महिला सक्षमीकरण तसेच कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून महिलांची रोजगार क्षमता वाढविण्यासाठी सुरु केलेला 'स्वयंसिद्धा' हा उपक्रम अतिशय महत्वपूर्ण असून तो देखील विद्यापीठांनी गांभीर्यपूर्वक राबवावा अशी सूचना राज्यपालांनी केली.
'स्कुल - कनेक्ट' व 'स्वयंसिद्धा' कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा लोकभवनातर्फे घेण्यात येईल असे सांगून विद्यापीठांनी या दोन्ही उपक्रमांसंदर्भात आपला त्रैमासिक अहवाल नियमितपणे लोकभवन येथे पाठवावा, असे राज्यपालांनी सांगितले.
वरील दोन्ही उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यापीठांना पदक किंवा चषक प्रदान करण्याबाबत विचार केला जाईल, असेही राज्यपालांनी सांगितले.
No comments:
Post a Comment