८६४ लाभार्थ्यांना हक्काच्या घरांच्या चाव्या सुपूर्द हा सुवर्णक्षण
- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
जवळजवळ चार दशकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज पहिल्या टप्प्यातील 864 लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घरांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा हा सुवर्णक्षण आपल्याला अनुभवता येत आहे. ही घरं म्हणजे केवळ इमारत किंवा सिमेंट-विटांचं बांधकाम नाही, तर ते आपल्या स्वप्नांचं, आशा-आकांक्षांचं प्रतिक असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.
1920 च्या सुमारास उभारण्यात आलेल्या या ब्रिटिशकालीन बीडीडी चाळी मुंबईच्या सर्वांगीण विकासाच्या, इतिहासाच्या साक्षीदार ठरल्या आहेत. मात्र, या चाळींचा इतिहास हा केवळ इमारतींचा इतिहास नाही; तर तो इथं राहणाऱ्या कष्टकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या संघर्ष, जिद्द आणि एकात्मतेचा इतिहास आहे. गेली जवळपास चार दशके येथील रहिवासी अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि सन्मानाने जगता येईल अशा घराच्या प्रतीक्षेत होते. आज या दीर्घ संघर्षाला यश मिळालं असून, बीडीडीवासीयांच्या आयुष्यात एका नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment