Friday, 29 October 2021

 मनोधैर्य योजनेची आदर्श कार्यपद्धती तयार करण्याचे

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

 

            मुंबईदि. 28 : महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि अॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिलांना आर्थिक सहाय्य तसेच पुनर्वसनासाठी राबविल्या जाणाऱ्या मनोधैर्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आदर्श कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश  विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.

            मनोधैर्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीस महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव श्री. राजेंद्र भागवतमहिला व बाल विकासचे  आयुक्त श्री. राहुल मोरेविधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव श्री. एम. पी. धोटेगृह विभागाचे प्रधान सचिव श्री. संजय सक्सेना आदी उपस्थित होते.

               राज्यात या योजनेअंतर्गत सहाय्य मिळालेल्या पीडितांची संख्याआर्थिक सहाय्य प्राप्त होण्याचा कालावधी यासंदर्भातील माहिती सादर करण्याच्या सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. महिलांना मदत मिळण्यास विलंब होत असेल,तर याचा सखोल अभ्यास करून त्रुटी दूर कराव्यात. योजनेस गती देण्यासाठी आणि त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी दर महिन्याला मनोधैर्य योजनेबाबत आढावा बैठक घेण्यात यावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

                 मनोधैर्य योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी व जास्तीत जास्त पिडीतांना कमी कालावधीत अर्थसहाय्य मिळावे यासाठी तत्काळ कार्यवाही होणे गरजेचे आहे. पिडीत महिलांना योजनेचे सहाय्य मिळण्यासाठी कमीत कमी कायदेशीर कार्यवाहीस सामोरे जावे लागेल यासाठीही प्रयत्न होणे गरजेचे आहे. ट्रॉमा केअर पुनर्रचनेची गरज असून राखीव निधीतून या योजनेला निधी मिळावा. साक्षीदार संरक्षण कायद्यासंदर्भात अहवाल सादर करावा. सध्या जिल्हा समित्यांकडे किती अर्ज प्रलंबित आहेत याचीही माहिती तयार करावी. पीडित  महिलेचे त्यांना न्याय मिळेपर्यंत समुपदेशन  करावेअशा सूचना डॉ.गोऱ्हे यांनी दिल्या.

----------

 

Chotisi yatra

 *यात्रा बहुत छोटी है...*


एक बुजुर्ग महिला बस में यात्रा कर रही थी।


अगले पड़ाव पर, 

एक सुंदर मजबूत युवती बस में चढ़ गई और बुजुर्ग महिलाके पास बैठ गई...

और साथ में बैठी बुजुर्ग महिला को अपने साथ लिए कई बैगों से शरारतपूर्ण इरादे से छुआ। 


युवती ने देखा कि उसके शरारत करने के बावजूद बुजुर्ग महिला चुप है,

तो युवती ने उससे पूछा:-

मैंने आपके साथ शरारत की, फिर भी आप चुप हैं,

शिकायत क्यों नहीं की❓


 बुज़ुर्ग महिला ने मुस्कुराते हुए उत्तर दिया:-


असभ्य होने या इतनी तुच्छ बात पर चर्चा करने की कोई आवश्यकता नहीं है, क्योंकि आपके साथ मेरी यात्रा बहुत छोटी है और मैं अगले पड़ाव पर उतरने जा रही हूं। 


 यह उत्तर सोने के अक्षरों में लिखे जाने के योग्य है:-


 "इतनी तुच्छ बात पर चर्चा करने की कोई आवश्यकता नहीं है, क्योंकि हमारी यात्रा एक साथ बहुत छोटी है"


 हम में से प्रत्येक को यह समझना चाहिए कि इस दुनिया में हमारा समय इतना कम है कि इसे बेकार तर्कों, ईर्ष्या, दूसरों को क्षमा ना करने, असंतोष और बुरे व्यवहार के साथ काला करना समय और ऊर्जा की एक हास्यास्पद बर्बादी है.... 


किसी ने आपका दिल तोड़ा❓ शांत रहें,

यात्रा बहुत छोटी है... 


किसी ने आपको धोखा दिया, धमकाया, या अपमानित किया❓आराम करें, 

तनावग्रस्त न हों,

यात्रा बहुत छोटी है... 


किसी ने बिना वजह आपका अपमान किया❓शांत रहें, 

इसे नजरअंदाज करें,

यात्रा बहुत छोटी है.. 


किसी पड़ोसी ने ऐसी टिप्पणी की जो आपको पसंद नहीं आई❓शांत रहें,

उसकी ओर ध्यान न दें,उसे माफ कर दें, यात्रा बहुत छोटी है... 


हमारी यात्रा की लंबाई कोई नहीं जानता,

कोई नहीं जानता कि यह अपने पड़ाव पर कब पहुंचेगे❓

हमारी एक साथ यात्रा बहुत छोटी है... 


आइए, हम दोस्तों और परिवार की सराहना करें।

आइए हम आदरणीय, दयालु और क्षमाशील बनें... 


अपनी मुस्कान सबके साथ बांटिए क्योंकि...

हमारी यात्रा बहुत छोटी है!


*...सुप्रभात...*🙏🙏

 Christmas Island's mass red crab migration is one of the most incredible natural processes on Earth. Every year, hundreds of millions of these large crabs emerge from the rainforest and make their way to the ocean to breed. The migration starts with the first rainfall of the wet season. This is usually in October or November, but can sometimes be as late as December or January.

Vangelis.


 तृतियपंथीय व्यक्तींनी पोर्टलवर नोंदणी करावी

मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी

             

            मुंबईदि. 28 : नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स (National Portal For Transgender Persons) या संकेतस्थळावर जास्तीत जास्त तृतीयपंथी व्यक्तींनी स्वतःहुन पुढे येऊन ऑनलाईन अर्ज भरावाप्रमाणपत्र व ओळखपत्र प्राप्त करून घेऊन आपले अधिकार व हक्क यांचे जतन करावेअसे आवाहन  मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे.

             जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर येथे जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या समस्यांच्या तक्रारीचे जलद गतीने प्रभावी नियंत्रण निवारण करण्याकरीता जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक पार पडली.

         जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्व उपस्थित स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांना https://transgender.dosje.gov.in या केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर समाजातील तृतीयपंथी व्यक्तींनी ऑनलाईन अर्ज भरुन तृतीयपंथीयांचे प्रमाणपत्र व ओळखपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी आवाहन केले. जिल्हा निवडणूक कार्यालयमुंबई उपनगर यांचेमार्फत जिल्ह्यातील तृतियपंथीय पात्र व्यक्तींनी मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी अर्ज भरणे तसेच कागदपत्रांची आवश्यकता तसेच कार्यपद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयामार्फत विकसित तृतियपंथीय व्यक्ती नोंदणी पोर्टलवर प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तृतियपंथीय प्रमाणपत्र व ओळखपत्र ५ व्यक्तींना वाटप करण्यात आले.

       उपजिल्हा निवडणूक अधिकारी अजित साखरेसहायक आयुक्तसमाज कल्याणमुंबई उपनगर,प्रसाद खैरनार,अजित साखरेकिन्नरमा संस्थाहमसफर संस्था यांचे प्रतिनिधीजिल्हा नियोजन अधिकारी भुषण देशपांडे या बैठकीला उपस्थित होते.

*****


 

मनोधैर्य योजनेची आदर्श कार्यपद्धती तयार करण्याचे

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

 

            मुंबईदि. 28 : महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि अॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिलांना आर्थिक सहाय्य तसेच पुनर्वसनासाठी राबविल्या जाणाऱ्या मनोधैर्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आदर्श कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश  विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.

            मनोधैर्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीस महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव श्री. राजेंद्र भागवतमहिला व बाल विकासचे  आयुक्त श्री. राहुल मोरेविधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव श्री. एम. पी. धोटेगृह विभागाचे प्रधान सचिव श्री. संजय सक्सेना आदी उपस्थित होते.

               राज्यात या योजनेअंतर्गत सहाय्य मिळालेल्या पीडितांची संख्याआर्थिक सहाय्य प्राप्त होण्याचा कालावधी यासंदर्भातील माहिती सादर करण्याच्या सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. महिलांना मदत मिळण्यास विलंब होत असेल,तर याचा सखोल अभ्यास करून त्रुटी दूर कराव्यात. योजनेस गती देण्यासाठी आणि त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी दर महिन्याला मनोधैर्य योजनेबाबत आढावा बैठक घेण्यात यावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

                 मनोधैर्य योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी व जास्तीत जास्त पिडीतांना कमी कालावधीत अर्थसहाय्य मिळावे यासाठी तत्काळ कार्यवाही होणे गरजेचे आहे. पिडीत महिलांना योजनेचे सहाय्य मिळण्यासाठी कमीत कमी कायदेशीर कार्यवाहीस सामोरे जावे लागेल यासाठीही प्रयत्न होणे गरजेचे आहे. ट्रॉमा केअर पुनर्रचनेची गरज असून राखीव निधीतून या योजनेला निधी मिळावा. साक्षीदार संरक्षण कायद्यासंदर्भात अहवाल सादर करावा. सध्या जिल्हा समित्यांकडे किती अर्ज प्रलंबित आहेत याचीही माहिती तयार करावी. पीडित  महिलेचे त्यांना न्याय मिळेपर्यंत समुपदेशन  करावेअशा सूचना डॉ.गोऱ्हे यांनी दिल्या.

----------

 


 अंगणवाडी सेविकांना दोन हजार रूपयांची भाऊबीज भेट

- महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

 

            मुंबई, दि. 28 : एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत  अंगणवाडी सेविकामदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका कर्मचा-यांना भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रूपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

            सन २०२१-२०२२ या वित्तीय  वर्षासाठी भाऊबीज भेट दोन हजार रूपये देण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय २८ ऑक्टोबर २०२१ रोजी जारी करण्यात आले आहे. यासाठी यंदाच्या वित्तिय वर्षात एकूण 37 कोटी 97 लाख 32 हजार इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकामदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना ही भाऊबीज भेट अदा करण्यात येणार आहे.

