उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी
मुंबई, दि. 29 - केंद्र शासन पुरस्कृत, 'उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाची 2022 ते 27 या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार असाक्षरांना साक्षर करण्यासाठी अंमलबजावणी केली जात आहे. या कार्यक्रमांतर्गत सन 2025-26 मध्ये उल्लास ॲपवर नोंदणी झालेल्या असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा रविवार दि. 29 मार्च 2026 रोजी राज्यात घेण्यात आली.
मराठी, हिंदी, इंग्रजी, ऊर्दू, गुजराती, कन्नड, तेलगू, तामिळ, बंगाली या नऊ माध्यमातून घेण्यात आलेल्या या परीक्षेतून निकषानुसार परीक्षार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून नवसाक्षरांना प्रमाणपत्र व गुणपत्रक एकत्रित देण्यात येणार आहेत. या चाचणीच्या माध्यमातून व्यक्तीच्या जीवनामध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरुकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण ही जीवन कौशल्ये विकसित होण्यास मदत होणार आहे. तसेच त्या अनुषंगाने त्यांचे पुढील जीवनमान उंचावण्यास मदत होईल.
No comments:
Post a Comment