Tuesday, 14 April 2026

राष्ट्र प्रथम – बाबासाहेबांचा दृष्टिकोन

 राष्ट्र प्रथम – बाबासाहेबांचा दृष्टिकोन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका स्पष्ट होती. संविधान सभेत बोलताना ते म्हणाले होते,  राष्ट्र प्रथमसमाज नंतर आणि व्यक्ती त्यानंतर. स्वतः आयुष्यभर सामाजिक अन्याय सहन करूनही त्यांनी कधीही कोणाबद्दल सूडाची भावना बाळगली नाही. उलटत्यांनी अशी राज्यघटना निर्माण केली ज्यामध्ये प्रत्येक नागरिकाला समान न्याय मिळेल.

आचार्य प्र. के. अत्रे यांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर लिहिलेल्या आपल्या आदरांजलीत आंबेडकरांना जुलूमाविरुद्ध उगारलेली वज्राची मुठʼ असे संबोधले. ही उपमा त्यांच्या संघर्षशील वृत्तीचे आणि अन्यायाविरुद्धच्या लढ्याचे अचूक चित्रण करते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi