पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्हा परिषद रायगड यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत व नळ पाणीपुरवठा योजना अंतर्गत किती नळ जोडणी बाकी आहे याचा आढावा घेऊन त्यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव द्यावा व त्यातून नळ पाणी पुरवठा योजनेची नळ जोडणी पूर्ण करून घ्यावी.
रायगड जिल्ह्यामध्ये ज्या मंजूर योजना आहेत त्यामध्ये काही त्रुटी आहेत त्या त्रुटी पूर्ण करून सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन योजना पूर्ण कराव्यात, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.
यावेळी दाभोळ व टोळा (बु), दासगाव - वहुर, खैरे व २१ गावे, पोलादपूर व १४ योजना यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
No comments:
Post a Comment