कृषी निर्यातीत 'मेड इन महाराष्ट्र' ब्रँडची निर्मिती करावी
- पणन मंत्री जयकुमार रावल
ॲग्री एक्सपोर्ट कॉन्क्लेव्ह २०२६
मुंबई, दि. २४: महाराष्ट्रातील कृषी उत्पादन देशाच्या नाही, तर जागतिक पातळीवर स्पर्धा करू शकणारे आहे. यामध्ये फळे, फुले, भाजीपाला उत्पादनाचा समावेश आहे. जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी रेसिड्यू फ्री, केमिकल फ्री आणि गॅप प्रमाणपत्र आवश्यक आहे. अशा सर्व बाबींचा समावेश असलेल्या कृषी उत्पादनांच्या ' मेड इन महाराष्ट्र' ब्रँडची निर्मिती करावी असे आवाहन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी ॲग्री एक्सपोर्ट कॉन्क्लेव्हच्या समारोप कार्यक्रमात केले.
No comments:
Post a Comment