मराठीचा वापर वाढवू या!
‘उपभाषांनी समृद्ध झालेली माय मराठी’ हा विचार मराठीच्या सर्वांगसुंदरतेची जाणीव करून देतो. भाषा ही आईसारखी असते—विशाल, सामावून घेणारी आणि ममत्वाने ओथंबलेली.
महाराष्ट्रात येणारा कोणतीही व्यक्ती या भाषेचा गोडवा अनुभवते आणि सोबत घेऊन जाते. ‘तुम्हाला मराठी येते म्हणजे तुम्ही मराठी आहात’ हा या भाषेचा उदात्त बाणा आहे.
त्यामुळे आज मराठी भाषा गौरव दिनाला जागतिक स्तरावर मराठीचा सन्मान टिकवण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे यासाठी..
• मराठी माध्यमातील शिक्षणाचा प्रसार
• मराठी शाळांचे अस्तित्व टिकवणे
• आधुनिक माध्यमांवर मराठीत अभिव्यक्त होणे
• दैनंदिन व्यवहारात मराठीचा जाणीवपूर्वक वापर
ही अत्यावश्यक पावले आहेत.
दिवंगत कवीवर्य डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांनी मराठीच्या सामर्थ्याचे सुंदर वर्णन केले आहे—
मराठीची प्रतिभा, ज्ञानेश्वरीत सामावते
ग्रामगीता गाथाही, मराठीतच मावते
लावणीतून मराठीचे, सौंदर्य ओसंडते
शौर्य आणि औदार्य, पोवाड्यातून सांडते
मराठीनेच तुकड्याला तुकडोजी केले
गाडगेबाबा मराठीतच जन्म घेऊन गेले
अमृताशी पैज जिंकते, मराठी बोली
आभाळाची उंची जिच्यात, समुद्राची खोली
साऱ्यांनी मराठी हुंकारावर डोलावे
मराठी माणसाने मराठी माणसाशी मराठीतच बोलावे..!
चला… मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण सर्वांनी एक संकल्प करूया, मराठी माणसाने मराठी माणसाशी मराठीतच बोलूया..!
००००
No comments:
Post a Comment