Friday, 8 October 2021

 -खो खेळाला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            पुणे, दि. 8 : देशाच्या मातीतला खेळ असलेल्या खो-खो खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी  कबड्डीच्या धर्तीवर स्पर्धा भरवून खो-खो खेळाला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

            महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे पीवायसी जिमखाना येथे आयोजित पुरस्कारार्थी खेळाडूंच्या गौरव कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार अनिकेत तटकरेअभिमन्यू पवारमहाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीव राजे निंबाळकरसचिव गोविंद शर्माअर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू श्रीरंग इनामदारसारिका काळेखो-खो खेळाचे मार्गदर्शक डॉ चंद्रजित जाधवविश्वस्त अरूण देशमुखवैशाली लोंढे आदी उपस्थित होते.

            श्री.पवार म्हणालेप्रत्येकाने एकतरी खेळ खेळलाच पाहिजे. खेळ तरुणांना जिंकण्यासाठी आवश्यक असलेला उत्साह आणि ऊर्जा देतो. शरिराची व मनाची जडण-घडण खेळांच्या माध्यमातून होत असते. आयुष्यात खेळांमुळे नेतृत्वंगुणांना वाव मिळतो. टीव्हीलॅपटॉप आणि मोबाईल समोर बसणाऱ्या आजच्या युवा पिढीने मैदानी खेळाकडे वळण्याची आवश्यकता आहे.

            गेल्या काही दिवसात ‍क्रिकेट सोबतच इतरही सांघिक आणि वैयक्तिक खेळात राज्यातल्या अनेक खेळाडूंनी आपली चमक दाखविली आहे. यामध्ये खो-खोच्या खेळाडूंचा मोठा वाटा आहे. भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत आपल्या मुलांच्या आणि मुलींच्या संघाने सातव्यांदा विजेतेपद पटकावले आहे. ही राज्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे शासनाचे प्रयत्न

            राज्यातल्या खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आघाडी सरकारने राज्याचे स्वतंत्र क्रीडा धोरण तयार केल्याचे सांगून श्री. पवार म्हणालेराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप उमटविणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत वर्ग एकच्या पदावर नोकरीच्या संधी दिल्या आहेत. राज्यातल्या खेळाडूंसाठी शासन सेवेत 5 टक्के कोटा राखीव ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय आघाडी सरकारने घेतला. कबड्डीखो-खोनेमबाजीकुस्ती या खेळात देशाचे आणि महाराष्ट्राचे नाव उंचावणाऱ्या खेळाडुंना राज्य शासनाच्या सेवेत सामावून घेण्यात आले आहे. त्यामुळे खेळांना प्रोत्साहन मिळत आहे.

शहरी भागात खो-खो लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करा

            खो-खो च्या राज्य संघटनेने यापुढे शहरी भागात खो-खो खेळ पुन्हा लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील होतकरुगुणी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नियमीतपणे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात यावे. शहरी भागातील क्रीडा मंडळेक्लब कमी होत असताना त्यांना पुन्हा या प्रवाहात आणण्यासाठी राज्य संघटनेने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आशियाई पातळीवर खो-खो  खेळाची प्रतिष्ठा वाढविण्याचे काम राज्य संघटनेवर आहे.  त्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवावेत. खो-खोसह कबड्डीकुस्ती सारख्या खेळांना प्रोत्साहन आणि सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे श्री.पवार त्यांनी सांगितले.

सारिका इतर खेळाडूंसाठी मार्गदर्शकप्रेरणादायी

            खो-खो खेळातल्या कामगिरीसाठी देशातील मानाचा अर्जून पुरस्कार मिळवणारी खेळाडू  सारिका काळे आणि तिला प्रशिक्षण देणारे चंद्रजित जाधव यांचा राज्याला अभिमान आहे. सारिका काळे यांनी अत्यंत खडतर परिस्थितीतअनेक संकटांवरआव्हानांवर मात करुन इथपर्यंतची वाटचाल केली आणि मोठे यश मिळवले. त्यांची वाटचाल ही इतर खेळाडूंसाठी मार्गदर्शक तसेच  प्रेरणादायी असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.

            आमदार अभिमन्यू पवार यांनी खो-खो खेळाला दर्जा मिळवून देण्यासोबतच शाळा तिथे खो-खो मैदानही संकल्पना राबवावीअशी अपेक्षा व्यक्त केली.

            भारतीय खेळ वाढावाखेळाला राष्ट्रीय पातळीवर लोकप्रियता मिळावीयासाठी आपण संघटनेच्या माध्यमातून सातत्याने काम करणार असल्याचे श्री. निंबाळकर  त्यांनी सांगितले.

            भुवनेश्वर येथे गेल्या महिन्यात झालेल्या 40व्या कुमार-कुमारी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत सलग सातव्यांदा विजयी झालेल्या दोन्ही संघातल्या खेळाडूंचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे पदाधिकारीखेळाडूपालक उपस्थित होते.

००००

 सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस शिपाई पद भरतीसाठी 13 ऑक्टोबर रोजी परीक्षा

 

            मुंबई, दि. 3 : सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 20 चालक पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठीची लेखी परीक्षा 13 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येणार आहे. अर्ज केलेल्या परीक्षार्थींनी https://mhpolicebharti.cbtexam.in या पोर्टलवरून प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचे प्रभारी पोलीस उप अधीक्षक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

            सिधुदूर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 20 चालक पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठीची परीक्षा 13  ऑक्टोबर रोजी कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयकुडाळ हायस्कुल आणि बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज या परीक्षा केंद्रावर होणार आहे. लेखी परीक्षेकरिता प्रवेशपत्रावर नमुद असलेल्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर ओळखपत्रासह वेळेत उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी सोमवार ते शनिवार दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत 18002100309पोलीस भरती मदत केंद्र कक्ष 02362-228008/  सिंधुदुर्ग पोलीस नियंत्रण कक्ष - 02362228614 आणि bhartimahapolice@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असेही एस. बी. गावडे प्रभारी पोलीस उप अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे.

०००


 प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

उभारणीच्या दृष्टीकोनातून नियोजन करावे

- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

 

               मुंबईदि. 7 गेल्या दीड वर्षापासून देशासह राज्यात कोविड विषाणूचा प्रार्दूर्भाव वाढल्याने राज्यातील वैद्यकीय यंत्रणेवर ताण आल्याचे दिसून आले आहे. मात्र येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीबाबतचा दृष्टीकोन ठेवून त्यादृष्टीने काम करणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

            महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा येत्या 5 वर्षातील दृष्टीकोन (प्रॉस्पेटिव्ह प्लॅन) कसा असेल यासंदर्भातील आढावा बैठक मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजयवैद्यकीय शिक्षण आयुक्त विरेंद्र सिंहवैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकरवैद्यकीय शिक्षण विभागाचे अवर सचिव डॉ. श्री. पु. कोतवाल यांच्यासह महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले कीआज राज्यात प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय रुग्णालयाची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. त्यामुळे या रुग्णालय उभारणीसाठी आवश्यक असणारा निधीकुशल मनुष्यबळ तसेच रुग्णालयाची उभारणी कशी करता येईल याबाबत नियोजन होणे आवश्यक आहे. केरळपश्चिम बंगाल आणि कर्नाटक येथील राज्यात कुशल परिचारिका असतात आणि याची मागणी देशभरात असते. या परिचारिकांना काय वेगळे प्रशिक्षण दिले जातेत्यांचा अभ्यासक्रम काय असतोत्या राज्यांची परिचारिका महाविद्यालय सुरु करण्याबाबतचे धोरण नेमके काय आहे याचा सुद्धा अभ्यास  होणे आवश्यक आहे.

            महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे देशातले महत्वाचे विद्यापीठ असून काळाच्या पुढे जाऊन विद्यार्थी हित पाहून नियोजन करणे आवश्यक आहे. पुढील पाच वर्षांचा विचार करीत असताना बदलत्या परिस्थितीनुसार आणि विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार अभ्यासक्रमांची आखणी करणे आवश्यक आहे. पॅरामेडिकल अभ्यासक्रमहॉस्प‍िटल मॅनेजमेंटवेगवेगळया अभ्यासक्रमांतील रिसर्चआयुष इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरु करण्यावरही विद्यापीठाने भर द्यावा असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

            गेल्या दीड वर्षांपासून रुग्णालयांमध्ये परिचारिकातंत्रज्ञलॅब टेक्निशिअन यांची नितांत आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येणाऱ्या 5 वर्षांच्या प्रॉस्पपेटिव्ह प्लॅनमध्ये परिचारिकांसाठी अभ्यासक्रम तसेच वैद्यकीय क्षेत्रांसाठी आवश्यक असणाऱ्या पूरक अभ्यासक्रमांची आखणी करणे आवश्यक आहे.

            महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत राज्यातील वैद्यकीय संस्थांना संस्था सुरु करण्यास मान्यता देण्यात येतात. मान्यता देत असतानाचे निकष संस्था पूर्णपणे पाळत आहे कासंस्थेचे शैक्षणिक, पायाभूत आणि निकालांवर आधारित परीक्षण सुद्धा होणे आवश्यक आहे. मान्यता देण्यात आलेल्या संस्था नियमांनुसार काम करतात का हे सुद्धा पाहिले जाणे आवश्यक आहे. संस्थांना मान्यता देत असतानाचे निकष नेमके कसे ठरविले जातातसंस्थांना देण्यात येणाऱ्या नुतनीकरणासंदर्भात सुलभता याबाबतही निश्चित धोरण आवश्यक असल्याचे श्री.देशमुख यावेळी म्हणाले.

Palakanchi shala

 “उदंड जाहलें व्यंकू”


“७२ तासांसाठी प्रति व्यक्ती ८० हजार ते दोन लाख रूपयांपर्यंची पॅकेजेस” हे आपण वाचतो, तेव्हाच हे अगदी सहज समजतं की, हे तीन दिवस इथं बरंच काही वेगळंच चालणार आहे. आणि १८०० मुलंमुली हे पैसे भरून प्रवेश निश्चित करतात, तेव्हा हेही समजून घेण्यासारखं आहे की, हा पैसा त्या मुलामुलींच्या स्वकमाईचा नाहीच. त्यातले १००० जण तिथं उपस्थित होते. आता माणशी एक लाख रूपयांनी मोजलं तरी तीन दिवसांच्या मौजमजेसाठी १८०० माणसांकडून १८ कोटी रूपये गोळा झाले असं दिसतं. किती? अठरा कोटी..! आणखी धक्कादायक गोष्ट अशी आहे की, मागच्या एका वर्षभरात कोविड निर्बंध असतानाही असे अनेक कार्यक्रम झालेले आहेत आणि त्यापैकी तीनशे कार्यक्रमांवर ह्याच पथकानं कारवाई केली आहे. एका वर्षाला तीनशे पासष्ठ दिवस अन् एका वर्षभरात तीनशे कारवाया…! पण आपल्याला मात्र तीनशे एकावी कारवाई दिसली. कारण ती ब्रेकिंग न्यूज होऊन समोर आली. का बरं? कारण एकच - शाहरूख खानचा मुलगा त्यात सापडला आणि त्याचा गुन्हाही सिद्ध झाला..! 


आपल्या मुलानं किंवा मुलीनं दीड-दोन लाख रूपये तीन दिवसांच्या क्रूझवरच्या पार्टीसाठी भरले आहेत, हे पालकांना ठाऊकच नव्हतं, असं नक्कीच नसणार. आणि खरोखरच, अनेक पालकांना ह्यातलं काहीच ठाऊक नसेल तर त्यांची परिस्थिती नक्की म्हणजे नक्की गंभीर आहे. आपला मुलगा किंवा मुलगी चार-पाच दिवसांसाठी घरातच नसणार आहे, हे तरी ह्यांच्यापैकी कितीजणांच्या पालकांना माहिती होतं? आपल्या मुलाचं किंवा मुलीचं नेमकं काय चाललंय हे माहितीच नाही, हे कितीही धक्कादायक असलं तरी एकवेळ समजून घेऊ पण घरातून दोन-दोन लाख रूपये ‘पार्टी’ साठी खर्च केले जातायत, याचीही कल्पना नसावी, हे मात्र पटत नाही. पैसे कुठल्या कारणासाठी खर्च केलेत हे नक्की माहिती असणार म्हणजेच आपल्या मुलामुलींचे हौसमौज करण्याविषयीचे, ‘रिलॅक्स’ किंवा ‘चिल’ होण्याविषयीचे, ‘जरा एन्जाॅय’ करण्याविषयीचे विचार काय आहेत, हे पालकांना निश्चित माहिती असणार आणि हे सगळं ह्या १८०० पालकांनी स्विकारलेलं असणार..! खरा धक्का हाच आहे…! 


ज्यांना अटक झाली आहे, त्या मुलांचे पालक त्यांच्यासाठी कपडे घेऊन जातात, बर्गर घेऊन जातात, घरचं अन्न घेऊन जातात म्हणजे पालकांना ह्या सगळ्याची सवय आहे, हे उघड आहे. क्रूझवरच्या तीन दिवसांच्या ‘हाय प्रोफाईल’ पार्टीसाठी दोन लाख रूपये भरणारा मुलगा किंवा मुलगी घरी जेवत असेल? त्याच्या घरी त्याची आई स्वयंपाक करत असेल? हे खरं वाटत नाही. “मां का प्यार” किंवा “घर का खाना” ह्या संकल्पना तरी ह्या मुलांना माहिती असतील का? आज पोलिस स्टेशनमध्ये धावत गेले तसे शाळांच्या पालकसभांना कधी यांचे पालक गेले असतील का? 


