समृद्धी महामार्ग अपघात : आठ मृतांच्या कुटुंबीयांना ४० लाखांची मदत
· मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी रुपये ५ लाख रूपये
मुंबई, दि. ८ : जालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर दि. १ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या अपघातात आठ महिलांचा मृत्यू झाला. सदर घटनेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या मदतीनुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी रुपये ५ लाख प्रमाणे एकूण रुपये ४० लाख इतकी आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम जिल्हाधिकारी, जालना यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment