Thursday, 16 April 2026

राज्यात उष्णतेचा लाटेचा इशारा; नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी

 राज्यात उष्णतेचा लाटेचा इशारानागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे आवाहन

 

मुंबईदि. १५ : राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विविध भागांमध्ये तापमान लक्षणीय वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे.

 

मध्य महाराष्ट्रात १५ ते १८ एप्रिलदरम्यानमराठवाड्यात १६ ते १८ एप्रिलदरम्यानविदर्भात १५ ते १९ एप्रिलदरम्यान तर कोकणात १५ ते १७ एप्रिलदरम्यान काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे,

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi