ऊर्जा क्षेत्राला सक्षम करण्यासाठी कालबद्धरित्या
प्रकल्पांची अंमलबजावणी करावी
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· राज्याची ऊर्जा क्षेत्रात ४.१७ लक्ष कोटींची गुंतवणूक
· ५५ सामंजस्य करारांद्वारे ७८,२१५ मेगावॅट क्षमतेची उभारणी
मुंबई,दि. ४ : राज्यात ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत असून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठीचे विविध कंपन्यांसोबत एकूण 55 सामंजस्य करार आज करण्यात आले आहेत. या करारांद्वारे 78,215 मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेची उभारणी प्रस्तावित आहे. एकूण गुंतवणूक सुमारे ₹4,16,701 कोटी रुपये इतकी अपेक्षित असून या प्रकल्पाद्वारे सुमारे 1,27,990 रोजगार निर्मिती होणार आहे. ऊर्जाक्षेत्राला सक्षम करण्यासाठी करार महत्वाचे असून कालबद्धरित्या या प्रकल्पांची अंमलबजावणी करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
No comments:
Post a Comment