Friday, 10 April 2026

कराराच्या माध्यमातून बालकांसाठी अधिक सुरक्षित, निरोगी आणि समर्थ वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने ठोस पाऊल

 कराराच्या माध्यमातून बालकांसाठी अधिक सुरक्षित,

 निरोगी आणि समर्थ वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने ठोस पाऊल

या सामंजस्य कराराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेबालकांचे आरोग्य हे राज्याच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविणे ही केवळ आरोग्य क्षेत्राची जबाबदारी नसून समाजाची एकत्रित बांधिलकी आहे. या कराराच्या माध्यमातून आपण मुलांसाठी अधिक सुरक्षितनिरोगी आणि समर्थ वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल टाकत आहोत.

हा करार नागपूर येथील एम्सबालरोग विभागासोबत करण्यात आला असूनया अंतर्गत राज्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये चाइल्डहुड एनसीडी क्लिनिक्स स्थापन व कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या उपक्रमातून टाईप-1 मधुमेहजन्मजात हृदयरोगदमास्थूलतासिकलसेलमानसिक आरोग्य आणि विकासात्मक विकार यांसारख्या आजारांचे प्रतिबंधलवकर निदान आणि प्रभावी उपचार सुनिश्चित करण्यात येणार आहेत. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणमानकीकृत उपचार पद्धतीडेटा संकलन प्रणाली आणि तज्ज्ञ मार्गदर्शन यावर विशेष भर दिला जाणार आहे

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi