गेल्या अकरा वर्षांत ऊर्जा क्षेत्रात करण्यात आलेल्या बदलांचा आज मोठा फायदा होत असल्याचेही सांगून पूर्वी २७ देशांकडून इंधन आयात केले जात होती, ती आता ४१ देशांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पुरवठा खंडित होण्याचा धोका कमी झाला आहे. ई-बस आणि सौरऊर्जेसारख्या पर्यायी स्रोतांवर दिलेला भरही या परिस्थितीत उपयुक्त ठरत आहे. एलपीजीचा पुरवठा सुरळीत सुरू असून आत्मनिर्भर भारत अभियानाचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मध्यपूर्वेतील युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत केंद्र शासनाने उचलेल्या उपाययोजनाची माहिती दिली.
No comments:
Post a Comment