Friday, 3 September 2021

 राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे काम सर्वांसाठी आदर्श

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

 

·        राज्यातील उत्तम काम करणाऱ्या स्वयंसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान

           

            मुंबईदि. 3 :  कोरोना काळात राज्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या ( NSS ) स्वयंसेवकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत उत्कृष्ट कार्य केले असून त्यांचे काम आपणा सर्वांसाठी आदर्श असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

            मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना जिल्हास्तरीय कोविड योद्ध्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होतो. त्यावेळी श्री.सामंत बोलत होते.

            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.सामंत म्हणालेकोरोना काळात राज्यातील सर्व विद्यापीठांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महत्वपूर्ण योगदान दिले आहे. एनएसएस स्वयंसेवकांनी, पोलीस मित्रआरोग्य मित्रमहसूल मित्र म्हणून  काम केले आहे. तसेच रक्तदान शिबीरजनजागृती अभियानपरिसर निर्जंतुकीकरण गरजूंना मास्क वाटपभोजनाची व्यवस्थाअन्न वाटपऔषधांचे वाटप अशा प्रकारचे विविध उपक्रम राबविले आहेत.

            सामाजिक कार्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करणे ही जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक अशा एकूण 37 एनएसएस स्वयंसेवकांचा जिल्हास्तरावर सन्मान होणार आहे. त्यानंतर यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या 13 कोविड योद्ध्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहेअसेही श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

            राज्यामध्ये सामाजिक चळवळ निर्माण करण्यात एनएसएसचा मोलाचा वाटा असून राज्यातील एनएसएसचा आदर्श देशभरातल्या इतर राज्यांनी घ्यावाअसे काम राज्यातील चार लक्ष स्वयंसेवक करीत असल्याचे श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

            यावेळीप्र-कुलगुरू रविंद्र कुलकर्णीएनएसएस सल्लागार समितीचे सदस्य अंकित प्रभूप्रभारी कुलसचिव बळीराम गायकवाडएनएसएस राज्य संपर्क अधिकारी प्रभाकर देसाईकार्यक्रम समन्वयक सुधीर पुराणिकसिनेट सदस्यपुरस्कारार्थी विद्यार्थी आणि संबंधित उपस्थित होते.

00000


 

"महा आवास अभियान-ग्रामीण" पारितोषिक वितरण

विकासयोजना राबविताना कोकण विभाग राज्यात अग्रेसर

                                                              -विभागीय आयुक्त विलास पाटील

            नवी मुंबई, दि.03 : लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विकासयोजना राबवितांना सुसंवादाचे वातावरण ठेवले तर मोठे कार्य उभे राहते. कोकण विभाग शासकीय विकासयोजना राबवितांना राज्यात सर्व क्षेत्रात अग्रेसर असतो. असे प्रतिपादन कोकण विभागाचे महसूल आयुक्त श्री.विलास पाटील यांनी केले.

            “महा आवास अभियान-ग्रामीण" अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी व कामगिरीबाबत मूल्यमापन करुन उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना कोकण भवन येथे "महा आवास अभियान-ग्रामीण" पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळयाच्या वेळी ते बोलत होते.

            या कार्यक्रमास श्रीम.पुष्पाताई पाटील अध्यक्षजिल्हा परिषद ठाणे,श्रीम. वैदही विशाल वाढाण अध्यक्षजिल्हा परिषद पालघरश्रीम. योगिता पारधीमा अध्यक्षजिल्हा परिषद रायगड,श्रीम. संजना सावंत अध्यक्षजिल्हा परिषद सिंधुदुर्ग, श्री.भाऊसाहेब दांडगे मुख्य कार्यकारी अधिकारीजि.प.ठाणेश्री.सिद्धराम सालीमठ मुख्य कार्यकारी अधिकारीजि.प.पालघरश्री.डॉ.किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारीजि.प.रायगडश्रीम.डॉ.इंदुराणी जाखड मुख्य कार्यकारी अधिकारीजि.प.रत्नागिरीश्री.प्रजित नायर मुख्य कार्यकारी अधिकारीजि.प.सिंधुदुर्गश्री.गिरीश भालेराव उप आयुक्त(विकास)श्री. मनोज रानडे उप आयुक्त (सामान्य)श्री. मकरंद देशमुख उप आयुक्त (महसुल)श्री. डी. वाय.जाधव उप आयुक्त (आस्थापना)श्री.चंद्रकांत वाघमारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीजि.प.पालघर श्री.रणधीर सोमवंशी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीजि.प.रायगड/प्रकल्प संचालकजि.ग्रा.वि.यंत्रणारायगड श्री.दादाभाऊ गुंजाळ प्रकल्प संचालकजि.ग्रा.वि.यंत्रणाठाणेश्री.माणिक दिवे प्रकल्प संचालकजि.ग्रा.वि.यंत्रणापालघरश्रीम.नंदिनी घाणेकर प्रकल्प संचालकजि.ग्रा.वि.यंत्रणारत्नागिरी श्री. राजेंद्र पराडकर प्रकल्प संचालकजि.ग्रा.वि.यंत्रणासिंधुदुर्ग  आदि मान्यवर उपस्थित होते.

            पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना आयुक्त श्री.विलास पाटील म्हणाले कीकोकण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक ऊर्जा ठेवून यापुर्वीही काम केले आहे. अशीच ऊर्जा पुढेही ठेवावी. कोकण विभाग नेहमीच शासकीय योजना राबविण्याबाबत आघाडीवर असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोकणातील आदर्श व सुंदर गावे आहेत. कोकणाला नेहमीच स्वच्छतेची आवड आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक करतांना आयुक्त श्री.पाटील म्हणाले कीविकासकामे करतांना जिल्हा परिषदपंचायत समिती व महसूल विभागातील अधिकाऱ्यांना मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागते.

            आगामी गणेशोत्सव लक्षात घेता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळयांनी जागरुक राहून शासनाचे नियम पाळणे आवश्यक आहेत.  लोकप्रतिनिधींनी तळागाळापर्यंत कोरोनाबाबत जनजागृती करावी. अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली

            सन 2020-21 या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यात दि. 20 नोव्हेंबर, 2020 रोजीच्या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून दि.20 नोव्हेंबर, 2020 ते 5 जुन, 2021 या कालावधीत महा आवास अभियान ग्रामीण " राबविण्यात आले. अभियानात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ठाणे जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला असून संपूर्ण अभियानादरम्यान उत्कृष्ट काम केल्याबद्दल सर्वात जास्त पारितोषिके पालघर जिल्ह्याला मिळाली आहेत.

 पारितोषिक प्राप्त संस्था पुढीलप्रमाणे

            प्रधानमंत्री आवास योजना- सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद प्रथम क्रमांक-जिल्हा परिषद ठाणेद्वितीय क्रमांक-जिल्हा परिषद रत्नागिरीतृतीय क्रमांक-जिल्हा परिषद रायगड.

राज्य पुरस्कृत आवास योजना- सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद प्रथम क्रमांक-जिल्हा परिषद रत्नागिरीद्वितीय क्रमांक-जिल्हा परिषद सिंधुदूर्गतृतीय क्रमांक-जिल्हा परिषद ठाणे.

             सर्वोत्कृष्ट पंचायत समिती प्रथम क्रमांक-पंचायत समिती म्हसळा जि.प.रायगडद्वितीय क्रमांक-पंचायत समिती दापोलीजि.प.रत्नागिरीतृतीय क्रमांक-पंचायत समिती कुडाळजि.प.सिंधुदुर्ग,

राज्य पुरस्कृत आवास योजना- सर्वोत्कृष्ट पंचायत समिती प्रथम क्रमांक-पंचायत समिती मोखाडा जि.प.पालघरद्वितीय क्रमांक-पंचायत समिती तलासरीजि.प.पालघरतृतीय क्रमांक-पंचायत समिती वैभववाडीजि.प.सिंधुदुर्ग,

            प्रधानमंत्री आवास योजना- सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत-प्रथम क्रमांक-ग्रामपंचायत वाडोसता.कुडाळजि.प.सिंधुदुर्गद्वितीय क्रमांक-ग्रामपंचायत आखवणे भोमता.वैभववाडीजि.प.सिंधुदुर्गतृतीय क्रमांक- ग्रामपंचायत सडुरे शिराळेता.वैभववाडीजि.प.सिंधुदुर्ग.

राज्य पुरस्कृत आवास योजना- सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत-प्रथम क्रमांक-ग्रामपंचायत अणावता.कुडाळजि.प.सिंधुदुर्गद्वितीय क्रमांक-ग्रामपंचायत मांगवलीता.वैभववाडीजि.प.सिंधुदुर्गतृतीय क्रमांक- ग्रामपंचायत उमरोलीता.पालघरजि.प.पालघर.

            प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत आवास योजना - सर्वोत्कृष्ट वित्तीय संस्था प्रथम क्रमांक- उमेद- ता. जव्हारजि.पालघर द्वितीय क्रमांक- उमेद- ता.वाडाजि.पालघर तृतीय क्रमांक- उमेद- ता. डहाणूजि.पालघर.

            प्रधानमंत्री आवास योजना-शासकिय जागा उपलब्धता- प्रथम क्रमांक-तहसिलदारता.कल्याण,जि.ठाणे द्वितीय क्रमांक- तहसिलदारता.शहापूरजि.ठाणे तृतीय क्रमांक-निरंक,

कोकण  विभागातील सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत व सर्वोत्कृष्ट गृहसंकुल पुढीलप्रमाणे आहेत.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत-प्रथम क्रमांक-ग्रामपंचायत चिंचवलीता.भिवंडीजि.प.ठाणे.

            प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट गृहसंकुल प्रथम क्रमांक- श्रीम.सखुबाई दाजीबा निकमग्रा.पं. मुणगेता.देवगडजि.प.सिंधुदुर्ग यांना देण्यात येणार आहेत.

अभियानातील कार्पोरेट संस्थासाठी देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट जिल्हा पालघर रोटरी डिस्ट्रीक्ट 3141 अशियाना ता.वाडा जि.पालघर यांना घोषित करण्यात येणार आहे.

            या  पुरस्कार वितरण सोहळयास पंचायत समितीचे सभापती व गटविकास अधिकारीतसेच ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक/ग्रामविकास‍ अधिकारी तसेच पुरस्कारप्राप्त वित्तीय संस्था आणि जागा उपलब्धतेसाठी प्रयत्न केलेले तहसिलदार व गटविकास अधिकारी उपस्थित होते. कोरोना नियम पाळून पारितोषिक वितरण कार्यक्रम करण्यात आला.

 राज्य नाट्य स्पर्धेला केशवराव भोसले राज्य नाट्य स्पर्धा

असे नाव देण्यात येणार

- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

 

            मुंबईदि. 2 : संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी काळाच्या पुढे जाऊन मराठी रंगभूमीला उर्जितावस्था प्राप्त करुन देण्याचे काम केले आणि त्यामुळेच राज्य नाट्य स्पर्धेला केशवराव भोसले राज्य नाट्य स्पर्धा असे नाव देण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

            संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती शताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात यांच्यासह संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष वर्षा धाबेप्रदेश कार्याध्यक्ष अर्जुन तनपूरेप्रदेश उपाध्यक्ष प्रकाश लेणेकर,महासचिव प्रमिलाताई भिसेकोषाध्यक्ष शाम वानखेडेआयोजन समिती प्रमुख शिवराज शिंदेप्रसिध्दी प्रमुख जयप्रकाश पाटीललोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगेसांस्कृतिक कार्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले कीकेशवराव भोसले यांच्या नावाने नाटक आणि संगीत क्षेत्रातील कर्तृत्ववान कलाकरांसाठी राज्य पुरस्कार सुरु करण्याबाबत शासन विचार करेल. मात्र तत्पूर्वी संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद महाराष्ट्रने याबाबतचा परिपूर्ण प्रस्तावमार्गदर्शक तत्वे याबाबतची सांस्कृतिक कार्य विभागाला सादर करावी. संगीत नाटक क्षेत्रातील होतकरु विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याबाबतही विचार करण्यात येईल.

            संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे जयंतीपुण्यतिथी कार्यक्रम शासकीय पातळीवर करण्यात यावेत याबाबत सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सामान्य प्रशासन विभागाला कळविण्यात येईल. संगीतसूर्य केशवराव भोसले कलासाहित्य आणि सांस्कृतिक केंद्र स्थापन करण्याबाबतही विभागामार्फत विचार करण्यात येईल. येत्या 4 ऑक्टोबर 2021 रोजी नांदेड येथे होणाऱ्या सांगता कार्यक्रमाला आपण उपस्थित राहू असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस

तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करू... चिंता करू नका लवकर बरे व्हा

हल्लेखोरांवर कडक कारवाई होणार

 

          ठाणे,दि.3 (जिमाका) : ताईतुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करू...तुम्ही चिंता करू नका लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना दिल्या.

          फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करताना श्रीमती पिंपळे यांच्यावर हल्ला झाला होता. त्या सध्या रुग्णालयात उपचार घेत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

          यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणालेतुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करावे..ताई तुम्ही काळजी करु नका तुमच्यावर हल्ला करणाऱ्याला कठोर शासन केले जाईल. तुम्ही चिंता करू नका लवकरात लवकर बरे व्हाराज्य शासन आपल्या पाठीशी आहेअसा दिलासा देतानाच तुमच्या प्रकृतीची मी रोज माहिती घेत असतो. काळजी करू नका ठणठणीत बरे व्हाअसे सांगत मुख्यमंत्र्यांनी श्रीमती पिंपळे यांची विचारपूस केली.

          मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्याकडून श्रीमती पिंपळे यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली. त्यांनी महापौरांच्या मोबाईलवरून श्रीमती पिंपळे यांच्याशी संवाद साधला. यावेळी महापालिका आयुक्त विपीन शर्मा उपस्थित होते. श्रीमती पिंपळे यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेतला जाईलअसे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

0000


 *एकटे असताना हदयविकाराच्या झटका आल्या आल्या ने स्वता करवायचे उपाय*


*काही दिवसांपूर्वी, मॉर्निंग वॉक वरून परतल्यावर प्रसिद्ध क्रिकेटपटू यशपाल शर्मा ह्या 1983 च्या वर्ल्ड कप खेळाडूचे वयाच्या 66 व्या वर्षी  हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.  जीवन अनिश्चित आहे. त्यामुळे खालील काही टिप्ससह तयार राहा. ज्यामुळे तुमचे आयुष्य वाचू शकते.*


  *ह्या टिप्स, डॉ. गीता कृष्णस्वामी यांच्या आहेत. कृपया तुमची 2 मिनिटे द्या, हे वाचा:*


 *१.  समजा संध्याकाळी 7.25 वाजले आहेत.   तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणाहून घरी परतत आहात (अर्थातच एकटे).*


  *२.  तुम्ही खरोखर थकलेले, अस्वस्थ आणि निराश आहात.*


 *3 अचानक तुम्हाला तुमच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागतात. ज्या तुमच्या हातामध्ये आणि तुमच्या जबड्यात ओढू लागतात.  तुम्ही तुमच्या घराजवळील हॉस्पिटलपासून फक्त पाच किमी अंतरावर आहात.*


  *4.  दुर्दैवाने तुम्हाला माहित नाही की तुम्ही ह्या वेदना तीतपर्यंत सहन करू शकाल का.*

  *५.  तुम्हाला सीपीआरचे प्रशिक्षण दिले गेले आहे. पण ज्याने हा कोर्स शिकवला त्याने, हे स्वतःसाठी कसे वापरावे हे शिकवलेले नाही.*


  *6.  एकटे असताना हृदय विकाराच्या झटक्याचे आक्रमण कसे रोखायचे?*  


 *हृदयविकाराचा झटका आल्यावर एकटे असल्यावर व मदतीशिवाय असल्यावर,   चेतना गमावण्यापूर्वी  त्याच्याकडे फक्त 10 सेकंद शिल्लक असतात.*


*7.  तथापि, त्या व्यक्तीने वारंवार आणि अतिशय जोमाने खोकल्यास त्याचे प्राण वाचू शकतात.      यासाठी, प्रत्येक खोकल्याआधी एक दीर्घ श्वास घेतला पाहिजे आणि खोकला खोल आणि दीर्घकाळ असावा, जसे छातीच्या आतून थुंकी निर्माण करताना होतो तसा. मदत येईपर्यंत किंवा हृदयाला पुन्हा सामान्यपणे धडधडल्यासारखे वाटत नाही तोपर्यंत प्रत्येक दोन सेकंदात एक श्वास आणि खोकला न सोडता त्याची पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे.*


  *8.  खोल श्वासांमुळे फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन येतो आणि खोकल्याच्या हालचाली हृदय पिळून घेतात व रक्त संचारण ठेवतात.  हृदयावर वाढणारा दबाव देखील सामान्य लय परत मिळवण्यास मदत करतो.  अशा प्रकारे, हृदयविकाराची व्यक्ती रूग्णालया पर्यंत पोहोचू शकते.*


 *9.  सर्व लोकांना, शक्य तितक्या लवकर याबद्दल सांगा.  ह्या मुळे त्यांचे आयुष्य वाचवू शकते !!*


  *10.  कार्डिओलॉजिस्ट म्हणतात की, जर प्रत्येकाने  हा मेल 10 जणांना पाठवला तर  किमान एक जीव वाचू शकतो.*


  *11.  विनोद पाठवण्यापेक्षा, कृपया ... हा मेल फॉरवर्ड करून योगदान द्या. ज्या मुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो.*


  *12.  जर हा संदेश तुमच्या आजूबाजूला आला तर ... एकापेक्षा जास्त वेळा ... कृपया चिडचिड करू नका ... त्याऐवजी तुम्हाला आनंद झाला पाहिजे की तुमचे अनेक मित्र आहेत जे तुमची काळजी करतात आणि तुम्हाला हार्ट अटॅकचा सामना कसा करावा याची आठवण करून देत राहतात.*


 *कृपया तुम्ही जमेल तितक्या लोकांना हा अत्यंत महत्वाचा संदेश शेअर करा.   जीव वाचवण्यात मदत करा.*

🙏🏻🙏🏻🙏🏻

 मुंबई पोलीसांनी बोर्ड लावला, 

NO PARKING ZONE

PENALTY  Rs.250/-

कोणीही आदेश मानायला तयार नव्हतं. लोकं बोर्डच्या खाली बिनधास्त गाड्या उभ्या करून जात.

 काही दिवसांनंतर तेथून एक नगरचा माणूस गेला.  त्याने तिथली परिस्थिती जाणून घेतली आणि... त्याने बोर्ड मध्ये दोन शब्द परिवर्तन केले.

 बोर्ड मधून No आणि Penalty शब्द खोडले. आता बोर्ड झाला,

PARKING ZONE

Rs 250/-

आता लोकांनी गाड्या उभ्या करणे थांबवले.

मुंबई पोलीस त्या नगरकर  माणसाला शोधत आहेत.


😁😁😁😃😃😃😃😃


*नेहमी पुणेकरांनीच हूशारीनं वागयचं का कायं?* 😆😆🤣🤣

 घराघरांत नळाद्वारे पाणी पोहचविण्यासाठी

कालबद्ध कार्यक्रम आखून युद्धपातळीवर मोहीम राबवा

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·       जलजीवन मिशन नियोजन व अंमलबजावणीच्या कामाचा आढावा

 

            मुंबई दि. 2 : - जल जीवन मिशन अंतर्गत वर्ष २०२४ पर्यंत राज्यातील ग्रामीण भागात १ कोटी ४२ लाख ३६ हजार  नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे. हे  उद्दिष्ट मोठे असले तरी हे काम पुण्य देणारे आहे आणि  ते आपल्याला करावेच लागेल. २०२४ पर्यंत नळजोडण्यांचे हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखून त्याची सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत जलजीवन मिशन नियोजन व अंमलबजावणीच्या कामाचा आढावा घेण्यात आला.

            वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील,मुख्य सचिव सीताराम कुंटेनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्तीपाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदेग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमारमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेवित्त विभागाचे प्रधान सचिव ओ पी गुप्तामहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकरजलजीवन मिशनचे अभियान संचालक प्रवीण पुरीसहसचिव चंद्रकांत गजभिये आदि मान्यवर उपस्थित होते.

निधी कमी पडू देणार नाही

            राज्याचे नळजोडण्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत जेवढा निधी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिली.

पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करावे

            जलजीवन मिशनच्या कामांना गती देण्यासाठी पाणी पुरवठा विभाग अंतर्गत जी पदे रिक्त असतील ती पदे भरेपर्यंत आवश्यक अभियंत्यांच्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात बाह्ययंत्रणे मार्फत घेण्यात याव्यात तसेच इतर विभागातील पदांचा आढावा घेऊन आणखी आवश्यक असलेले अभियंते त्या विभागाकडून उपलब्ध करून घ्यावेत जेणेकरून कामांना गती येईल.याचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव यांनी बैठक आयोजित करावी, अशी सूचना मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी केली.

मुख्य सचिवांनी आढावा घ्यावा

             जल जीवन मिशन अंतर्गत कामांचा सर्व विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियमित आढावा घ्यावा. मुख्य सचिव यांनीही याबाबत आढावा घ्यावा असे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

             पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणालेजलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत नळजोडणीच्या माध्यमातून पाणी पोहचविण्यासाठी या वर्षासाठी  ७ हजार ६४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून तेवढाच निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे.अशा प्रकारे १४ हजार १२८ कोटी रुपये उपलब्ध होतील.

            जल जीवन मिशन अंतर्गत २०२४ पर्यंत ३८ हजार ६५३ योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी २४ हजार ९४९ कोटी रुपये खर्च येणार आहे.२०२१-२२  या वर्षात मार्च अखेर पर्यंत २९ हजार ८५३ योजना पूर्ण करण्यात येणार आहेत.त्यासाठी १२ हजार ९५० कोटी रुपये खर्च येणार आहे.हे  निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून त्याची गतीने अंमलबजावणी करण्याची गरज आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाच कोटी रुपयांवरील २०० योजनांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार आहेत आणि डिसेंबर पर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

            जल जीवन मिशन हे एक आंदोलन आहे,तो एक उत्सव आहे.यामध्ये सर्वांचा सहभाग गरजेचा आहे. 'हर घर जलहर घर नल'  उक्तीप्रमाणे प्रत्येक घरापर्यंत पाणी  पोहचविण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग  प्रयत्नशील असून नळजोडण्यांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कालबध्द कार्यक्रम राबवावा अशी सूचनाही श्री.पाटील यांनी यावेळी केली.

