Tuesday, 10 February 2026

परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात

 परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात;

दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

 

मुंबईदि. 9 : परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात आहे. त्यामुळे कोणतेही दडपण न घेता उत्सवाच्या भावनेने विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावेअशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

 

            महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षा 10 फेब्रुवारीपासूनतर इयत्ता दहावीच्या परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत.

 

            सर्व विद्यार्थी हे देशाचे भविष्य असूनप्रामाणिकपणा हीच त्यांची खरी ओळख आहे. परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि आठवणीत राहणारा टप्पा असूनगेल्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थीशिक्षक आणि पालकांनी परिश्रमपूर्वक तयारी केली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वप्नपूर्तीसाठी अहोरात्र मेहनत घेतली असूनत्या कष्टांना निश्चितच यश मिळेलअसा विश्वास मंत्री भुसे यांनी व्यक्त केला. परीक्षा देताना विद्यार्थ्यांच्या हातात केवळ उत्तरपत्रिका नसूनत्यात आई-वडिलांची स्वप्नेही असतातअसे सांगून मंत्री भुसे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःवर विश्वास ठेवण्याचेसकारात्मक विचार करण्याचे आणि कोणतेही दडपण न घेता परीक्षा देण्याचे आवाहन केले. परीक्षेच्या काळात आरोग्य जपावेपुरेशी झोप घ्यावीसकस आहार घ्यावामन शांत ठेवावे आणि परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचावेयावरही त्यांनी भर दिला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi