विकसित भारताच्या निर्मितीला गती मिळणार
– केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्री जी. किशन रेड्डी
कोळसा वायूकरण (कोल गॅसिफिकेशन) हे भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील सुधारणांचे पुढील महत्त्वाचे पर्व असून, ऊर्जा सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, औद्योगिक प्रगती आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी ते निर्णायक ठरणार असल्याचे केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री रेड्डी म्हणाले की, गेल्या बारा वर्षांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने वीज आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रात ऐतिहासिक परिवर्तन अनुभवले आहे. त्या सुधारणांनंतर आता कोळसा वायूकरण हे ऊर्जा क्षेत्रातील पुढील मोठे परिवर्तन ठरणार आहे. कोळसा क्षेत्रात व्यापक सुधारणा करण्यात आल्या असून, त्यामुळे देशात कोळसा वायूकरणासाठी भक्कम पाया तयार झाला आहे. या क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने प्रथमच मोठ्याप्रमाणावर प्रोत्साहनपर योजना जाहीर केली आहे. या योजनेमुळे उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल आणि देशात उत्पादनवाढीसह रोजगारनिर्मितीलाही गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment