Monday, 16 February 2026

ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण ही लोकचळवळ व्हावी

 ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण ही लोकचळवळ व्हावी

मंत्री भरत गोगावले

·         'सक्षम २०२५-२६अभियानाचा समारोप

 

            मुंबईदि. १६ : इंधनाची बचत ही केवळ गरज नसून ती एक देशसेवा आहे. ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण ही आता एक लोकचळवळ झाली पाहिजेअसे प्रतिपादन फलोत्पादनरोजगार हमी योजना आणि खार जमीन विकास मंत्री भरत गोगावले यांनी केले.

केंद्र शासनाच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली देशभर राबविण्यात आलेल्या 'संरक्षण क्षमता महोत्सव (सक्षम) २०२५-२६या महाराष्ट्र राज्य स्तरीय अभियानाचा सांगता समारंभ यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडलात्यावेळी ते बोलत होते.

मंत्री गोगावले म्हणाले कीवाढते प्रदूषण ही जागतिक समस्या असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नैसर्गिक आणि हरित इंधनाचा वापर वाढवणे आवश्यक आहे. कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करून देशाचे परकीय चलन वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने इंधन बचतीचे कर्तव्य पार पाडावे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi