Friday, 22 May 2026

आधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएस) बसविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती

 राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्हा जोडरस्त्यांवर सुमारे २५ हजार किलोमीटर लांबीच्या मार्गांवर आधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएस) बसविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ही प्रणाली मागील वर्षभरापासून कार्यरत असून त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

अपघातग्रस्तांना गोल्डन अवरमध्ये मदत मिळावी यासाठी तातडीच्या प्रतिसादाचा कालावधी ३० मिनिटांपेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये वाहन तपासणी व वाहनचालक चाचण्या कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली पारदर्शक पद्धतीने घेतल्या जात आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन शालेय बस नियमावली तयार करण्यात आली असून, स्थानिक स्तरावर अपघातप्रवण स्थळांच्या दुरुस्तीसाठी निधीही उपलब्ध करून देण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi