Thursday, 18 November 2021

 मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाकडून

उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

 

            मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरवण्यात येते. सन २०२१ च्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराकरिता राज्यातील पत्रकारांनी आपली नामांकने येत्या २० डिसेंबर २०२१ पूर्वी पाठवावीतअसे आवाहन मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने करण्यात येत आहे.

            पुरस्कारामध्ये जीवनगौरव पुरस्कार ( राज्यस्तरीय )राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार -  वृत्तपत्र प्रतिनिधी (एक)इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधी (एक) आणि उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ( मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्याकरिता ( एक ) अशा एकूण चार पुरस्कारांचा समावेश आहे. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांनी आपल्या  नामांकनाच्या प्रवेशिका यापूर्वी मिळालेल्या पुरस्काराच्या व उल्लेखनीय कामाच्या तपशीलवार माहितीसह  ( वृत्तवाहिनींच्या पत्रकारानी वृत्तांकन केलेली सी. डी. किंवा पेनड्राईव सोबत पाठविणे आवश्यक) पाठवण्यात याव्यात. जीवनगौरव पुरस्कारासाठी अर्ज अपेक्षीत नसून शिफारशी व सूचना स्वीकारण्यात येतील.  येत्या २० डिसेंबर  २०२१ पूर्वी अध्यक्षमंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघतळमजलापत्रकार कक्षमंत्रालयमुंबई ४०००३२ किंवा ई मेलmahamantralaya@gmail.com या पत्त्यावर पाठवाव्यातअसे आवाहन अध्यक्ष मंदार पारकर आणि कार्यवाह प्रमोद डोईफोडे यांनी केले आहे. 

            कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार- पत्रकाराने किमान २५ वर्षे पूर्णवेळ पत्रकारिता केलेली असावी. वय ६० वर्षे पूर्ण असावे. (राज्यस्तरीय) पत्रकारिता क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य पाहून पुरस्कारासाठी निवड केली जाईल. तसेच राज्यातील पत्रकारपत्रकार संघटना व मान्यवर व्यक्ती यांच्या शिफारशीही विचारात घेण्यात येतील. यापूर्वी जेष्ठ पत्रकार श्री. वसंत देशपांडेश्री.  विनायक बेटावदकरश्री. विजय वैद्यकै. दिनू रणदिवे श्री.दिनकर रायकर आणि प्रकाश बाळ जोशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. राज्यस्तरीय  उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (दोन पुरस्कार) हा पुरस्कार  वृत्तपत्रीय प्रतिनिधी व  इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधी यांना देण्यात येणार आहे. पत्रकारितेत पूर्णवेळ सेवा बंधनकारक आहे. भाषेचे बंधन नाही. मागील दोन वर्षाच्या बातम्यांची कात्रणे किंवा चित्रफित/ ध्वनीफीत पाठवाव्यात. कात्रणे किंवा ध्वनीफीत यावर अर्जदाराचे नाव तसेच संपादक किंवा संस्थेने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडून प्रवेशिका सांक्षाकित केलेली असावी. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-(एक पुरस्कार) या पुरस्कारासाठी केवळ मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यांना भाग घेता येईल. एक वर्षांची (१ जानेवारी २०२१ ते अर्ज करण्याचा दिनांक पर्यंत) कात्रणे / ध्वनीफीत/ चित्रफितीसह प्रवेशिका  द्याव्यात. चारही पुरस्कार निवडताना पुरस्कार निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.

            (कृपया वरील वृत्तांस आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात आणि जिल्हा आवृत्तीमध्ये प्रसिध्दी द्यावी ही विनंती.)                  

    मंदार पारकर                                    प्रमोद डोईफोडे

      अध्यक्ष                                                 कार्यवाह

 


 लहान असतांना बाळासाहेबांनी प्रबोधनकारांना विचारलेले कि, तात्या श्रीमंती कशात आहे ?? तेव्हा प्रबोधनकार त्यांना हाथ धरून दारा पाशी घेऊन आले आणि घरा बाहेर च्या चपलांचा ढीग दाखवला आणि म्हणाले, हे बघ श्रीमंती याच्यात आहे. अजून कधी माणसाची श्रीमंती पाहायची असेल तर त्यांची अंतयात्रा बघ. त्याला जमा झालेली गर्दी आणि लोकांच्या डोळ्यांमधून वाहणारे अश्रू यावरून माणूस किती श्रीमंत आहे ते समझते. 


जे स्वतःपुरते जगतात ते पैशाने कदाचित श्रीमंत असतील, पण जे इतरांच्या हाकेला धावून जातात. माणसं कमावतात, ती लोक खरी श्रीमंत असतात. अन्यथा जगात रोज हजारो लोक जन्माला येतात आणि हज्जारो मरतात. पण हाताच्या बोटावर मोजण्या इतकी लोक स्मरणात राहतात, अमर होतात.


प्रबोधनकारांना तेव्हा काय माहित कि, त्यांचा पुत्र त्यांचे बोलणे इतके मनावर घेईल आणि जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनेल.🙏

Choravar mor


 


 


 

 लहान असतांना बाळासाहेबांनी प्रबोधनकारांना विचारलेले कि, तात्या श्रीमंती कशात आहे ?? तेव्हा प्रबोधनकार त्यांना हाथ धरून दारा पाशी घेऊन आले आणि घरा बाहेर च्या चपलांचा ढीग दाखवला आणि म्हणाले, हे बघ श्रीमंती याच्यात आहे. अजून कधी माणसाची श्रीमंती पाहायची असेल तर त्यांची अंतयात्रा बघ. त्याला जमा झालेली गर्दी आणि लोकांच्या डोळ्यांमधून वाहणारे अश्रू यावरून माणूस किती श्रीमंत आहे ते समझते. 


जे स्वतःपुरते जगतात ते पैशाने कदाचित श्रीमंत असतील, पण जे इतरांच्या हाकेला धावून जातात. माणसं कमावतात, ती लोक खरी श्रीमंत असतात. अन्यथा जगात रोज हजारो लोक जन्माला येतात आणि हज्जारो मरतात. पण हाताच्या बोटावर मोजण्या इतकी लोक स्मरणात राहतात, अमर होतात.


प्रबोधनकारांना तेव्हा काय माहित कि, त्यांचा पुत्र त्यांचे बोलणे इतके मनावर घेईल आणि जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनेल.🙏

 : *पारखून* घेतलं तर कोणीच

             *आपलं* नसतं...!!

                      आणि

     *समजून* घेतलं तर कोणीच

             *परकं* नसतं...!!

*काही मिळाले किंवा नाही मिळाले... तो नशिबाचा खेळ आहे... पण, प्रयत्‍न इतके करा की,परमेश्वराला देणे भागच पडेल...*              

ओंजळीमध्ये धरलेल्या फुलांचा सुगंध दोन्ही हातांना सारखाच लागतो. मोठे मन असलेले लोक डावे-उजवे असा भेदभाव न करता सर्वांवर सारखेच प्रेम देतात. 😊


🌞  *शुभदिनम्*  🚩 🙏

Featured post

Lakshvedhi