आरोग्य, महिला व बालविकास, पंचायत राज आणि पाणीपुरवठा विभागांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधल्यास बालपोषण निर्देशांकात लक्षणीय सुधारणा होऊ शकते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, बालकांचे पोषण आणि सर्वांगीण विकास हे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि प्रभावी अंमलबजावणीच्या माध्यमातून सेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. जागतिक स्तरावरील तज्ज्ञांकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे राज्यातील पोषण अभियानाला अधिक बळ मिळेल.
0000
No comments:
Post a Comment