'मित्रा'आणि ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’ यांच्यात
५६ लाख वृक्षारोपण व उपक्रमांबाबत करार
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र शासनाची धोरणात्मक सल्लागार संस्था आलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA) आणि अर्थ डे नेटवर्क इंडिया यांच्यात राज्यामध्ये पर्यावरणीय उपक्रम राबवण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत ५६ लाख वृक्षारोपणासह विविध उपक्रम राबवून राज्यातील हवामान कृतीला (Climate Action) गती देण्यात येणार आहे.
पृथ्वी दिन २०२६ निमित्ताने करण्यात आलेला हा सामंजस्य करार शाश्वत विकासाची चौकट मजबूत करण्यासाठी तसेच नागरिक, संस्था आणि उद्योगांना हरित भविष्यासाठी एकत्र आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या भागीदारीत MITRA संस्थेकडून धोरणात्मक मार्गदर्शन व आर्थिक पाठबळ दिले जाणार असून, अर्थ डे नेटवर्क इंडिया ही संस्था प्रत्यक्ष अंमलबजावणी, जनजागृती आणि लोकसहभाग वाढवण्याची जबाबदारी पार पाडणार आहे.
No comments:
Post a Comment