आपली मुलं दिवसभर काय बघतात, कुणाशी बोलतात, काय बोलतात, त्यांच्या गप्पांचे विषय काय असतात, त्यांची स्वप्नं काय आहेत, ध्येयं आहेत का, असलीच तर ती कोणती आहेत, ते ध्येय साध्य करण्यासाठीची इच्छाशक्ती आपल्या मुलांमध्ये आहे का, असलीच तर ती दिसते का, जाणवते का, आपल्या मुलांसमोरचे आदर्श कोणते आहेत, कोणत्या प्रकारचं आयुष्य त्यांना आवडतं, कोणती जीवनशैली आवडते, का आवडते, आपली मुलं कुणाचं अनुकरण करतात, का करतात, त्यांच्यावर कुणाचा प्रभाव आहे, का आहे, पैसा-संपत्ती-स्टेटस यांच्याकडे पाहण्याचा आपल्या मुलांचा दृष्टीकोन कसा आहे, पैशाकडे पाहण्याची त्यांची वृत्ती कशी आहे, उपलब्ध साधनांचा उपयोग आणि विनियोग आपली मुलं कसा करतात, एखाद्या अवघड क्षणी स्वत:हून एकट्यानं निर्णय घेण्याची वेळ आली तर योग्य निर्णय घेता येईल का, त्यासाठीचं पुरेसं ज्ञान किंवा तारतम्य त्यांच्याकडे आहे का…. केवढी मोठी यादी आहे.. यातला एक तरी प्रश्न ह्या मुलांच्या पालकांना पडत असेल का ? याचं उत्तर “नाही” असंच आहे, हे दुर्दैवानं आणि अतिशय खेदानं मान्य करावं लागतं. 


ह्या मुलाच्या वडिलांचं नाव शाहरूख खान आहे, ते प्रसिद्ध अभिनेते आहेत, २०० कोटी रूपयांच्या घरात राहतात, त्यांच्याकडे अमाप धनसंपत्ती आहे, म्हणून त्यांच्या मुलाला अटक केल्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ झाली, असं वाटत असेल तर ती आपली फार मोठी चूक आहे. कारण, मिडीयानं ही बातमी टीआरपी साठीच्या स्वार्थापोटी प्रसिद्ध केली असं क्षणभर गृहित धरलं तरीही त्यातून समोर येणारं भीषण वास्तव नाकारता येण्यासारखं नाही. देशभरातल्या पालकांनी खरोखरच अतिशय संवेदनशील होऊन साकल्यानं विचार करावा, चिंतन करावं अशीच ही घटना आहे. आज आपण शाहरूख खानच्या पालकत्वाची लक्तरं काढतोय पण सर्वसामान्य कुटुंबांमध्ये वेगळं चित्र आहेच कुठं? फक्त पोलिसी कारवाई होत नाही, मुलांना पकडून चौकीवर नेलं जात नाही एवढाच काय तो फरक. म्हणून, शाहरूख खान अजाण पालक आणि आपण सगळे सुजाण पालक असं होत नाही. आपणही त्याच भोकं पडलेल्या बोटीत आहोत, फक्त शाहरूख खान आपल्याआधी बुडाला..


मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलं जेव्हा तंबाखू-गुटखा-मावा-जर्दा-पान मसाला खातात, सिगारेटी ओढतात, दारू पितात, ते कशाचं द्योतक आहे? साध्या कुटुंबातली मुलं मित्रांसोबत सहलीला जातो असं सांगून गोव्याला जातात अन् दिवसरात्र दारू पिऊन तर्र होऊन पडतात, त्यातून काय दिसतं? पावसाळ्यात मुलंमुली घरी अजिबात पत्ता लागू न देता खडकवासला, पानशेत, भुशी डॅम, लोणावळा, खंडाळा, पाचगणी, कास पठार, ताम्हिणी अशा ठिकाणी तोकड्या कपड्यांमध्ये, एकमेकांच्या मिठीत धबधब्यांमध्ये चिंब भिजत असतात, ते कशाचं प्रतिक असतं? मित्राचा किंवा मैत्रिणीचा वाढदिवस आहे असं सांगून आपली मुलं डान्स बार किंवा पबमध्ये जातात ते काय असतं? रात्री साडेनऊनंतरसुद्धा तळजाईवर, पर्वतीच्या पायऱ्यांवर, हत्तीचौकात, कात्रज सर्पोद्यानाबाहेर, डेक्कनच्या पुलावर, झेड ब्रिजवर, जंगली महाराज आणि फर्ग्युसन रस्त्यावर एकमेकांना लोहचुंबकासारख्या चिकटलेल्या मुलामुलींच्या पालकांना आपल्या पाल्यांमधल्या विकसित झालेल्या ‘चुंबकीय’ गुणांची माहिती असते का? आपली मुलंमुली त्यांच्या स्मार्टफोन्सचा, इंटरनेटचा उपयोग कसा करतात हे पालकांना नक्की आणि नेमकं ठाऊक असतं का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा “नाही” अशीच आहेत..! 


म्हणूनच तर प्रश्न उभा राहतो की, दोन लाख रूपये खर्च करून क्रूझवरच्या हाय प्रोफाईल पार्टीत ड्रग्ज घेणारा आर्यन खान आणि सामान्य मध्यमवर्गीय नोकरदार कुटुंबातला अपार्टमेंटच्या गच्चीवर दारू पिणारा मुलगा ह्यांच्या अंध:पतनाची तुलना केली तर त्यांच्यात फरक कुठंय? आर्थिक क्रयशक्तीचा फरक वगळता पातळी घसरणं समानच आहे की..! 


