१ जानेवारी ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत रडार आधारित इंटरसेप्टर वाहनांमार्फत मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध २ लाख ६४ हजार ६७२ प्रकरणे नोंदविण्यात आली, तर मागील आसनावरील हेल्मेटविना प्रवास करणाऱ्यांविरुद्ध ३० हजार ५६८ कारवाया करण्यात आल्या. अतिवेगामुळे २२ हजार ३६०, सीटबेल्ट न वापरणाऱ्या चालकांविरुद्ध १८ हजार १७२, अवैध पीयूसी प्रकरणांत १८ हजार ९४० आणि विमाविना वाहन चालविणाऱ्या १५ हजार ६३८ चालकांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय ट्रिपल सीट प्रवास आणि फिटनेस नसलेल्या वाहनांविरुद्धही मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात आली.
वाहनांची तांत्रिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी राज्यात ५३ शासकीय आणि १६ खासगी स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रे (एटीएस) सुरू करण्यात येणार आहेत. तसेच कुशल वाहनचालकांनाच परवाने मिळावेत यासाठी २०२६ मध्ये ३८ स्वयंचलित वाहन चाचणी पथ (एडीटीटी) सुरू करण्यात येत आहेत.
No comments:
Post a Comment