Sunday, 19 September 2021

 साकीनाका प्रकरणी तपासात कुठलाही हलगर्जीपणा नसल्याबद्दल

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे समाधान

·       मुख्यमंत्र्यांनी स्वत: आयोगाच्या उपाध्यक्षांना बोलविले चर्चेस

 

            मुंबई दि. 13 : साकीनाका येथे महिलेवरील बलात्कार आणि त्यानंतर तिच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी एकूणच पोलिसांनी त्वरेने सुरु केलेल्या तपासावर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने समाधान व्यक्त केले आहे. राज्यशासन याप्रकरणी संपूर्ण न्याय देईल असा विश्वास व्यक्त करताना आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी या घटनेत राजकारण आणता कामा नये असे देखील स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांना या घटनेच्या अनुषंगाने स्वत: चर्चेसाठी बोलावून या घटनेकडे राज्यशासन गांभिर्याने पहात असून पिडीतेच्या कुटूंबास योग्य तो मोबदला देण्यात येईल व तिच्या मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी देखील पार पाडण्यात येईल, असे आयोगास सांगितले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलमुख्य सचिव सिताराम कुंटेपोलीस महासंचालक संजय पांडेमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंहगृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवसामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमारमहिला बाल कल्याण विभागाच्या सचिव आय. एस. कुंदनपोलीस आयुक्त हेमंत नगराळेसह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटीलमिलिंद भारंबे आदिंची उपस्थिती होती.

पिडीत महिलेच्या कुटूंबास तातडीने आर्थिक सहाय्य

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, पिडीत महिलेच्या मुलांना, परिवारास महिला बाल कल्याण विभागाच्या मनोधैर्य योजनेतून तसेच सामाजिक न्याय विभागाच्या अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये आर्थिक सहाय्य तातडीने दिले जाईल. या महिलेच्या मुलांच्या शिक्षण व पालन-पोषणाच्या बाबतीतही संबंधित विभागांना वेगाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे आयोगाच्या उपाध्यक्षांना सांगितले.

अनाथनिराश्रित महिलांसाठी घरांबाबत विचार

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणालेज्या निराश्रित व अनाथ महिला रस्त्यांवर राहतात त्यांच्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून घरकूल योजना सुरू करता येते का यासंदर्भात विचार करता येवू शकतो. यासंदर्भात आयोगाने अशा स्वरुपाची योजना आखण्याविषयी केंद्र शासनास सूचना करावी असेही मुख्यमंत्री म्हणाले.

तपासात हलगर्जीपणा नसल्याबद्दल समाधान

            राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनीही घटना घडताच अवघ्या काही वेळात पोलिसांनी धाव घेतली व महिलेस मदत केली. त्याचप्रमाणे पुढे देखील वेगाने तपास करुन आरोपीस अटक केली याविषयी समाधान व्यक्त केले. पोलिसांना धन्यवाद देवून ते म्हणालेपिडीत महिलांना आपण न्याय देवू शकतो हे दाखविण्यासाठी प्रशासनाने चांगली पावले उचलली आहेत. आता लवकरात लवकर खटला जलदगती न्यायालयात उभा करुन गुन्हेगारास फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरुन गुन्हेगारांना धाक राहील.

            पोलीस आयुक्त हेमंत नगराळे म्हणालेही घटना कळता क्षणी दहा मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहचलेएवढेच नाही तर जखमी अवस्थेत पडलेल्या महिलेस स्वत: टेम्पो चालवत पोलीसांनी तिला रुग्णालयात पोहोचवले.

राजा ठाकरे यांची तातडीने नियुक्ती

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेवून विशेष सरकारी अभियोक्ता यांची हा खटला न्यायालयात उभा राहण्याअगोदरच नियुक्ती करण्यात यावी असे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे प्रसिद्ध वकील राजा ठाकरे यांची तातडीने नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देखील यावेळी पोलीस आयुक्तांनी दिलीयावर आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी समाधान व्यक्त केले.  

सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे जाळे वाढवणार

            ही घटना सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. मुंबई शहरात 5 हजार सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून 7 हजार कॅमेरे बसविणे सुरु आहे अशी माहिती देवून सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील म्हणाले कीशहरातील सर्व मॉल्ससंस्थादुकाने यांना रस्त्याच्या दिशेकडील कोनात कॅमेरे बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशारीतीने शहरात सुमारे 50 हजारापेक्षा जास्त कॅमेरे कार्यरत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

००००

 राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उप परिसराचे उद्घाटन

सिंधुदुर्ग विद्यापीठ परिसर आदर्श शैक्षणिक परिसर व्हावा: राज्यपाल

 

            मुंबई दि :12,मुंबई विद्यापीठाने गणेशोत्सव सुरु असतानाच आपल्या सिंधुदुर्ग उपकेंद्राचा श्रीगणेशा केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग उपकेंद्राने पर्यावरणस्नेही परिसर अशी वेगळी ओळख निर्माण करावी व आदर्श शैक्षणिक परिसर होण्यासाठी प्रयत्न करावेअशी अपेक्षा राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली. 

            राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्राचे उद्घाटन झालेत्यावेळी ते बोलत होते. ठाणे व रत्नागिरीनंतर विद्यापीठाचे सिंधुदुर्ग हे तिसरे उपकेंद्र आहे.

उद्घाटन सोहळ्याला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतखासदार विनायक राऊतआमदार दिपक केसरकरकुलगुरू डॉ सुहास पेडणेकरप्रकुलगुरू रवींद्र कुलकर्णीकुलसचिव बळीराम गायकवाड आदी उपस्थित होते.

मंत्री उदय सामंत व कुलगुरू सुहास पेडणेकर दोघेही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांनी विद्यापीठातील तसेच देशविदेशातील तज्ज्ञ व प्राध्यापकांना सिंधुदुर्ग परिसर येथे निमंत्रित करावे व तेथील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक उच्च शिक्षण उपलब्ध करून द्यावे. कालांतराने सिंधुदुर्ग उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापीठ व्हावे या दृष्टीने देखील प्रयत्न झाले पाहिजेअशीही अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

सिंधुदुर्ग येथे उपकेंद्र सुरु होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना उपकेंद्राला प्रा. मधु दंडवते यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आल्यास त्यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.

00000

 

Governor inaugurates Sindhudurg Sub Centre of University of Mumbai

 

 Mumbai date 12 :Governor of Maharashtra and Chancellor of the Universities Bhagat Singh Koshyari inaugurated the Sindhudurg Sub Centre of the University of Mumbai through online mode on Sunday (१२ Sept). This is the third subcentre of the University, the two others being Thane and Ratnagiri.

        Minister of Higher and Technical Education Uday Samant, Member of Parliament Vinayak Raut, MLA Deepak Kesarkar, Vice Chancellor Dr Suhas Pednekar, Pro VC Ravindra Kulkarni, Registrar Baliram Gaikwad were prominent among those present.

00000


 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला सिडकोच्या विविध प्रकल्पांचा आढावा

सिडकोने गृहनिर्माण प्रकल्प राबविताना

मोकळ्या जागापार्किंग आदींचे नियोजन करावे

                                             उपमुख्यमंत्री अजित पवार

            ठाणेदि.१६ :- सिडकोच्या नवीन वसाहतींची निर्मिती करताना पुढील 25 वर्षांचा विचार करून नियोजन करावे. वाहनांसाठी पुरेसे पार्किंगमैदानेबागा यांच्यासाठी खुल्या जागा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईलयाकडे लक्ष द्यावे. सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे देतानाच त्यांची देखभाल सुद्धा त्यांना परवडली पाहिजेयाचा विचार करावाअसे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले.

            बेलापूरमधील सिडकोच्या मुख्यालयात आज उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सिडकोच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडखासदार सुनील तटकरेमाजी मंत्री शशिकांत शिंदेविभागीय आयुक्त विलास पाटीलठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकरसिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जीनवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंहनवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

            सिडकोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळनवी मुंबई मेट्रो प्रकल्पसुमारे 1 लाख 4 हजार घरांचा गृहनिर्माण प्रकल्पखारघर येथील आंतरराष्ट्रीय कार्पोरेट पार्क आणि नैना प्रकल्प आदी प्रकल्पांच्या सद्यःस्थितीचा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी आढावा घेतला.

            श्री. पवार म्हणाले कीसिडको परिसराचा विकास करत असताना काँक्रिटचे जंगल उभारून चालणार नाही. घरांची निर्मिती करत असताना त्या भागातील मोकळ्या जागा राखल्या जाव्यात. तसेच इमारतीमधील नागरिकांच्या चारचाकी व दुचाकींसाठी पार्किंगची सोय उपलब्ध व्हावी. राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण आखले आहे. त्यामुळे यापुढील काळात इलेक्ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणात येणार आहेत. त्यांच्या चार्जिंगची सोयही या ठिकाणी करण्यासंदर्भात प्रकल्पामध्ये नियोजन करण्यात यावे. यासाठी सध्या सुरु असलेल्या प्रकल्प आराखड्यामध्ये काही सुधारणा करता येतील का ते पहावे. तसेच पुढील गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये वरील बाबींचा साकल्याने विचार करावा. गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये पोलीसशासकीय कर्मचारीमाथाडी कामगार यांनाही घरे मिळावीतयासाठी आरक्षण ठेवण्यासंदर्भात विचार करावाअसे निर्देशही श्री. पवार यांनी यावेळी दिले.

            सिडकोने शहरांचा विकास करत असताना सामान्य जनतेच्या प्रश्नांचा विचार करणे आवश्यक आहे. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी कमी व्हाव्यातयावर लक्ष द्यावे. मोठ्या प्रमाणात नागरिकरण होत असताना पाणी पुरवठ्याचे नियोजन योग्य रितीने व्हायला हवे. त्यासाठी या भागात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करावे. जे प्रश्न सिडकोच्या स्तरावर सोडविता येणे शक्य आहेअसे सर्व प्रश्न नियमांच्या अधीन राहून तातडीने सोडविण्यासाठी पावले उचलावीत. राज्य शासनस्तरावरील प्रश्न सोडविण्यासाठी योग्य ती मदत करण्यात येईलअसेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

 

            गृहनिर्माण मंत्री डॉ. आव्हाड यांनी ठाणे-कळवा मार्गावरील वाहतूक कोंडीसिडकोच्या हद्दीतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासातील चटई क्षेत्राची (एफएसआय) समस्या आदी समस्या यावेळी मांडल्या. खासदार श्री. तटकरे यांनी नैना प्रकल्प तसेच स्थानिक नागरिकांच्या समस्या यावेळी मांडल्या.

 अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्याची

प्रभावी अंमलबजावणी करण्याचे गृहमंत्र्यांचे निर्देश

·        राज्यात ४५ अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षांची स्थापना

        मुंबई,  दि. १६ : राज्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृती करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.  तसेच गृह विभागामार्फत 11 पोलीस आयुक्तालय व 34 जिल्हास्तरावर असे एकूण 45 अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षांची स्थापना करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा 1956 अंतर्गत कारवाईची प्रभावी अंमलबजावणी संदर्भात आढावा बैठक गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झाली. या बैठकीसाठी अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवपोलीस महासंचालक संजय पांडेप्रधान सचिव संजय सक्सेना यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

         या अधिनियमातील तरतुदीनुसार विशेष पोलीस अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक यांनाच बळीताच्या सुटकेच्या कार्यवाहीचे अधिकार आहेत. प्रशासकीय कारणास्तव पोलीस निरीक्षक यांचेसह सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना सुध्दा विशेष पोलिस अधिकारी म्हणून नियुक्त करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. तसेच सर्व सहायक पोलीस आयुक्तपोलीस उप अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांना ट्रॅफिकिंग पोलीस ऑफिसर नेमण्याबाबत गृह विभागाने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याचे निर्देशही देण्यात आले.

          राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये शहरी भागात पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली तर ग्रामीण भागात पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अनैतिक व्यापार प्रतिबंध सनियंत्रण समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

          मानवी वाहतुकीच्या अनुषंगाने प. बंगाल राज्याप्रमाणेच इतर राज्यांशी समन्वय साधण्यासाठी प्रत्येक राज्यासोबत त्या राज्यातील गृह विभागमहिला व बालविकास विभाग यांच्या वतीने करार करण्याबाबतची सूचना श्रीमती ठाकूर यांनी मांडली. यावर सविस्तर चर्चा होऊन त्याप्रमाणे योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना गृहमंत्री श्री.पाटील यांनी संबंधितांना दिल्या.

           राज्यात सद्यस्थितीत मुंबई येथे विशेष न्यायालय असून पुणेठाणे आणि नागपूर येथे विशेष न्यायालये स्थापन करण्याबाबत विधी व न्याय विभागाने त्वरीत कार्यवाही करावी तसेच तोपर्यत ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी निर्दीष्ट न्यायालये स्थापन करण्याकामी उच्च न्यायालयास विनंती करण्याबाबत गृहमंत्री यांनी श्री.पाटभ्ल यांनी सूचना केल्या.

           अनैतिक मानवी व्यापार अंतर्गत लहान मुलांना विहित मुदतीत न्याय देण्यासाठी बाल संरक्षण समितीसमोर आणण्यासाठी पोलीस महासंचालक यांना परिपत्रक काढण्यासाठी सूचना श्री. पाटील यांनी यावेळी दिली.

          महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध करण्यासाठी  गृह विभाग आणि महिला व बालविकास विभागाने समन्वयाने काम करावे असे सांगितले.

       प्रधान सचिव  संजय सक्सेना यांनी यासंदर्भात सद्यस्थितीत राज्यात सुरु असलेल्या कार्यवाहीचे सादरीकरण केले.

००००

 नेहमी स्वयंपाकघरात पिठाची पिशवी (आटा) ठेवा आणि ती कुठे आहे हे सर्वांना कळवा.


 * कृपया शेवटपर्यंत वाचल्याशिवाय हटवू नका*


 "हा स्वतःला जाळणाऱ्या स्त्रीचा खरा जीवन अनुभव आहे ...".


 काही वेळापूर्वी, मी कॉर्न उकळत होते आणि कॉर्न तयार आहे की नाही हे पाहण्यासाठी उकळत्या पाण्यात थोडे थंड पाणी ओतले.  चुकून मी माझा हात उकळत्या पाण्यात बुडवला .... !!


 माझा एक मित्र जो व्हिएतनामी पशुवैद्यकीय डॉक्टर होता घरी आला होता.  म्हणून मी वेदनेने ओरडत असताना त्याने मला विचारले की माझ्याकडे घरी (गव्हाच्या) पिठाची पिशवी आहे का?


 मी थोडे ओतले आणि त्याने माझा हात मैद्यात टाकला आणि मला सुमारे 10 मिनिटे थांबायला सांगितले.


 त्याने मला सांगितले की व्हिएतनाम मध्ये एक मुलगा होता जो एकदा जाळला होता.  त्याच्यावर आग लागल्याने आणि घाबरून कोणीतरी आग विझवण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याच्या संपूर्ण शरीरावर पिठाची पोती ओतली.  पण केवळ आगच विझवली गेली नाही तर मुलावर भाजल्याचा कोणताही मागमूस नव्हता !!!!


 माझ्या स्वतःच्या बाबतीत, मी माझा हात पिठाच्या पिशवीत 10 मिनिटांसाठी ठेवला आणि नंतर काढला आणि त्यानंतर मला जळण्याच्या कोणत्याही लाल खुणाही दिसल्या नाहीत.  शिवाय, पूर्णपणे वेदना नाही.


 आज मी पिठाची पिशवी फ्रिजमध्ये ठेवते आणि प्रत्येक वेळी मी कुठे भाजल्यावर पीठ वापरते.  वास्तविक थंड पीठ खोलीच्या तपमानापेक्षा खूप चांगले आहे.


 मी पीठ वापरते आणि मला कधी जळाल्याचा मागमूसही नाही!


  एकदा माझी जीभ जळली होती आणि त्यावर सुमारे 10 मिनिटे पीठ ठेवले होते .... वेदना थांबल्या.


 त्यामुळे नेहमी तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये कमीत कमी पिठाचे पिशवी ठेवा.


 👌😊😊😊👍😊😊😊✌


 पीठात उष्णता शोषण्याची क्षमता असते आणि त्यात मजबूत अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात.  अशा प्रकारे, जळलेल्या रुग्णाला 15 मिनिटांच्या आत लागू केल्यास ते मदत करते.


 जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यासाठी फायदेशीर अशी एखादी गोष्ट शेअर करते, तेव्हा ती इतरांबरोबर शेअर करण्याची आपली नैतिक जबाबदारी आहे.  म्हणून हे इतरांसोबत शेअर करा.


 

Saturday, 18 September 2021

 © copy pest


जुनी लोकं हुशार होती की नाही हेच कळत नाही..!!!


हैदराबाद मधील शास्त्रज्ञाने शोधले की केळीच्या बुंध्यातील किंवा  केळीच्या कमळातील ,पानातील, जो चिकट द्रव पदार्थ असतो, तो खाल्यानंतर कॅन्सर वाढवणारी ग्रंथी स्लो किंवा हळू हळू निष्क्रिय होत जाते ....

      त्यामुळे जुनी लोक केळीच्या पानावर जेवण घायचे कारण गरम भात किंवा इतर पदार्थ त्यावर टाकले की तो चिकट द्रव त्या अन्नातून पोटात जायचा ...

पण आज उलट झालंय प्लास्टिक व थर्मोकोल मुळे महा भयानक परिस्थिती ओढवत आहे, नाल्या जॅम होऊन पूर येत आहे...


     शहरी भागात खेडोपाडी लग्नात प्लास्टिक कोटिंग पत्रावळी, द्रोण मग त्यात गरम पदार्थ टाकल्याने ते पोटात अन्न द्वारे जाऊन कॅन्सर वाढवत आहेत... कृपया वेळ आली आहे, 

"जूनं ते सोनं " आहे, हे प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे सिद्ध झाले आहे ..


      केळीच्या पानांवर गरम जेवण वाढल्याने त्या पानांमध्ये असलेले पोषक तत्व अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असतात.

 

- केळीच्या पानांवर जेवण केल्यास डाग-खाज, पुरळ-फोडं अशा समस्या दूर होतात.

 

- केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात एपिगालोकेटचीन गलेट आणि इजीसीजी सारखे पॉलीफिनोल्स एंटीऑक्सीडेंट आढळतात. केळीच्या पानावर जेवण केल्यास हे एंटीऑक्सीडेंट आपल्या शरीराला मिळतात. हे एंटीऑक्सीडेंट त्वचेला दीर्घ काळापर्यंत तरुण ठेवण्यास मदत करतात.


- त्वचेवर पुरळ, डाग, मुरूम असतील तर केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचे आजार लवकर ठीक होतात.   

         

     सगळ्याच भारतीय परंपरा टाकाऊ नसतात. किंबहुना भारतीय परंपरांमागे असलेला निसर्गाचा आणि मानवी आरोग्याचा सूक्ष्म विचार पाहून शास्त्रज्ञही वेगळ्या दृष्टीकोनातून त्यांकडे पाहू लागले आहेत. भारतीय संस्कृती ही मुळातच निसर्गपूजक आहे. निसर्गपूजेतून निसर्गरक्षणाचा विचार त्यामागे आहे. आपल्या संस्कृतीत सूर्य, वारा, पाऊस अशा निसर्गातील शक्तींनाच देव मानून त्यांची पूजा केली जाते. भारतीय संस्कृती ही निसर्गाचं ‘दोहन’ करायला शिकवते;’शोषण’ नव्हे. उदा. आपण गाईचं दूध तेवढं काढून घेतो, पण गाईला मारून टाकत नाही. गाईलाच मारून टाकणं हे झालं ‘शोषण’ आणि गाय जिवंत ठेवून दूध, गोमुत्र आणि शेण आपल्या उपयोगासाठी घेणं म्हणज़े ‘दोहन’. अशाप्रकारे निसर्गातील संसाधनांचा उपभोग घेताना त्यांची पुनर्भरण क्षमता अबाधित ठेवणं हे भारतीय परंपरांचं मूलतत्व आहे. गंमत अशी की, या परंपरा लोक केवळ परंपरा म्हणून वा धार्मिक भावनेने पाळत होते. त्यामागचं शास्त्र उमगलेलं नव्हतं. आज आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमुळे शस्त्रीय कसोट्यांवर या परंपरांची उपयुक्तता पडताळून पाहणं आणि आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत त्यांचं महत्व पटवून देणं शक्य झालं आहे. शिवाय, उपयुक्त परंपरा आणि निरूपयोगी परंपरा कोणत्या ते ओळखणंही शक्य झालं आहे. ‘केवळ परंपरा म्हणून नव्हे तर अमुक एक गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या उपयुक्त आहे म्हणून ती करावी’ हा एक नवा विज्ञानवादी दृष्टीकोनही मिळाला आहे.

 

केळीच्या पानावर जेवणं ही अशीच एक निसर्गाचा आणि आरोग्याचा सूक्ष्म विचार असणारी भारतीय परंपरा आहे. केळीच्या पानाची आरोग्यदृष्ट्या आणि पर्यावरणदृष्ट्या असलेली उपयुक्तता आधुनिक विज्ञानानेही सिद्ध झालेली आहे. मोठा आकार, लवचिकता, तंतुमयपणा आणि सहज उपलब्धता या वैशिष्ट्यांमुळे जेवायला ताटाऐवजी केळीचं पान घेण्याची परंपरा जवळजवळ संपूर्ण भारतात, विशेषत: दक्षिण भारतात वर्षानुवर्षं असलेली आढळते. काही अन्नपदार्थ शिजवताना भांड्याच्या तळाशी केळीचं पान घालण्याची पद्धतही होती, ज्यामुळे अन्नपदार्थाला एक मंद सुवास येतो. शिवाय तळाशी केळीचं पान घातल्यामुळे पदार्थ खाली लागून करपण्याचा धोकाही टळतो. अळुवडीसारखे पदार्थ केळीच्या पानात गुंडाळून शिजवतात. अनेक ठिकाणी वेष्टन म्हणूनही केळीच्या पानाचा उपयोग करतात. केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत फक्त भारतातच नव्हे तर इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, फिलीपिन्स, मेक्सिको, मध्य अमेरिका या देशांमध्येही आढळते.

 

     केळीच्या पानावर जेवण्याचे शरीराला होणारे फायदे आधुनिक विज्ञानाने सिद्ध झाले आहेत. केळीच्या पानात पॉलिफेनॉल नावाचा घटक असतो जो नैसर्गिक अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतो आणि रोगप्रतिकारक्षमता वाढवतो. जेवण जेवून झालं की पान गुरांना घातलं जातं. ते गुरांचंही अतिशय आवडीचं अन्न आहे. म्हणजे निसर्गाकडून वस्तू घेऊन उपयोग झाल्यावर ती निसर्गालाच परत द्यायची. यामुळे भांडी घासायचे श्रमही वाचतात, पाणीही वाचतं आणि भांडी घासायला साबण न वापरल्यामुळे घरगुती सांडपाण्याचं उत्सर्जनही कमी होतं. हल्ली कुठलाही घरगुती वा सार्वजनिक कार्यक्रम असल्यास सर्रास प्लास्टीकच्या वा थर्माकोलच्या डिश खाण्यासाठी वापरल्या जातात. खाऊन झाल्यावर या डिश कचर्‍यात फेकून दिल्या जातात. यामुळे किती कचरा वाढतो? केळीचं पान हा याला एक चांगला पर्याय आहे. ते सहज विघटनशील असल्यामुळे पर्यावरणपूरक आहे. खेडेगावांमध्ये केळीची पानं घरच्या घरीच उपलब्ध होतात. शहरामध्ये ती विकत घ्यावी लागतात, पण उपलब्ध असतात. शहराच्या आजुबाजूच्या केळी बागायती करणार्‍या शेतकर्‍यांना केळ्यांबरोबरच केळीची पानं विकणं हे एक चांगलं उदरनिर्वाहचं साधन होऊ शकतं. मुंबईत दादर आणि इतर काही रेल्वे स्टेशनांच्या बाहेर दहा रुपयांना चार वगैरे अशा किमतीत केळीची पानं मिळतात. त्यामुळे ती ‘महाग’ नक्कीच नाहीत. घरगुती कार्यक्रमासाठी प्लास्टीक डिश वापरण्यापेक्षा केळीची पानं वापरण्यात अशक्य काहीच नाही.

         केरळ मध्ये जेवणासाठी  व जेवण पॅकींग साठी केळीच्या पानांचा वापर सुरू पण झाला आहे ..

पण आपण कधी सुधारणा करणार ? वेळ कुणासाठी थांबत नाही..

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

*डॉ कल्याणकर किरण*

M.D. (ayu)

आयुर्वेदिक कॅन्सर तज्ञ

-स्वायु कॅन्सर केयर सेंटर

-श्री विश्व गणेश आयुर्वेद पंचकर्म

खारघर नवी मुंबई

Featured post

Lakshvedhi