख यांनी. त्या खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंच्या सहकारी, सखी आणि सहशिक्षिका मानल्या जातात. सावित्रीबाईंच्या अनुपस्थितीत त्यांनी सुरू केलेल्या शाळेची धुरा त्या समर्थपणे सांभाळत. काही ठिकाणी वाचनात येते की, महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले. त्यावेळेस उस्मान शेख यांनी त्यांना आपल्याकडे जागा दिली. फातिमा त्या उस्मान शेख यांची बहीण होत्या. १९२४-३० या काळात पुण्यातून मजूर हे मासिक प्रकाशित होत होते, त्या मासिकात सावित्रीबाईंसह फातिमा शेख यांचा फोटो छापला होता असा उल्लेख डॉ.मा.गो.माळी यांनी आपल्या सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय या पुस्तकाच्या प्रस्तावनेत केला आहे. असाच फोटो लोखंडे नावाच्या ख्रिस्ती मिशनऱ्याने काढलेल्या पुस्तकातही प्रसिद्ध केला होता, हे दोन्ही फोटो सारखेच असल्याने सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांची ओळख पटते, असाही उल्लेख काही ठिकाणी आढळतो. सावित्रीबाईंनी जोतिबांना लिहिलेल्या एका पत्रात, ‘माझी तब्येत ठीक होताच मी परत येईन, फातिमाला सध्या त्रास होईल, पण ती कुरकूर करणार नाही, असा फातिमा शेख यांचा उल्लेख सापडतो. सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून त्या वंचिताच्या हक्कासाठी अखेरपर्यंत लढल्या.
एकविसाव्या शतकात स्वतंत्र भारतातील महिला शिक्षण क्रांतीच्या मोठ्या टप्प्यावर उभे आहे. प्रामुख्याने शहरी विभागापुरते मर्यादित असलेले हे शिक्षण आता ग्रामीण, दुर्गम, आदिवासी भागापर्यंत विस्तारले आहे. एक महिला शिकली की, ती सारे कुटुंब साक्षर करते, संस्कारक्षम करते, या महात्मा फुलेंच्या वचनाला स्मरून महिला-शिक्षणाला भारतवर्षाने प्राधान्यक्रम दिला आहे. महिलेला शिक्षणाच्या सर्वच क्षेत्रांत आता समान संधी आहे. ज्या देशात महिलांचे कर्तृत्व जगाला गवसणी घालते, त्या देशात महिलांचा आणि महिला शिक्षणाचाही खऱ्या अर्थाने सन्मान होतो. याची सुरूवात सावित्रीबाईंनी केली, याचे श्रेय निश्चितच त्यांना जाते.
महाराष्ट्र राज्य हे स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रातील प्रागतिक राज्य असून सावित्रीबाई फुले दत्तक योजनेची अभिनव कल्पना महाराष्ट्रात राबविली गेली. बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत शिक्षण देण्याचा पायंडा महाराष्ट्रात प्रथम पाडला गेला. असंख्य अडचणींवर मात करून महिला शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस ‘महिला शिक्षणदिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या ३ जानेवारी या जन्मदिवसापासून ते शिवरायांना शूर, पराक्रमी, धाडसी योद्धा म्हणून घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या १२ जानेवारी या जन्मदिनापर्यंत शाळांमधून ‘जिजाऊ ते सावित्री- सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहेत.
महिला शिक्षणाच्या प्रणेत्या, महिला उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा जोतिराव फुले यांनी हाती घेतलेला समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या क्रांतिज्योति सावित्रीबाईंना त्यांच्या जयंती दिनानिमित्त वनम्र अभिवादन!
००००
केंद्र शासनाच्या स्टैंड अप इंडिया योजनेत अनुसुचित जाती व नवबौद्ध समाजाच्या
घटकांकरीता मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याबाबत आवाहन
मुंबई, दि. 30 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. मासाका/२०१८/प्रक्र. २५९ (२)/अजाक, दिनांक 08 मार्च, २०१९ अन्वये केंद्र शासनाच्या स्टैंड अप इंडिया या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या अनुसुचित जातीच्या सवलती घेण्यास पात्र असलेला अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील नव उद्योजक लाभार्थ्यांची मार्जिन मनी भरण्याची क्षम नसल्यामुळे या उद्योजक लाभार्थ्यांना एकुण प्रकल्प किमतीच्या लाभार्थी यांच्या हिश्श्यामधील २५ % मधील जास्तीत जास्त १५ % मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
योजने बाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य, शासन निर्णय क्र. मासाका /२०१८/प्रक्र. २५९(२)/अजाक, दिनांक ०८ मार्च, २०१९ मध्ये प्रस्ताव सादर करण्याबाबत सर्व माहिती देण्यात आलेली आहे. तरी इच्छुक नव उद्योजकांना सुंदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शासन निर्णयामध्ये नमुद माहितीनुसार सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, चेंबुर, ४०००७१ यांचे कार्यालयामध्ये योजनेच्या लाभाकरीता अर्ज सादर करावा.
अर्ज करण्यासाठी कार्यालयाचा पत्ता सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर. सी. मार्ग, चेंबुर (पूर्व), मुंबई ४०० ०७१ दुरध्वनी ०२२ २५२२२०२३, ईमेल आयडी acswomumbaisub@gmail.com या पत्यावर अर्ज करावा. असे सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांनी कळविले आहे.
००००
नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस
“आचार्य पार्वतीकुमार" राज्य सांस्कृतिक पुरस्कार
मुंबई, दि. 30 : राज्यात एकूण 12 विविध सांस्कृतिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित करण्यात येते.यापैकी "नृत्य" या कलाक्षेत्रातील पुरस्कार यावर्षापासून “आचार्य पार्वतीकुमार" यांचे नावाने देण्यात येईल. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे .
००००
मुंबई शहर जिल्ह्यातील अनुसूचित जाती, प्रवर्गातील विद्यार्थ्यांना
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. 30 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना (GOIPMS-SC) साठी सन २०२१-२२ या चालू शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता महाडिबीटी पोर्टल http://mahadbt.gov.in या संकेतस्थळावर दि १४ डिसेंबर २०२१ पासून प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याकरिता शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या नूतनीकरण (Renewal) ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ०४ जानेवारी २०२२ आहे तर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या नवीन अर्ज (Fresh) ऑनलाईन सादर करण्याची अंतिम मुदत दि. ०९ जानेवारी, २०२२ आहे. तरी मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी, सर्व प्राचार्य, कर्मचारी यांना शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक भरावे असे, आवाहन मुंबई शहरचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यांनी केले आहे.
00000
कोविड, ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्याकरिता आणखी कडक निर्बंध
सामाजिक- धार्मिक कार्यक्रमांसाठी 50 लोकांनाच परवानगी
मुंबई, दि. 31 :- राज्यात कोविड आणि ओमायक्रॉनचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा 50 केली असून अंतिम संस्कारासाठी केवळ 20 लोकांना मुभा देण्यात आली आहे.
राज्य शासनाच्यावतीने जारी परिपत्रकात सदर माहिती देण्यात आली असून बंदिस्त ठिकाणी किंवा खुल्या दालनात संपन्न होणाऱ्या लग्न समारंभांसाठी उपस्थितांची मर्यादा 100 वरून 50 करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दालनात किंवा खुल्या जागेत होणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमांसाठी ही मर्यादा 50 करण्यात आली आहे. हे निर्बंध 31 डिसेंबर 2021 च्या रात्री 12:00 वाजेपासून अंमलात येणार आहे.
परिपत्रकात असे ही नमूद करण्यात आले आहे की, अंतिम संस्कारासाठी उपस्थितांची मर्यादा आता अधिकतम 20 असेल. त्याच प्रमाणे राज्यातील पर्यटक स्थळे, समुद्रकिनारपट्टी, क्रीडांगणे या सारख्या जास्त लोकांना आकृष्ट करणाऱ्या ठिकाणी सक्षम प्राधिकरणास, 24 डिसेंबरच्या आदेशानुसार लागू केलेल्या सर्व निर्बंधांव्यतिरिक्त आवश्यक वाटल्यास (जमावबंदी) 144 सी आर पी सी लागू करता येईल. या शिवाय आदींच्या आदेशाप्रमाणे लागू सर्व निर्बंध पुढील आदेशापर्यंत अंमलात राहतील.
००००
केंद्राकडून राज्यांना मिळणारी जीएसटीची नुकसानभरपाई
14 टक्के वाढीसह 30 जून नंतरही कायम ठेवण्यात यावी
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात मागणी
मुंबई, दि. 31 :- वस्त्रोद्योगाशी संबंधीत उत्पादनांवर उद्यापासून (1 जानेवारी 2022) लागू होणारी 5 टक्क्यांवरुन 12 टक्क्यांची जीएसटी वाढ रद्द करण्यात यावी तसेच केंद्राकडून राज्यांना मिळणारी जीएसटी नुकसानभरपाई 14 टक्के वार्षिक वाढीसह 30 जून 2022 नंतरही कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
वस्तू व सेवाकर (जीएसटी) परिषदेची 46 वी बैठक आज (31 डिसेंबर रोजी) केंद्रीय अर्थमंत्री तथा जीएसटी परिषदेच्या अध्यक्षा निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र लिहून महाराष्ट्राची भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार म्हणतात की, “महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्ये कोरोनामुळे आर्थिक आव्हानांचा सामना करीत आहेत. कोरोनामुळे उद्योग, व्यापार, अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. राज्यांसमोर आर्थिक संकट उभं राहिलं आहे. नागरिकांसमोरच्या आर्थिक अडचणीही वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत धागे, कापड, कपडे आदी वस्त्रोद्योगाशी संबंधीत उत्पादनांवरील जीएसटीमध्ये 5 टक्यांवरुन 12 टक्के होणारी वाढ अन्यायकारक, अव्यवहार्य आहे. यामुळे महागाई वाढून त्याचा फटका नागरिकांना बसेल, राज्यांच्या अर्थव्यवस्थेवरही दुष्परिणाम होईल. त्यामुळे वस्त्रोद्योगाशी संबंधीत उत्पादनांवर उद्योपासून होत असलेली जीएसटी वाढ तात्काळ रद्द करण्यात यावी”.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) 18 नोव्हेंबररोजी अधिसूचना काढून तयार कपडे, चपलांसह काही वस्तूंवर जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेतला. विणलेले सूत, सिंथेटिक धागे, ढीग कापड, ब्लँकेट, तंबू, टेबल क्लॉथ, टॉवेल, रुमाल, टेबलवेअर, कार्पेट्स, रग्ज, ज्या कापडांवर चित्रे (टेपेस्ट्री) बनवली जातात, त्यांचा जीएसटी दर 5 टक्क्यांवरून 12 टक्के वाढवला आहे. ही दरवाढ उद्यापासून होणार असल्याने यामुळे महागाई वाढेल, व्यापारी उलाढाल,अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम होईल. त्यामुळे वस्त्रोद्योग उत्पादनांवर उद्यापासून लागू होणारी जीएसटी दरवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी, असे उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून देशातील राज्ये कोरोना संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाचा दुष्परिणाम व्यापार, उद्योगांवर झाल्याने राज्यांचा महसूल घटला आहे. अशा परिस्थितीत जीएसटी महसुलातील तुटीबद्दल केंद्राकडून देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईची मुदत 30 जून 2022 नंतर न वाढवल्यास राज्यांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहणार आहे. त्यामुळे जीएसटी नुकसान भरपाई देण्याची मुदत 14 टक्के वार्षिक वाढीसह 30 जून 2022 नंतरही पुढे वाढवण्यात यावी, असेही उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
००००००
मुंबई में 500 वर्ग फुट तक के घरों के लिए प्रॉपर्टी टैक्स रद्द
-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का ऐलान
प्रशासन को इस फैसले पर तत्काल अमल करने का निर्देश
मुंबई, दिनांक जनवरी 01: नए साल के पहले ही दिन हम मुंबईवासियों को खुशखबरी दे रहे हैं। मुंबई में 500 वर्ग फुट तक के घरों पर प्रॉपर्टी टैक्स (संपत्ति कर) माफ करने के फैसले के साथ, हमने मेहनती मुंबईकरों को कर्ज से बाहर निकलने की कोशिश की है। यह कहना है मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने का। नगर विकास विभाग द्वारा आयोजित वीडियो कॉन्फ्रेंसिंग बैठक में मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोल रहे थे। मुंबई में 16 लाख से ज्यादा घर 500 वर्ग फुट क्षेत्रफल से कम के हैं और इनमें रहने वाले लाखों परिवारों को इस फैसले से फायदा होगा।
राज्य में सभी लोगों को नव वर्ष की शुभकामनाएं देते हुए मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कहा कि सुविधाओं को मुहैया कराते हुए हमें मुंबईवासियों को आराम भी देना हैं। मुंबईकर सिर्फ टैक्स पेयर्स (करदाता) नहीं हैं। दोनों हाथों से सभी को पैसा देनेवाला यह मुंबईकर राज्य के विकास कार्यों में अमूल्य योगदान देता है। हमें यह नहीं भूलना चाहिए कि मेहनतकशों के पसीने से मुंबई को बनाया गया है। 500 वर्ग फुट तक के मकानों पर प्रॉपर्टी टैक्स माफ करने के अहम वादे को पूरा कर रहे हैं। श्री ठाकरे ने कहा कि मुंबईकरों की ओर से मैं उन सभी लोगों का भी धन्यवाद देता हूँ जिन्होंने इस फैसले को लेने में सहयोग किया। मुंबई शहर के पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे रात-दिन पालिका के अधिकारी, नगरसेवकों के साथ जाकर मुम्बई में विकास कामों की समीक्षा करते हैं, ऐसा भी श्री. ठाकरे ने कहा।
सबसे बड़ा तोहफा - नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे
मुंबईकरों के लिए 500 वर्ग फुट तक की प्रॉपर्टी टैक्स से माफ करने से आम आदमी को राहत मिलेगी और 16 लाख परिवारों को फायदा होगा। नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि यह मुंबईवासियों के लिए एक महत्वाकांक्षी और क्रांतिकारी निर्णय है साथ ही नए साल का यह एक बड़ा तोहफा है।
मुंबई उपनगर के पालक मंत्री आदित्य ठाकरे ने भी दिया धन्यवाद
मुंबई उपनगर के पालक मंत्री आदित्य ठाकरे ने कहा कि वह इस बेहद महत्वपूर्ण निर्णय के लिए मुख्यमंत्री और नगर विकास मंत्री के साथ-साथ मुम्बई मनपा आयुक्त और नगर विकास विभाग के अधिकारी को धन्यवाद दिया हैं। यह निश्चित रूप से एक क्रांतिकारी फैसला है और इससे लाखों मुंबईवासियों को लाभ होगा। मुंबई के पालक मंत्री असलम शेख ने भी इस फैसले के लिए मुख्यमंत्री को धन्यवाद दिया है।