नटसम्राट मधले बायको-पोरांसमोर अन् नातवंडांसमोर दारू पिऊन तर्र होणारे अप्पा, झेंडा चित्रपटातला संत्या, सातच्या आत घरात मधली देवघरातल्या समईवर सिगारेट पेटवणारी मुलगी, ती सध्या काय करते मध्ये मित्राची दारू पिण्याची इच्छा पूर्ण करणारी मैत्रिण ह्या सगळ्या व्यक्तिरेखा डोळ्यांसमोर आणून पहा. मग गंगाजल मधल्या बच्चा यादव आणि साधू यादवला दोष का द्यायचा? तिथंही आपला वैचारिक घोळच होतो. आपण त्या चित्रपटातल्या यादव पितापुत्रांना दोष देतो, पण सतत भकाभका सिगारेटी ओढणारा अन् दारू पिणारा जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक पदावरचा आयपीएस अधिकारी अमित कुमार आपल्याला अजिबात चुकीचा वाटत नाही..! त्याचं व्यसन आपल्या डोळ्यांना दिसत नाही..! 


आपण घराघरातून आण्णा नाईक अन् शेवंताचे चाळे चवीनं पाहणार अन् आपल्या मुलांनी मात्र ‘श्याम’ व्हावं असं आपल्याला वाटत असेल तर तसं होणार नाही. आपण ‘इकुडची का तिकुडची’ बघण्यात रमणार आणि आपल्या मुलांनी मात्र अभ्यासात झोकून द्यावं असं आपल्याला वाटत असेल तर आपण स्वत:च अतिशय गोंधळलेले आहोत हे मान्य करा. आपण मनोरंजनाच्या नावाखाली घरातल्या मोठ्या स्क्रीनवर घराघरातले कौटुंबिक कलह, पाताळयंत्रीपणा, विवाहबाह्य संबंध बघणार आणि त्याच मनोरंजनाच्या नावाखाली आपली मुलं त्यांच्या खोलीत त्यांच्या स्मार्टफोनवर विविध ‘मनोरंजक’ साईट्स बघणार, साहित्य वाचणार आणि डॅशिंग किंवा ब्युटीफूल व्यक्तिमत्वांशी मैत्री करणार.. दिवसेंदिवस आपण त्या सिरीयल्समध्ये रममाण होणार, तशीच आपली मुलंमुलीही त्यांनी निवडलेल्या जगात रममाण होणार.. फरक आहेच कुठे?


मोठमोठ्या शहरांपासून ते छोट्या गावांपर्यंतच्या व्यसनमुक्ती केंद्रांची वाढती संख्या आणि तिथं दाखल होणाऱ्या व्यक्ती पहा. खरोखर एकदा भेट देऊन माहिती घेऊन पहा. जगण्यातलं काळंकभिन्न वास्तव तुम्हाला दिसेल. हजारो कोटी रूपयांची संपत्ती असणाऱ्या आर्यन खाननं व्यसनावर संपत्ती उधळली ते मिडीयानं चार दिवस मोठ्या चवीनं दाखवलं. पण चार आकडी मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांमधल्या पोरांना व्यसनमुक्ती केंद्रात पकडून आणून दाखल करावं लागतं, तेही बघा. मिडीया ते दाखवणारच नाही, कारण त्या पोरांचे पालक सेलिब्रिटी नसतात. मिडीयाला त्या बातम्या दाखवून काय मिळणार? ना टीआरपी, ना पैसा.. पण तुम्ही मात्र जरूर पहा, अभ्यास करा, तथ्य जाणून घ्या. ती पोरं आणि आर्यन खान ह्यांच्यात फरकच नसल्याचं तुम्हाला दिसेल..! जर फक्त सेलिब्रिटींचीच पोरं चुकत असतील आणि वाया जात असतील तर मग समाजातली पुनर्वसन केंद्रं आणि व्यसनमुक्ती केंद्रं रूग्णांनी ओसंडून का वाहतायत? व्यसनमुक्तीसाठीचे स्वमदत गट खेडोपाडी का वाढतायत? ह्याचाच सरळ स्पष्ट अर्थ असा होतो की, समाजाच्या वार्तनिक शिष्टाचाराच्या चौकटीच निखळत चालल्या आहेत. आणि त्याला जबाबदार आहेत हे सगळे व्यंकू अन् त्यांच्या राजरोस चाललेल्या शिकवण्या..! कोण आहेत हे व्यंकू?