०००


 

 कोविड-19 मुळे छत्र हरवलेल्या आठ बालकांना

5 लाख रुपयांच्या मुदत ठेवीचे संरक्षण

 

         ·         पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते मुलांना ठेव प्रमाणपत्राचे वितरण

         ·         मुलांच्या भविष्यासाठी राज्य शासन कायम पाठीशी असल्याची ग्वाही

 

            मुंबईदि. 28: कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना 5 लक्ष रुपये मुदत ठेव प्रमाणपत्र वितरण वस्त्रोद्योगमस्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते करण्यात आले. माता-पित्याचे छत्र हरवलेल्या मुलांच्या भविष्यासाठी राज्य शासन कायम त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

            येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार राहुल नार्वेकरजिल्हाधिकारी राजीव निवतकरजिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलारबाल कल्याण समितीचे अध्यक्ष मिलिंद बिडवई यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

            यावेळी पालकमंत्री श्री. शेख म्हणालेकोविड काळाने आपल्यातील अनेकांना हिरावून नेले. आज आठ मुलांना पाच लाख रुपयांची मुदत ठेव त्यांच्या नावे ठेवून त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न आपण केला आहे. राज्य शासन अशा छत्र गमावलेल्या मुलांच्या शिक्षण आणि त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याच्या प्रक्रियेत निश्चितपणे त्यांच्या समवेत असणार आहे. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने राज्य शासन आणि प्रशासन कायम त्यांच्या पाठीशी राहीलअसे त्यांनी स्पष्ट केले.

            आमदार श्री. नार्वेकर म्हणालेखऱ्या अर्थाने या मुलांच्या पालकत्वाची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून कायम या मुलांच्या पाठीशी राहूअसे ते म्हणाले.

            जिल्हाधिकारी श्री. निवतकर म्हणालेजिल्हास्तरीय कृति दलाच्या माध्यमातून दोन्ही पालक गमावलेल्या मुलांची माहिती घेण्यात आली.त्याचप्रमाणे एकल पालक गमावलेली मुलेपती गमावलेल्या महिला या सर्वांची माहिती संकलित करण्यात येत आहे. त्यांनाही राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊन त्यांना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती शेलार यांनी केले.  या कार्यक्रमास छत्र हरविलेल्या मुलांचे जवळचे नातेवाईकबालकल्याण समिती सदस्य,  उपस्थित होते.

            जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती शेलारजिल्हा परिविक्षा अधिकारी  पी. व्ही शिनगारेपरिविक्षा अधिकारी स्नेहा जोशी,  विधी सल्लागार श्रीमती.सविता ठोसर यांच्यासह जिल्हा बाल संरक्षण कक्षमुंबई शहर कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

0000


 राज्‍यपालांची आदर्शगाव राळेगणसिद्धीला भेट

 

            अहमदनगरदि. 28 (जिमाका वृत्तसेवा) :- राज्‍यपाल श्री. भगत सिंह कोश्‍यारी यांनी पारनेर तालुक्‍यातील आदर्श गाव असलेल्‍या  राळेगणसिद्धी येथे भेट दिली. यावेळी त्‍यांनी पद्मभूषण अण्‍णा हजारे यांची भेट घेतली आणि त्‍यांच्‍या  संकल्‍पनेतून साकारलेले ग्रामविकासाचे आजपर्यंतचे सर्व उपक्रम व लोकसहभागावर आधारित नाविन्यपूर्ण कामाची माहिती जाणुन घेतली.

            राज्‍यपाल श्री. कोश्‍यारी यांनी स्‍वर्गीय नवलभाऊ मीडिया सेंटरला भेट दिली. त्‍यावेळी त्‍यांनी गावातील विकासकामांची माहितीअण्‍णा हजारेंच्‍या कार्याची माहिती सांगणाऱ्या छायाचित्र दालनाची पाहणी करुन माहिती घेतली. त्‍यानंतर जनआंदोलन संग्रहालयाला भेट देऊन त्‍यांनी 1980 ते 2020 पर्यंतच्‍या 40 वर्षातील अण्‍णा हजारेंच्‍या विविध आंदोलनाच्‍या इतिहासाची माहिती ज्‍येष्‍ठ  समाजसेवक अण्‍णा हजारे यांच्‍याकडुन जाणुन घेतली. तत्‍पुर्वी त्‍यांनी गावाच्‍या  सुरूवातीला असलेल्या कोहिणी नाला बंडींग (प्‍लास्‍टीक अस्‍तरीकरण)पाणलोट कामाचीगॅबियन कम्‍पोजिट बंधारा या उपक्रमांची पाहणी करुन माहिती जाणून घेतली. त्‍यांनी आदर्शगाव राळेगणसिध्‍दी गावातील गावकऱ्यांशी संवाद साधला व गावाच्‍या विकासाबाबत त्‍यांची मते जाणून घेतली.

            गावाच्‍या भेटीनंतर राज्‍यपाल श्री. भगत सिंह कोश्‍यारी यांनी शासकीय हेलिकॉप्‍टरने मुंबईकडे प्रयाण केले.

****

Featured post

Lakshvedhi