Thursday, 4 June 2026

माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी करु नये

 माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी करु नये

 -कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

·         नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणार

 

मुंबई, दि. ३ : आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यात माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी करून घेण्यास प्रतिबंध करण्याबाबत लवकरच स्वतंत्र परिपत्रक जारी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले.

 

माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या मालाची हाताळणी करून घेण्यास प्रतिबंध करण्याबाबत केंद्रीय श्रम मंत्रालयाने ३० ऑगस्ट १९९९ रोजी दिलेल्या निर्देशांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामगार मंत्री ॲड फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi