राज्यात समतोल औद्योगिक विकासाला गती
-उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत
मुंबई, दि. २५ : राज्यातील सर्व जिल्ह्यांचा समतोल औद्योगिक विकास साधण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये उद्योग सुरू करण्यास शासनाचे प्राधान्य आहे. याबरोबरच विविध उद्योगांसोबत केलेल्या सामंजस्य करारांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे, असे प्रतिपादन उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांनी विधानसभेत केले.
नियम २९३ अंतर्गत उपस्थित झालेल्या प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना मंत्री उदय सामंत बोलत होते.
उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत म्हणाले की, ‘चांदा ते बांदा’ या धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक विकास घडवून आणण्याचा सरकारचा निर्धार आहे. डावोस येथे झालेल्या गुंतवणूक करारांची अंमलबजावणी महाराष्ट्रात ७५ ते ८० टक्क्यांपर्यंत झाली असून, इतर राज्यांमध्ये हा दर केवळ ३५ ते ४० टक्के आहे, ही राज्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
No comments:
Post a Comment