राज्यात दोन वेगवेगळ्या गावांमध्ये जमिनी असलेल्या शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजनांचा लाभ मिळण्याबाबतचा प्रश्न सदस्य विक्रम पाचपुते यांनी मांडला.
रोहयो मंत्री भरत गोगावले म्हणाले की, मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड एका गावाचे असले तरी ठराविक अटींनुसार दुसऱ्या गावात वैयक्तिक कामांचा लाभ दिला जाऊ शकतो. मात्र, यासाठी साधारणपणे ५ किमी अंतर किंवा संबंधित तालुक्याच्या मर्यादेतच कामे दिली जातात. दुसऱ्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात जमीन असल्यास सध्या नियमांमुळे अडचणी येतात.
No comments:
Post a Comment