सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 6 November 2021
Friday, 5 November 2021
*कोहळा लावण्याची योग्य पध्दत*
-----------------------------------------
कोहळा आणताना देठ असलेला आणावा. आणल्यानंतर कोहळा धुवावा.
त्याच्या 2 समोरासमोरच्या बाजुला ऊँ व स्वस्तिक काढ़ायचे असते. स्वस्तिक कुंकवाने काढावे. व ऊँ अष्टगंधाने काढावे.
त्यानंतर खालपासुन वर पर्यंत काजळाने एक रेघ ओढ़ावी. त्यानंतर कोहळा देवाजवळ ठवुन त्याची पूजा करावी.( हळद, कुंकू, अक्षदा, दिवा ,अगरबत्ती ) त्यानंतर प्रार्थना करताना घरात असणाऱ्या ,
येणाऱ्या वाईट शक्ति व नजरदोष यापासुन सगळयांचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करावी. आणि घरात व घराबाहेर ते कोहळे शिंकाळयात टांगावे.
कोहळा टांगल्यानंतर कधी कधी आठ दिवसाच्या आत खराब होतो. कारण अशुभ ऊर्जा सामावण्याची त्याची क्षमता संपलेली असते अशा वेळी कोहळा सडतो त्यातून पाणी गळते. असे ज्या वेळी होते तेव्हा कोहळा काढून कचऱ्यात टाकून द्यावा.
पुन्हा नवीन कोहळा आणून लावावा. कदाचीत सुरवातिला लवकर लवकर खराब होतो ( जर अशुभ ऊर्जा जास्त साठली असेल तर....)
नंतर तो एक वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकतो.
तरी पण जर सोमवती किंवा शनिअमावस्या किंवा दिवाळी अमावस्या हया वेळी कोहळा खराब नाही झाला तरी बदलावा .
एरवी जर कोहळा खराब झाला तर त्या पुढील शनिवारी लावावा. व एरवी लावताना सुद्धा शनिवारीच लावायचा व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा.
कोहळा घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्यावर बाहेरुन आलेल्या लोकांची नजर जायला हवी व बाहेर लावताना बाहेरची व्यक्ति त्याच्या खालुन आली पाहिजे.
कोहळा टांगल्याने घरात नकारात्मक शक्ति रहात नाही. तसेच बाहेरून येणारी व्यक्ति जर आपल्याशी खूप चांगले बोलत असेल पण मनात आपल्या बद्दल जर ईर्षा बाळगून असेल तर ते मनातले भाव निगेटीविटि मधे बदलतात व त्याचा परिणाम घरात व्यक्तिवर होतो
चिडचिड वाढते,व्यवसायात अडचणी येतात. प्रगती होत नाही.
Stree mahashakti
नरकासुराला मारायला गेलेले श्रीकृष्ण आणि सत्यभामा यांचे हे रेखाचित्र.
नरकासुराने सोडलेले अस्त्र भेदून परत दुसरा वार सत्यभामा करते आहे. तिचा पवित्रा तर असा आहे बहुतेक पुढचा वार मर्मावरच असेल. ती दिसायला जितकी देखणी आहे तितकीच युद्धकुशल आहे.
आणि श्रीकृष्ण खाली बसलाय, गरूडावर. अस्त्र सोडतांना जो रिकाॅईल येईल (अधिक माहितीसाठी न्यूटनचा तिसरा नियम) त्यामुळे सत्यभामेचा तोल जाऊ नये म्हणून पायाने तिचा मागचा पाय अडवून ठेवलाय.
बायकोचे युद्ध कौशल्य पाहून त्याला कौतुक वाटते आहे.
त्याच्या हातात विश्वातले शक्तिशाली असे सुदर्शन आहे. ते सोडून सुद्धा त्याला युद्धाचा शेवट करता आला असता. पण बायको जेव्हा युद्ध करते आहे तेव्हा त्याने आडोसा धरलाय.
मध्यपूर्व आशिया तर सोडाच, पण पश्चिमी देशात सुद्धा हे असे दाखले नाहीत. हिन्दू धर्माव्यतिरिक्त कुठेही असा मुक्त विचार पहायला मिळणार नाही जो स्त्रीच्या कर्तृत्वाचा असा गौरव करेल.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...