ड्रग्ज घेणारा आर्यन खान आपल्याला दोषी वाटला आणि आपण त्याची निंदानालस्ती करतो आहोत. पण मग दिवसाढवळ्या पोलिसांवर हात उचलणाऱ्या तरूणांचे व्हिडीओ आपण सोशल मीडीयावर पाहतो. पोलिसांवर हात उचलणाऱ्या, घाणेरड्या शिव्या देणाऱ्या महिला आपण पाहतो. त्यांचे पालक तर सेलिब्रिटी नसतात ना? ही माणसं उच्चभ्रू नसतात ना? मग तेव्हा आपण व्यक्त का होत नाही? आजूबाजूला माणसं व्हिडीओ शूट करत उभी राहतात पण त्या टवाळ पोरांच्या मुस्काटात मारण्याचं धाडस करत नाहीत, मग या माणसांना आर्यन खानला धारेवर धरण्याचा अधिकारच नाही. कारण, हे सगळे ‘व्यंकू’ आहेत.. समाजातल्या अपप्रवृत्तींना खतपाणी मिळायला पोषक वातावरण देणारे ‘व्यंकू’..!


पालकांनी पालकत्वाची चौकट सोडली की सगळं बिघडत जातं. सिगारेट विकणाऱ्या विक्रेत्याला त्याच्या समोरच्या अठरा-वीस वर्षं वयाच्या मुलाला सिगारेट विकत देताना काहीच वाटत नसेल का? त्या मुलामध्ये त्याला स्वत:चं पोरगं दिसत नसेल? दिसतच नसणार. नक्की दिसत नसणार. कारण, ती सावधपणाची दृष्टी त्याच्याकडं असली असती तर स्वत:च्या व्यवसायाला झळ बसणं सोसणं स्विकारून त्यानं त्या मुलाला सिगारेट देणं नाकारलं असतं. दारू-सिगारेट-तंबाखू-गुटखा विकणाऱ्या किती जणांमध्ये दिसतं असं पालकत्वाचं चारित्र्य? शोधून पहा बरं. तुमची घोर निराशा होईल. हे सगळे विक्रेते ‘व्यंकू’ आहेत आणि आपल्या समाजातल्या तरूण उगवत्या पिढीची शिकवणीच घेतायत. 


शाळकरी पोरं दिवस-दिवसभर गेम पार्लरमध्ये खेळत असतात, त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून येतात, याचं त्या पार्लरवाल्याला देणं-घेणं असतं का? तो म्हणेल, “हा माझा व्यवसाय आहे. असला विचार करत बसलो तर व्यवसायच बुडेल माझा.” कितीतरी मुलंमुली अगदी नित्यनेमानं ठराविक स्टाॅल्सवर खायला जातात. त्यांच्याकडे हे पैसे आले कुठून, दिले कुणी, घरी माहिती आहे का असली चौकशी तो स्टाॅलवाला करत बसत नाही. त्याच्या दृष्टीनं त्याचा धंदा आणि त्यातला नफा महत्वाचा. माझ्या दृष्टीनं हे सगळे व्यंकूच..


सर्वसामान्य कुटुंबांमधल्या मुलांपर्यंत या गोष्टींची माहिती पोचते तरी कशी? ती पोचते जाहिरातींमधून. केवळ कमर्शियल जाहिरातींमधून नव्हे. सिनेमा-सिरीयल्समधल्या व्यक्तिरेखा, त्यांच्या सवयी, त्यांच्या स्टाईल्स, त्यांचं वर्तन, जीवनशैली हे असं काही समोर आणलं जातं की, भल्याभल्यांचा तपोभंग होतो. मिडीयाचा महिमाच तसा आहे..! हे सगळे निर्माते-दिग्दर्शक व्यंकूच आहेत. “आम्ही फक्त व्यक्तिरेखेला प्रामाणिकपणे न्याय देतो, तो आमच्या व्यवसायाचा भागच आहे, बाकी कशाशी आमचा काहीही संबंध नाही” अशी मखलाशी म्हणजे शुद्ध निर्लज्जपणा असतो. पण एकदा व्यंकूचं भूत अंगात शिरलं की, शहाणपणा, विवेकबुद्धी, नैतिकता, सामाजिक जाणीव वगैरे गोष्टी कस्पटासमान वाटायला लागतात.


हा मिडीया नावाचा व्यंकू तर ह्या सर्वांमध्ये मोठा आणि अत्यंत धूर्त आहे. आपली अन् आपल्या मुलांची व्यवस्थित शिकवणी घेतोय. ज्ञान अन् मनोरंजनाच्या नावाखाली अनेक गोष्टींची बेमालूम लागवड घराघरातून होतेय. हा व्यंकू इतक्या चलाखीनं त्याचे शिष्य तयार करतोय की, आपल्याला शेवटपर्यंत पत्ताच लागत नाही. 


आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं की, ह्या व्यंकूंना शोधून त्यांच्या शिकवण्या बंद पाडल्या पाहिजेत, पण ते माझं काम नाही. कुणीतरी अशोक कामटे यावेत आणि त्यांनी ते काम करावं. कुणीतरी कृष्णाप्रकाश यावेत आणि त्यांनी ते काम करावं. कुणीतरी समीर वानखेडे यावेत आणि त्यांनी ते काम करावं. मग आपण काय करणार?  आपल्याला काहीच जमणार नाही का? आधीच तयार झालेल्या व्यंकूंना धडा शिकवण्याचं, वठणीवर आणण्याचं आणि शिक्षा देण्याचं काम न्याय व्यवस्था करेल. पण भविष्यात व्यंकू तयारच होऊ नयेत आणि त्यांच्या शिकवण्या चालूच नयेत यासाठी जागरूक होणं, सजग होणं आणि समाजातल्या प्रत्येक घटकाची काळजी स्वत:हून घेणं हे तरी आपण करू शकतो ना? मग निदान ते तरी करूया.. पुढं होऊया आणि ही व्यंकूंची फॅक्टरीच बंद पाडूया..! 


©मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ञ, संचालक-प्रमुख 

आस्था काऊन्सेलिंग सेंटर,पुणे

 कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी टाटा मेमोरियल सेंटर येथील इन्फोसिस फाऊंडेशनच्या

‘आशा’ धर्मशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

·       रुग्णांची जगण्याची उमेद वाढवणाऱ्या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांकडून सुधा मूर्ती यांचा गौरव

 

            मुंबई दि. 7 : आजपासून आपण राज्यातली मंदिरे उघडली आहेत. टाटा मेमोरियल सेंटरच्या परिसरात उद्घाटन होत असलेल्या आशा धर्मशाळेमुळे आरोग्य मंदिराचे दार देखील सर्वसामान्य गरीब रुग्ण आणि नातेवाईकांसाठी खुले झाले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते आज नवी मुंबईच्या खारघर येथे इन्फोसिस फाऊंडेशनने बांधलेल्या ‘आशा’ निवास धर्मशाळेच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. यावेळी रुग्णांची जगण्याची उमेद जिवंत ठेवणारी सुधा मूर्ती  यांच्यासारखी देवमाणसे आपल्यासोबत असणे हे निश्चित आपले भाग्य आहे असे गौरवोदगार मुख्यमंत्र्यांनी काढले.

            दूरदृष्यप्रणालीद्वारे झालेल्‍या या कार्यक्रमात इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मुर्ती यांच्यासह नंदन निलकेणीमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंहप्रधान सचिव विकास खारगे,  परमाणू  ऊर्जा विभागाचे सचिव के एन व्यास,  सहसचिव संजय कुमारटाटा मेमोरियल सेंटर संचालक डॉ. आर.ए. बडवेयांच्यासह इन्फोसिस व टाटा मेमोरियल सेंटरचे इतर मान्यवर उपस्थित होते. खारघर येथे बांधण्यात आलेली ही  १३ मजली अूसन इमारतीत २६० खोल्या आहेत.

            नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आरोग्य मंदिराचे लोकार्पण करण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले कीश्रीमती सुधा मूर्ती या  महाराष्ट्राच्या कन्या आहेतपण त्यांच्यातील आई आज आपल्याला पहायला मिळालीसुखी माणसाचा सदरा कुणालाच सापडत नाहीप्रत्येकाला नेहमी काही ना काही हवं असतं या स्थितीत श्रीमती मूर्ती यांची दातृत्वाची वृत्ती विरळी आहे. हा खऱ्या अर्थाने लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे.  जेंव्हा कॉम्प्युटर किंवा कुठलेही सॉफ्टवेअर विकसित झाले नव्हते तेंव्हा  नारायण मूर्तींनी आपल्या उद्योगाचा विकास आणि विस्तार केला. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत तर हे करत असतांना आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना देखील त्यांनी जपली.

सहकार्याचे अनमोल हात

            आपण आज मंदिरे खुली केली आहेत पण यापूर्वीही डॉक्टरांच्या रुपाने देव आपल्या आसपाससोबत वावरत होते याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की उपचारासाठी मुंबईत किंवा मोठ्या शहरात  कर्करोगाच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आणि नातेवाईकांना खर्च परवडत नाही मग ते मिळेल तिथे राहातातत्यांच्यासाठी हा ‘आशा’ निवास  खुप महत्वाचा आधार ठरणार आहे. शासन राज्यातील आरोग्य सेवा सक्षम करत आहेच त्यात  टाटा मेमोरियल सेंटर आणि इन्फोसिससारख्या संस्थांच्या सहकार्याच्या हाताने या कामाला अधिक बळकटी मिळते. मुख्यमंत्र्यांनी याठिकाणी येणारा रुग्ण खडखडीत बरा होऊन सुखरूप घरी जावो, अशी सदिच्छाही यावेळी व्यक्त केली. 

अनुभवातून आलेला संदेश

            श्रीमती सुधा मुर्ती यांची पुस्तके ही केवळ चाळता येत नाहीत तर ती लक्ष देऊन वाचावी लागतातयात कुठलाही कल्पनाविलास नाही तर अनुभवातून आलेला संदेश आणि‍ विचार आहेहे विचारधन तुम्ही वाटत आहात असेही मुख्यमंत्र्यांनी सुधा मुर्तींच्या पुस्तकावर आपली प्रतिक्रिया देतांना म्हटले.

आशा निवासामुळे गरीब रुग्णांना मदत – सुधा मूर्ती

            नवी मुंबई-खारघर येथे टाटा मेमोरियल सेंटर येथे उभारण्यात आलेल्या आशा निवास धर्मशाळेमुळे शहरात उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब जनतेला मदत होईल असे सांगून श्रीमती मूर्ती यांनी  टाटा मेमोरियल सेंटरतर्फे देण्यात येत असलेल्या रुग्णसेवेचे कौतूक केले.इन्फोसिस फाऊंडेशन आणि कंपनी सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी पुढे येऊन काही करू शकत असल्याचा आनंद व्यक्त करतांना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्रात उत्तम काम होत असल्याचेही सांगितले. 


 

राज्यात आजपासून मिशन कवच कुंडल अभियान

दररोज 15 लाखांहून अधिक लसीकरणाचे उद्दिष्ट : सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

 

         मुंबईदि. 7 : राज्यातील कोविड-१९ लसीकरणाला आणखी गती यावी यासाठी 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर पर्यंत मिशन कवच कुंडल अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात राज्यात दररोज 15 लाखांहून अधिक लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

           सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री.टोपे यांनी या अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी काल रात्री राज्यातील जिल्हाधिकारीजिल्हा परिषदेचे मख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा शल्य चिकित्सकजिल्हा आरोग्य अधिकारीतालुका अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सविस्तर चर्चा केली. अभियानाच्या अंमलबजावणीबाबत सूचना दिल्या.

        अभियानाबाबत माहिती देताना श्री. टोपे यांनी सांगितले कीराज्यात ८ ते १४ ऑक्टोबर दरम्यान हे मिशन कवच कुंडल अभियान राबवले जाईल. केंद्र सरकारने १५ ऑक्टोबरपर्यंत देशभरात १०० कोटी नागरिकांना कोविड लस देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून भरीव योगदान दिले जावेअसे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्यासाठी अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानात ग्रामीण आणि निमशहरी भागातील नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे.

            अभियानाची अंमलबजावणी प्रभावी होण्यासाठी महसूलग्राम विकासमहिला व बाल विकासशिक्षणनगर विकास अशा विविध विभागांचा सहभाग घेतला जाणार आहे. अभियानासाठी पुरेशा लस उपलब्ध आहेत. सध्या राज्याकडे ७५ लाख लस उपलब्ध आहेत. आणखी २५ लाख लस उपलब्ध होणार आहेत. सिरींज आदी अनुषंगिक साहित्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

            राज्यातील सव्वा नऊ कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी सहा कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून आणखी सव्वातीन कोटी पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण शिल्लक आहे. अभियानाच्या कालावधीत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचा उद्देश आहे. सध्या पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे ६५ टक्के तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण साधारणपणे टक्के आहे. लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी या अभियानात समाजातील विविध घटकांचा सहभाग घेतला जाणार आहे. त्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनखाजगी डॉक्टररोटरी क्लबलायन्स क्लबस्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घेतला जाणार आहेअसे श्री. टोपे यांनी सांगितले.

            कोविडमुळे मृत्यू पावलेल्या राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे सुमारे १ लाख ४० हजार नागरिक मरण पावले आहेत. यासाठी एसडीआरएफ मधून सुमारे ७०० कोटी रुपयांचे तरतूद केली जाणार आहे. यासाठी पोर्टलवर जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना माहिती भरावी लागेल. त्यानंतर मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या खात्यात मदतीचे पैसे जमा होतील. असे श्री. टोपे यांनी स्पष्ट केले.

 सुधारित :

सार्वजनिक वितरणातील तांदळाच्या वाहतुक खर्चाच्या तरतूदीस मान्यता

 

            किमान आधारभूत किंमत योजनेंतील 2020-21 मधील खरीप व रब्बी या दोन्ही पणन हंगामात धान खरेदीतील तांदळाच्या वाहतुकीच्या 422 कोटी 52 लाख रुपयांच्या खर्चास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत (विकेंद्रीत खरेदी योजना) खरीप हंगाम 2020-21  मध्ये 1 कोटी 36 लाख 76 हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आले आहे. तर रब्बी हंगाम 2021-22 मध्ये 53 लाख 15 हजार क्विंटल धान खरेदी होणार आहे.

            यातून तयार होणारा तांदूळ अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे अंतर्गत (NFSA) राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला वाटप केला जातो. विदर्भातील जिल्ह्यातून महाराष्ट्रातील इतर जिल्हयात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा तसेच प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजनेत धान व तांदळाची वाहतूक करण्यासाठी सुमारे 422 कोटी 52 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हा वाहतूक दर राज्य शासनाचा धान व सीएमआर वाहतूक दर 2019-20 च्या मंजूर दरांप्रमाणे आहे.

-----०-----


Featured post

Lakshvedhi