विचारांचे संवर्धन आणि प्रसाराचे कार्य
तरुण भारतने अविरत सुरु ठेवले
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
तरुण भारतने राष्ट्रवादाचा विचार समाजापर्यंत पोहोचविला
दैनिक तरुण भारतचा शतकपूर्ती सोहळा
नागपूर, दि. १९ : कुठलेही राजकीय पाठबळ व राजाश्रय नसताना एखादी सामाजिक चळवळ शंभर वर्षे पूर्ण करते, त्यावेळी तिच्या पाठिशी एक वैचारिक अधीष्ठान असते व तेच त्या शतकपूर्तीला कारणीभूत असते. दैनिक तरुण भारतने ती भूमिका अत्यंत उत्तम रितीने पार पाडलेली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित दैनिक तरुण भारतच्या शताब्दीपूर्ती कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, नरकेसरी प्रकाशनचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. विलास डांगरे, कार्याध्यक्ष अनिल दांडेकर, प्रबंध संचालक धनंजय बापट, तसेच संचालक मंडळाचे सदस्य यावेळी मंचावर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment