Friday, 13 March 2026

बालकांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी ‘डिजिटल कवच’ आवश्यक

  

बालकांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी डिजिटल कवच’ आवश्यक

– महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

·         बाल सुरक्षा व डिजिटल सुरक्षिततेसाठी महा-संकल्प’ नेतृत्व संवाद

·         मुलांशी संबंधित ऑनलाईन शोषणाबाबत 1930 हेल्पलाईन

 

मुंबईदि.13 : तंत्रज्ञानाचा सुरक्षित आणि जबाबदार वापर सुनिश्चित करत बालकांसाठी सुरक्षित डिजिटल वातावरण निर्माण करण्यासाठी डिजिटल कवच’ उभारण्याची गरज असल्याचे मत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले.

बालकांच्या सुरक्षिततेसह डिजिटल युगातील आव्हानांचा सामना करण्यासाठी महा-संकल्प : सुरक्षितताशिक्षण आणि शाश्वत डिजिटल भारत या नेतृत्व संवादाचे आयोजन जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे करण्यात आले. महिला व बालविकास विभागमहाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि चाइल्डफंड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाला आयोगाच्या अध्यक्षा नंदिनी आवडेसचिव लक्ष्मण राऊतअवर सचिव वंदना जैनचाइल्डफंड इंडियाचे कार्यकारी संचालक आनंद विश्वकर्मा तसेच विविध कॉर्पोरेट संस्थांचे प्रतिनिधीसामाजिक संस्थांचे प्रतिनिधीवकीलप्राध्यापकफिल्ममेकर आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi