मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील अनेक महिला ऑनलाईन व्यवहार करत असताना डिजिटल प्रक्रियेची पुरेशी माहिती नसल्याने त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे व्यवसाय सुरू करणाऱ्या महिलांना डिजिटल साक्षर करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
सिंधुदुर्ग, पुणे आणि रायगड जिल्ह्यांत सुरू असलेले हे कार्य राज्यभर विस्तारावे, जेणेकरून अधिकाधिक ग्रामीण महिलांना व्यवसायाच्या संधी मिळतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महिला व बालविकास विभाग, महिला विकास मंडळ आणि सामाजिक संस्थांनी समन्वयाने काम करून हा लाभ अधिक महिलांपर्यंत पोहोचवावा, असेही त्या म्हणाल्या.
No comments:
Post a Comment