नळजोडण्यांचे ६५ टक्के उद्दिष्ट पूर्ण

            जल जीवन मिशन अंतर्गत सन २०२४ पर्यंत राज्यातील ग्रामीण भागात १ कोटी ४२ लाख ३६ हजार  नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे.त्यापैकी ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत  ९३ लाख ६ हजार नळजोडण्यांचे काम ( ६५ टक्के काम) पूर्ण झाले आहे.उर्वरित ४९ लाख २९ हजार नळजोडण्यांचे काम बाकी आहे.त्यापैकी सन २०२१-२२ या वर्षात २७ लाख ४५ हजार नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे.मागील वर्षी राज्यात ३७ लाख नळजोडण्या देण्यात आल्या.घरातील प्रत्येकाला म्हणजे प्रति माणसी प्रति दिन ४० ऐवजी ५५ लिटर  पाणी पुरवण्याच्या दृष्टीने पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.

            राज्यात आतापर्यंत शाळांमध्ये ८६ टक्के तर अंगणवाड्यांमध्ये ७७ टक्के नळ जोडण्या देण्याचे काम पूर्ण झाले  आहे अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

00000

 रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांच्या

अडचणींवर सकारात्मक मार्ग काढला जाईल

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

            मुंबईदि. 2 : अवकाळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी  अडचणीत आले आहेत. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सकारात्मक मार्ग निश्चितपणे काढण्यात येईल व आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

            वर्षा येथील समिती कक्षामध्ये आंबा उत्पादक शेतकरी यांच्या अडचणी संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

            या बैठकीला कृषी मंत्री  दादाजी भुसेसिंधुदूर्ग जिल्हा पालकमंत्री उदय सामंतमाजी राज्यमंत्री दीपक केसरकरमुख्य सचिव सीताराम कुंटे,मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंहकृषी विभागाचे सचिव एकनाथ डवलेस्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणालेअतिवृष्टीमुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. या शेतकरी बांधवांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन होणे आवश्यक आहे. याबाबत सहकार विभागाशी चर्चा करुन लवकरच शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

            पालकमंत्री उदय सामंत म्हणालेगेली चार वर्ष आंबा पीक निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात आले आहेत. बँकाकडून घेतलेली पीक कर्जाची रक्कम थकीत झाली आहे. परिणामी बँकांनी वसुलीसाठी तगादा लावला आहे.  व्याजासह कर्ज रक्कम न भरल्यास शेतकऱ्यांना नोटिस देण्यात येत आहेत.

            सन २०१४-१५ मध्ये  अवकाळी पाऊस झाला.त्यावेळी शासनाने पीक कर्जावरील तीन महिन्याच्या व्याजाची रक्कम माफ केली. परंतु ती रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा झाली नाही. तसेच पुनर्गठित कर्ज रकमेवरील पहिल्या वर्षाचे संपूर्ण व्याज व पुढील चार वर्षाचे सहा टक्के प्रमाणे व्याजाची रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. शेतकऱ्यांकडून मात्र बँकांनी वसुली केली आहे. त्यामुळे पीक कर्ज पुनर्गठन प्रक्रिया होणे आवश्यक आहे.

            बैठकीत आंबा पिकावरील फवारणीसाठी लागणाऱ्या कीटकनाशकांवरील किंमती नियंत्रणात आणणे व त्यावर आकारण्यात येणाऱ्या जीएसटी करांमध्ये सवलत मिळण्याबाबत विचार व्हावा याबाबत ही चर्चा करण्यात आली.तसेच आंबा हंगाम मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू असतो. विमा कंपनीकडून भरपाई मिळण्यासाठी आंबा हंगामासाठी पाऊस पडण्याच्या  निकषामध्ये दि.१५ मे पर्यंत पाऊस पडला असेल तरच  नुकसान भरपाई मिळते. परंतु याचा फायदा रत्नागिरीतील उत्पादकांना मिळत नाही. या भागात तारखे मध्ये बदल करून ती दि.३१ मे पर्यंत तारीख निश्चित करावी अशी विनंती यावेळी करण्यात आली.

0000

Featured post

Lakshvedhi