देशाची अन्नसुरक्षा, आर्थिक स्थैर्यासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची
- राज्यपाल जिष्णू देव वर्मा
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 39 वा पदवीप्रदान समारंभ संपन्न
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मानद 'डॉक्टर ऑफ सायन्स' पदवीने सन्मानित
शाश्वत शेतीसाठी सर्व घटकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अहिल्यानगर, दि. 15 : जगातील एका भागातील युद्ध व संघर्षाचा परिणाम सर्वत्र होत असल्याने देशाची कृषी व्यवस्था अधिक सक्षम करणे व अन्नसुरक्षा सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. देशाच्या अन्नसुरक्षा, आर्थिक स्थैर्य व शाश्वत विकासासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून भारतीय कृषीचे भविष्य तंत्रज्ञानाधारित उपाय, स्टार्टअप्स व शाश्वत पद्धतींवर अवलंबून आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांनी केले.
No comments:
Post a Comment