सेवा केंद्रांचे मानांकीकरण काळाची गरज
राज्यातील आपली सेवा केंद्रे ही नागरिकांसाठी शासनाचा चेहरा असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नागरिकांना प्रत्यक्ष मदत मिळवून देणाऱ्या या केंद्रांमध्ये एकसमान सुविधा, स्पष्टता आणि गुणवत्ता असणे आवश्यक आहे. स्पर्धात्मक वातावरण निर्माण करून सेवा केंद्रांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहनपर व्यवस्था उभारण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment