Monday, 20 September 2021

 *When You Want More Time*

*To Take Correct Decision,*

*Then Remember,*

*Even A Correct Decision Is Wrong When Its Too Late*

*life Is Time's Game. *

*Good Morning*😊


 

 *अनंत चतुर्दशी*


ज्याक्षणी या शरीरात अडकणं संपेल

तो क्षणच अनंत - चतुर्दशी !


जेंव्हा अहम् आणि त्वम् एकजीव

होतील तीच अनंत - चतुर्दशी  !

            

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण 

बाप्पासारखा काही दिवसांचा

कोणी दीड, कोणी पाच

तर कोणी दहा दिवसांचा...


थोडा वेळ आहोत इथे

तर थोड जगून घेऊया

बाप्पा सारखे थोडे 

लाडु मोदक खाऊन घेऊया...


इथे सर्वच आहेत भक्त आणि 

सगळ्यांमध्ये आहे बाप्पा

 थोडा वेळ घालवू सोबत

आणि मारु थोड्या गप्पा...


मनामनातले भेद मिटतील

मिटतील सारे वाद 

एक होईल माणुस

आणि साधेल सुसंवाद...


जातील निघून सारेच

कधी ना कधी अनंताच्या प्रवासाला

ना चुकेल हा फेरा

जन्माला आलेल्या कोणाला...


बाप्पा सारखं नाचत यायचे 

आणि लळा लावून जायचे

दहा  दिवसांचे पाहूणे आपण 

असे समजून जगायचे...


किंमत तुमची असेलही 

तुमच्या प्रियजनांना लाख

आठवणी ठेवतील जवळ 

अन् विसर्जित करतील तुमची राख...


पाहुणा आहे इथे प्रत्येकजण 

दीड दिवस अन् दहा दिवसाचा

हे जगणे म्हणजे एक उत्सव 

हा काळ दोन घडींच्या सहवासाचा.............

  🙏🏻

Sunday, 19 September 2021

 जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही मिळणार आता दिल्लीच्या धर्तीवर शिक्षण

राज्यमंत्री सत्तार यांच्या प्रयत्नांना यश;

ग्रामविकास विभागाने सात तज्ज्ञांच्या अभ्यासगटाची केली स्थापना

 

               मुंबई, 19-  राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आणखी चांगल्या पद्धतीचे शिक्षण मिळावे याकरिता महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून दिल्ली निगमच्या शाळांच्या धर्तीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे याकरिता राज्यमंत्री सत्तार आग्रही होते. यासंदर्भात त्यांनी ग्रामविकास विभागाला प्रस्तावही पाठविला होता. त्यानंतर ग्रामविकास विभागाने यासाठी सात तज्ज्ञांच्या अभ्यास गटाची स्थापना केली असून दिल्लीच्या शैक्षणिक कार्य पद्धतीवर ते अभ्यास करणार आहेत. त्यामुळे श्री. सत्तार यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, असाही राज्यमंत्री सत्तार यांचा मानस आहे.

               आजच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही प्रगत तंत्रज्ञानासह जगातील सर्व अत्याधुनिक शिक्षण मिळणे गरजेचे आहे. दिल्ली निगमच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी काळानुरूप मोठ्या प्रमाणावर बदल व सुधारणा झाल्या आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता वापरण्यात येणारे तंत्रज्ञानविद्यार्थी व शिक्षकांकरिता असणाऱ्या सुविधाविद्यार्थ्यांचे आचार-विचार व शिस्तशिक्षकांची शिकवण्याची कार्यपद्धती याचा सखोल अभ्यास तज्ज्ञ मंडळी करणार असून त्याचा अहवाल राज्य सरकारला ते सादर करतील.

               दिल्ली निगमच्या शाळांच्या शैक्षणिक पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी ग्रामविकास विभागाने सात तज्ज्ञांच्या अभ्यास गटाची स्थापना केली आहे. त्यात औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी डॉ. बी. बी. चव्हाणसेवानिवृत्त विशेष लेखा परिक्षक सहकारी संस्था आर.एस. शेख, फर्दापूर येथील सहशिक्षक काशिनाथ पाटीलअहमदनगर जिल्ह्यातील राहाता पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पोपट काळेऔरंगाबाद जिल्ह्यातील वरूर तालुका सिल्लोड येथील सहशिक्षक जगन सुरसे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव कोण्हाटी येथील मुख्याध्यापक सुनीलची चिपाटे यांचा समावेश आहे.

 साकीनाका प्रकरणी तपासात कुठलाही हलगर्जीपणा नसल्याबद्दल

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे समाधान

·       मुख्यमंत्र्यांनी स्वत: आयोगाच्या उपाध्यक्षांना बोलविले चर्चेस

 

            मुंबई दि. 13 : साकीनाका येथे महिलेवरील बलात्कार आणि त्यानंतर तिच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी एकूणच पोलिसांनी त्वरेने सुरु केलेल्या तपासावर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने समाधान व्यक्त केले आहे. राज्यशासन याप्रकरणी संपूर्ण न्याय देईल असा विश्वास व्यक्त करताना आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी या घटनेत राजकारण आणता कामा नये असे देखील स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांना या घटनेच्या अनुषंगाने स्वत: चर्चेसाठी बोलावून या घटनेकडे राज्यशासन गांभिर्याने पहात असून पिडीतेच्या कुटूंबास योग्य आर्थिक सहाय्य देण्यात येईल व तिच्या मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी देखील पार पाडण्यात येईल, असे आयोगास सांगितले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलमुख्य सचिव सिताराम कुंटेपोलीस महासंचालक संजय पांडेमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंहगृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवसामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमारमहिला बाल कल्याण विभागाच्या सचिव आय. एस. कुंदनपोलीस आयुक्त हेमंत नगराळेसह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटीलमिलिंद भारंबे आदिंची उपस्थिती होती.

पिडीत महिलेच्या कुटूंबास तातडीने आर्थिक सहाय्य

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, पिडीत महिलेच्या मुलांना, परिवारास महिला बाल कल्याण विभागाच्या मनोधैर्य योजनेतून तसेच सामाजिक न्याय विभागाच्या अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये आर्थिक सहाय्य तातडीने दिले जाईल. या महिलेच्या मुलांच्या शिक्षण व पालन-पोषणाच्या बाबतीतही संबंधित विभागांना वेगाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे आयोगाच्या उपाध्यक्षांना सांगितले.

अनाथनिराश्रित महिलांसाठी घरांबाबत विचार

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणालेज्या निराश्रित व अनाथ महिला रस्त्यांवर राहतात त्यांच्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून घरकूल योजना सुरू करता येते का यासंदर्भात विचार करता येवू शकतो. यासंदर्भात आयोगाने अशा स्वरुपाची योजना आखण्याविषयी केंद्र शासनास सूचना करावी असेही मुख्यमंत्री म्हणाले.

तपासात हलगर्जीपणा नसल्याबद्दल समाधान

            राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनीही घटना घडताच अवघ्या काही वेळात पोलिसांनी धाव घेतली व महिलेस मदत केली. त्याचप्रमाणे पुढे देखील वेगाने तपास करुन आरोपीस अटक केली याविषयी समाधान व्यक्त केले. पोलिसांना धन्यवाद देवून ते म्हणालेपिडीत महिलांना आपण न्याय देवू शकतो हे दाखविण्यासाठी प्रशासनाने चांगली पावले उचलली आहेत. आता लवकरात लवकर खटला जलदगती न्यायालयात उभा करुन गुन्हेगारास फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरुन गुन्हेगारांना धाक राहील.

            पोलीस आयुक्त हेमंत नगराळे म्हणालेही घटना कळता क्षणी दहा मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहचलेएवढेच नाही तर जखमी अवस्थेत पडलेल्या महिलेस स्वत: टेम्पो चालवत पोलीसांनी तिला रुग्णालयात पोहोचवले.

राजा ठाकरे यांची तातडीने नियुक्ती

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेवून विशेष सरकारी अभियोक्ता यांची हा खटला न्यायालयात उभा राहण्याअगोदरच नियुक्ती करण्यात यावी असे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे प्रसिद्ध वकील राजा ठाकरे यांची तातडीने नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देखील यावेळी पोलीस आयुक्तांनी दिलीयावर आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी समाधान व्यक्त केले.  

सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे जाळे वाढवणार

            ही घटना सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. मुंबई शहरात 5 हजार सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून 7 हजार कॅमेरे बसविणे सुरु आहे अशी माहिती देवून सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील म्हणाले कीशहरातील सर्व मॉल्ससंस्थादुकाने यांना रस्त्याच्या दिशेकडील कोनात कॅमेरे बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशारीतीने शहरात सुमारे 50 हजारापेक्षा जास्त कॅमेरे कार्यरत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

००००


 राज्यातील स्थलांतरीत ऊस तोडणी कामगारांना सामाजिक सुरक्षितता योजनांचे

लाभ देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे

उपमुख्यमंत्री अजित पवार

·       ऊस तोडणी कामगारांच्या पाल्यांसाठी राज्यात उभारण्यात येणार वसतिगृहे

·       ऊस तोडणी कामगारमुकादमासह वाहतुक कामगारांना मिळणार ओळखपत्रे

·       कै. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ तातडीने कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू

 

          मुंबईदि. 15 : महाराष्ट्रातील साखर उद्योग हा प्रमुख उद्योग असून राज्यातील साखर कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या स्थलांतरीत ऊस तोडणी कामगारांना सामाजिक सुरक्षितता योजनांचे लाभ देण्यासाठी राज्य शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. तसेच राज्यातील स्थलांतरीत ऊस तोडणी कामगारांच्या जिल्हानिहाय संख्येचे प्रमाण लक्षात घेऊन त्यांच्या पाल्यांसाठी वसतिगृहांची उभारणी करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. त्याचप्रमाणे राज्यातील स्थलांतरीत ऊस तोडणी कामगारमुकादम आणि वाहतुक कामगारांची नोंदणी करुन त्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

          सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मागणीप्रमाणे ऊस तोडणी कामगारांच्या प्रश्नांसाठी तसेच कै. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ तातडीने कार्यान्वित करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

          यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलमहसूल मंत्री बाळासाहेब थोरातसार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपेकौशल्य विकास मंत्री नवाब मलिकग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफकृषी मंत्री दादाजी भुसेसहकार मंत्री बाळासाहेब पाटीलसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेराष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

          उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेराज्यात सुमारे १०१ सहकारी आणि ८७ खासगी साखर कारखा्रन्यांमध्ये मिळून अंदाजे आठ ते दहा लाख ऊस तोडणी कामगार राज्यातील विविध जिल्ह्यांतून स्थलांतरीत होऊन काम करतात. या स्थलांतरीत ऊस तोडणी कामगारांना सामाजिक सुरक्षितता योजनांचे लाभ मिळणे आवश्यक आहे. स्थलांतरीत ऊस तोडणी कामगारांना सामाजिक सुरक्षितता योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी राज्य शासनाच्या संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे,  स्थलांतरीत ऊस तोडणी मजूरांच्या पाल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न महत्वाचा असून राज्यातील ज्या भागांतून अधिक ऊस तोडणी मजूर स्थलांतर करतातत्या ठिकाणी वसतिगृहाची उभारणी करण्यात यावी. ही वसतिगृहे दर्जेदार पध्दतीने उभारण्यात यावीत. सध्या मंजूर झालेल्या वसतीगृहाव्यतिरिक्त ज्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसतोड कामगार राहतात त्या ठिकाणीही वसतिगृह सुरू करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.  यामध्ये सर्व सोयीसुविधां पुरविण्याच्या सूचनाही  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. तसेच राज्यातील ऊस तोडणी कामगारमुकादम आणि वाहतुक कामगारांची नोंदणी करण्यात येणार असून त्यांना ओळखपत्रे देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

          सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी कै. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना व इतर बाबींची माहिती दिली.

*****

 सोनाली नवांगुळ व मंजूषा कुलकर्णी यांचे

साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल राज्यपालांकडून अभिनंदन

 

मुंबई दि १९ - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोनाली नवांगुळ व मंजूषा कुलकर्णी यांचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

 

               सोनाली नवांगुळ यांना मध्यरात्रीनंतरचे तास’ या अनुवादित कादंबरीसाठी तर डॉ. मंजूषा कुलकर्णी यांना प्रकाशवाटा’ या  पुस्तकाच्या संस्कृत अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याचे समजून आनंद वाटला.

 

               सोनाली नवांगुळ व डॉ. मंजूषा कुलकर्णी यांनी प्रतिकूल परिस्थितीवर धैर्याने मात करीत पुरस्कार प्राप्त केल्याचे समजून विशेष अभिमान वाटला. उभय लेखिकांचे हार्दिक अभिनंदन करतो व भविष्यातही त्यांचेकडून साहित्यसेवा घडो या शुभेच्छा देतोअसे राज्यपालांनी आपल्या अभिनंदनपर पत्रात म्हटले आहे.

               ०००

Featured post

Lakshvedhi