महाराष्ट्राने तयार केलेल्या मुख्यमंत्री सौर योजनेच्या माध्यमातून 16 हजार मेगावॅट क्षमता पूर्ण करण्यासाठी वेगाने कार्यवाही सुरू असून आतापर्यंत 5 हजार मेगावॅट वीजनिर्मिती झाली असून सर्व शेतकऱ्यांना सौरऊर्जा देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, थर्मल पॉवरमुळे निर्माण होणारे पप्रदूषण टाळण्यासाठी 300 कोटीपेक्षा जास्त झाडे लावावी लागतील. परंतु सौरऊर्जेच्या माध्यमातून प्रदूषण व पर्यावरण संतुलित ठेवण्यास मदत होणार आहे. सौरऊर्जेच्या निर्मितीमुळे वीजदर 9 टक्क्यांनी कमी होणार असून सौरऊर्जेने संपूर्ण जगभरात क्रांती केली असल्याचे यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment