Friday, 6 March 2026

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील

 मुख्य सचिव राजेश अग्रवाल म्हणाले, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनउद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. आयआयएम मुंबईसारख्या संस्थांद्वारे नेतृत्व विकाससंशोधन आणि कार्यकारी शिक्षणाच्या माध्यमातून प्रशासन व उद्योग क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवून आणता येते. त्यामुळे विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीत अशा संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

यावेळी ‘आयआयएम’ मुंबईचे संचालक प्रा. मनोज कुमार तिवारी म्हणालेमुख्य सचिवांच्या भेटीचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे धोरणनिर्मितीशैक्षणिक क्षेत्र आणि उद्योग यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यास आम्हाला बळ मिळेल. भविष्याभिमुख नेतृत्व आणि प्रभावी कार्यकारी शिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाच्या आकांक्षांना पाठिंबा देण्यासाठी आयआयएम मुंबई कटिबद्ध आहे.

या संवाद कार्यक्रमात संस्थेचे डीनविभागप्रमुख आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

संस्थात्मक क्षमता मजबूत करण्याबरोबरच राज्याच्या विकास व नवोन्मेषाच्या उद्दिष्टांशी उच्च शिक्षण उपक्रमांचे समन्वय साधण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi